Homeहेल्थ इज वेल्थहज यात्रेकरूंसाठी झाली...

हज यात्रेकरूंसाठी झाली 2 लाख बाह्यरुग्ण विभागांची निर्मिती

यावेळी हज यात्रेकरूंच्या वैद्यकीय सेवेसाठी 356 डॉक्टर आणि पॅरामेडिक्स नियुक्त करण्यात आले होते. यावेळी सुमारे 2 लाख बाह्यरुग्ण विभागांची निर्मिती करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी काल दिली.

केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी काल नवी दिल्लीत, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, “हज यात्रेसाठी वैद्यकीय सेवा व्यवस्था” नावाचे एक दस्तऐवज प्रकाशित केले. त्यावेळी ते बोलत होते. जेद्दाहमधील भारताचे महावाणिज्य दूत मोहम्मद शाहिद आलम दूरदृश्य प्रणालीमार्फत कार्यक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी आणि इतर भागधारकदेखील यावेळी उपस्थित होते.

या दस्तऐवजात आरोग्यसेवांचा आराखडा आणि यात्रेकरूंना त्या सेवांचा कसा लाभ घेता येईल याची माहिती देण्यात आली आहे. या वर्षी भारतातील सुमारे 1,75,025 यात्रेकरूंनी हज यात्रा केली. त्यापैकी अंदाजे 40,000हून अधिक यात्रेकरू 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. या वर्षीच्या प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी यात्रेकरूंना चोवीस तास आरोग्यसेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षापासून मुख आरोग्य आणि दंत आरोग्यसेवादेखील आरोग्य सेवेमध्ये जोडल्या गेल्या आहेत. वैद्यकीय पथकांनी यात्रेकरूंच्या गटांना भेटी देण्यासह या वर्षी जवळपास 2 लाख बाह्यरुग्ण विभाग उघडण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (NIC) मदतीने एक लाइव्ह पोर्टल विकसित केले गेले आहे. हे पोर्टल वैद्यकीय सेवांची गरज असणारे यात्रेकरू आणि त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा यांचा रियल टाईम डेटा आणि विश्लेषण प्रदान करते. यामुळे आम्हाला आमच्या सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात मदत होईल, असेही चंद्रा म्हणाले.

Continue reading

आता विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांतच मिळणार एसटीचे पास

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी-विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून त्यामुळे आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी...

रत्नागिरी, रायगड जिल्हयाला पुढच्या २४ तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट

भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढच्या २४ तासांसाठी महाराष्ट्रातल्या रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांना रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदूर्ग यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरीता सतर्क राहण्याच्या...

पंतप्रधान मोदी 4 दिवसांच्या परदेशवारीसाठी रवाना

पाकिस्तानवरच्या लष्करी कारवाईनंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याकरीता रवाना झाले. या दौऱ्यात पंतप्रधान सायप्रस प्रजासत्ताक, कॅनडा आणि क्रोएशिया या तीन देशांना भेटी देतील. येत्या ते 19 जूनला पंतप्रधान मोदी मायदेशी परततील. सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदीस यांच्या निमंत्रणावरुन...
Skip to content