HomeArchive30 राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचा...

30 राज्यांमध्ये कोरोनाबाधितांचा दर राष्ट्रीय दरापेक्षा कमी!

Details

 
 
“केएचएल न्यूज ब्युरो
 
hegdekiran17@gmail.com
 
भारतात, दररोज दहा लाख लोकांमागे 180 चाचण्या केल्या जात आहेत, जे जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनेत नमूद दीर्घकाळापर्यंत दररोज 140 चाचण्यांच्या प्रमाणापेक्षा जास्त आहे. तसेच 30 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 बाधितांचा दर आहे राष्ट्रीय दरापेक्षा कमी आहे. याव्यतिरिक्त, मृत्यूचे प्रमाण घटून 2.43% पर्यंत खाली आले आहे. बर्यामच राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मृत्यूदर राष्ट्रीय मृत्यू दरापेक्षा कमी आहे.
 
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे विशेष अधिकारी (ओएसडी) राजेश भूषण यांनी नवी दिल्लीत राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे आयोजित कोविड-19वरील कारवाई, सज्जता आणि अद्ययावततेबाबत ही माहिती दिली. भूषण म्हणाले की, बाधितांचा दर खाली आणण्यासाठी आक्रमक चाचणी, हे कोविड-19 विरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र आहे. “कोविड-19 सकारात्मकतेचा दर 5% टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी ही चाचणी पातळी कायम ठेवण्याचे उद्दीष्ट आहे,”
 
देशात आजपर्यंतची कोविड-19 बाधित सक्रिय रुग्णांची संख्या 4,02,529 आहे. आपण आता सक्रिय प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. जे रूग्ण आहेत ते रुग्णालय, केअर सेंटरमध्ये किंवा घरी विलगीकरणात आहेत. सक्रिय रूग्णांचे प्रमाण सतत कमी होत आहे. रूग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातल्या दहा लाख लोकसंख्येमध्ये कोविड-19चे प्रमाण हे जगातील सर्वात कमी प्रमाण असलेल्या देशांपैकी एक आहे तर काही देश असे आहेत जिथे ही संख्या भारताच्या तुलनेत 12-13 पट जास्त आहे. या व्यतिरिक्त, भारतातील दहा लाख लोकसंख्येमागे कोविड-19 संबंधित मृत्यूदर जगातील सर्वात कमी मृत्यूदरांपैकी एक आहे. काही देशांमध्ये ही संख्या भारताच्या तुलनेत 21-33 पट जास्त आहे, असे त्यांनी सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सहकार्य करत आहे. सर्व निर्णय विज्ञान आणि पुरावा-आधारित माहितीच्या आधारे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेतले जात आहेत, असेही ते म्हणाले.
 

 
 
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक (एनसीडीसी) डॉ. एस. के. सिंग म्हणाले की, दिल्लीतील सेरो-सर्व्हेमध्ये 22.86% संसर्ग होण्याचे प्रमाण दर्शविले आहे, जे लॉकडाऊन आणि कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांद्वारे केलेल्या प्रयत्नांची परिणामकारकता दर्शवितात. त्याचवेळी उर्वरित 77% असुरक्षित आहेत. म्हणूनच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे स्वाभाविक आहे की लक्षणे नसलेले काही लोक देखरेख यंत्रणेच्या चाचणीतून निसटले असण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत, सेरो सर्वेक्षण समुदायात कोविड-19 संसर्गाच्या व्यापकतेचे मूल्यांकन करण्यास मदत करते. आयजीएम अँटीबॉडी सक्रिय कोविड-19 संसर्गाचे अस्तित्त्व दर्शविते. परंतु ते संपूर्ण प्रादुर्भावाचे स्पष्ट चित्र देत नाही. दुसरीकडे, आयजीजी अँटीबॉडी शरीरात दीर्घकाळ टिकून राहतात. अॅंन्टीबॉडी डिटेक्शन चाचण्यांमुळे समाजात होणाऱ्या संसर्गाच्या व्यापकतेचे आकलन होण्यास मदत होते, तर आरटी-पीसीआर चाचण्या आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट्स प्रत्यक्षात कोविड-19 रूग्णांच्या उपचारांसाठी उपयुक्त ठरतात. 27 जून ते 10 जुलै या कालावधीत करण्यात आलेला 20,000हून अधिक सहभागींचा सध्याचा सेरो-सर्वे हा दिल्लीच्या प्रतिबंधित क्षेत्रात आयसीएमआरने केलेल्या सीरो-सर्वेचा पाठपुरावा आहे. दिल्लीतील सेरो-सर्व्हेसाठी 1 वर्षावरील सर्व वयोगटाचे नमुने घेण्यात आले होते.
 
नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, एम्स, नवी दिल्ली, आरोग्य मंत्रालय आणि नीती यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड-19बाबत राष्ट्रीय क्लिनिकल ग्रँड राउंडची सुरूवात करत आहे. त्यामुळे डॉक्टरांद्वारे केलेल्या सर्वोत्तम पद्धती आणि पुरावा-आधारित कोविड-19 उपचार समोर आणण्यास मदत करेल. दिल्लीसारख्या दाट लोकवस्ती असलेल्या शहरात सहा महिन्यांनंतरही हा संसर्ग केवळ 23%पर्यंत पोहोचला आहे. हे असे दर्शवते की, सरकार आणि समुदायाद्वारे केलेल्या उपाययोजनांमुळे या पातळीपर्यंत संसर्ग रोखण्यास मदत झाली आहे. यामुळे आम्हाला प्रतिबंधात्मक उपायांच्या परिणामकारकतेबाबत आत्मविश्वास मिळाला आहे. तज्ज्ञांशी सल्लामसलत करून वाढवलेल्या चाचण्या आणि प्रतिबंधात्मक धोरणामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीतील कोविड-19च्या 37% सकारात्मकतेच्या दरापेक्षा नवीन रूग्णांची संख्या आताच्या पातळीवर आली आहे.
लसीच्या चाचण्यांबाबतच्या माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोविड-19 लसीच्या चाचण्यांसाठी आवश्यक वैज्ञानिक, नैदानिक नैतिक कठोरपणा कायम ठेवण्यासाठी प्रत्येक नियमन सुविधा सुनिश्चित केली जात आहे. परवडणारी कोविड-19 लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कोणतीही कसर सोडणार नाही.
 
नीती आयोगाच्या आरोग्य सदस्यांनी चाचणीसंदर्भातील माध्यमांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले की, काही आठवड्यांत दररोज 5 लाखांहून अधिक कोविड चाचणी क्षमता प्राप्त करू आणि आगामी काळात आपण दररोज दहा लाख चाचण्यांचा टप्पा पार करू.
 “

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content