Homeन्यूज ॲट अ ग्लांसपेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. दैनंदिन स्तरावर हा आकडा १,६०० ते १,७०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या वर स्थिर राहिल्याने या कंपन्यांवर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे इंधन दरवाढ आता अटळ असल्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्याच्या आकडेवारीनुसार, तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर १४ ते १८ रुपये आणि डिझेलवर १८ ते ३५ रुपयांपर्यंत तोटा (अंडर-रिकव्हरी) सहन करावा लागत आहे. गेल्या चार वर्षांपासून किरकोळ विक्री दरात मोठी वाढ करण्यात आली नसली तरी, आता वाढत्या तोट्यामुळे १५ मे २०२६पर्यंत इंधन दरात प्रति लिटर ४ ते ५ रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जरी पेट्रोलियम मंत्रालयाने सध्यातरी ‘तातडीने दरवाढ करण्याचा कोणताही अधिकृत प्रस्ताव नाही’ असे म्हटले असले तरी, वाढती आर्थिक तूट आणि तेल कंपन्यांची ढासळती स्थिती पाहता ही दरवाढ अधिक काळ रोखणे सरकारला कठीण जाणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच देशाला उद्देशून केलेल्या भाषणात इंधन बचतीचे आवाहन केले आहे, ज्यामुळे दरवाढीच्या शक्यतांना अधिक बळ मिळाले आहे. परकीय चलन साठ्यावरील ताण कमी करण्यासाठी नागरिकांनी कारपूलिंग आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला आहे. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील विस्कळीत पुरवठ्यामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेली ऊर्जेची टंचाई आणि इंधनासाठी द्यावे लागणारे वाढीव परकीय चलन लक्षात घेता, सरकार आता ग्राहकांना या जागतिक महागाईचे चटके हळूहळू सोसावे लागण्याची पूर्वतयारी करत असल्याचे दिसून येत आहे.

तेल कंपन्यांचा तोटा (प्रति लिटर)

  • पेट्रोल: १४ ते १८ रुपये
  • डिझेल: १८ ते ३५ रुपये
  • दैनंदिन तोटा: १,६०० ते १,७०० कोटी
  • दरमहा तोटा: ३०,००० कोटी रुपयये
  • संभाव्य दरवाढ: ४ ते ५ रुपये प्रति लिटर

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content