Homeहेल्थ इज वेल्थहज यात्रेकरूंसाठी झाली...

हज यात्रेकरूंसाठी झाली 2 लाख बाह्यरुग्ण विभागांची निर्मिती

यावेळी हज यात्रेकरूंच्या वैद्यकीय सेवेसाठी 356 डॉक्टर आणि पॅरामेडिक्स नियुक्त करण्यात आले होते. यावेळी सुमारे 2 लाख बाह्यरुग्ण विभागांची निर्मिती करण्यात आली होती, अशी माहिती केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी काल दिली.

केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी काल नवी दिल्लीत, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने, “हज यात्रेसाठी वैद्यकीय सेवा व्यवस्था” नावाचे एक दस्तऐवज प्रकाशित केले. त्यावेळी ते बोलत होते. जेद्दाहमधील भारताचे महावाणिज्य दूत मोहम्मद शाहिद आलम दूरदृश्य प्रणालीमार्फत कार्यक्रमात सहभागी झाले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी आणि इतर भागधारकदेखील यावेळी उपस्थित होते.

या दस्तऐवजात आरोग्यसेवांचा आराखडा आणि यात्रेकरूंना त्या सेवांचा कसा लाभ घेता येईल याची माहिती देण्यात आली आहे. या वर्षी भारतातील सुमारे 1,75,025 यात्रेकरूंनी हज यात्रा केली. त्यापैकी अंदाजे 40,000हून अधिक यात्रेकरू 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. या वर्षीच्या प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक आव्हानांना तोंड देण्यासाठी यात्रेकरूंना चोवीस तास आरोग्यसेवा उपलब्ध असणे आवश्यक आहे. गेल्या वर्षापासून मुख आरोग्य आणि दंत आरोग्यसेवादेखील आरोग्य सेवेमध्ये जोडल्या गेल्या आहेत. वैद्यकीय पथकांनी यात्रेकरूंच्या गटांना भेटी देण्यासह या वर्षी जवळपास 2 लाख बाह्यरुग्ण विभाग उघडण्यात आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (NIC) मदतीने एक लाइव्ह पोर्टल विकसित केले गेले आहे. हे पोर्टल वैद्यकीय सेवांची गरज असणारे यात्रेकरू आणि त्यांना प्रदान केल्या जाणाऱ्या आरोग्यसेवा यांचा रियल टाईम डेटा आणि विश्लेषण प्रदान करते. यामुळे आम्हाला आमच्या सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्यात मदत होईल, असेही चंद्रा म्हणाले.

Continue reading

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...

भारतातल्या लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत!

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी भक्कमपणे उभारले. पण आज विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून भारतातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना  लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत असल्याचे दृष्टीस पडत आहे.  देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे...

विनय आपटे प्रतिष्ठानच्या स्पर्धेत ‘मुक्ता’ सर्वप्रथम!

विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्स्च्या मुक्ता, ह्या लघुपटला प्रथम परितोषिक मिळाले. 15 हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांवरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला, ह्या लघुपटाला तर तिसरा क्रमांक ब्लॅक...
Skip to content