HomeArchiveरसिकांनी अनुभवली संगीत...

रसिकांनी अनुभवली संगीत नाटकांची अनोखी पर्वणी!

Details
रसिकांनी अनुभवली संगीत नाटकांची अनोखी पर्वणी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईचे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आयोजित व विमल ट्रस्ट यांच्या सहयोगाने संगीतनाट्य महोत्सव नुकताच साजरा झाला. गेली अनेक वर्षे असा महोत्सव केंद्राच्या वतीने आयोजित केला जातो. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, गोवा या ठिकाणच्या नाट्यसंस्थांचे संगीत नाटकांचे प्रयोग महोत्सवात होतात. यंदादेखील अत्यंत उत्साहात रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला.

 

मुंबईबाहेरच्या संस्थांना मुंबईत प्रयोग करण्यासाठी रंगमंच मिळावा, या उद्देशाने आणि संगीत नाटकांची समृद्ध परंपरा अखंडित चालू राहवी, अशा विचाराने हा संगीतनाट्य महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याचे केंद्राचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध नाटककार सुरेश खरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विशद केले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सांगलीच्या देवल स्मारक मंदिर या संस्थेचे संगीत मंदारमाला, हे नाटक सादर झाले. पं. विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन व संगीत मार्गदर्शन शरद बापट यांनी केले होते. मंदारमाला हे नाटक प्रचंड लोकप्रियता मिळवलेले संगीतनाटक आहे. अभिषेक काळे, श्रद्धा जोशी, देवदत्त पेशकार यांच्या गाण्याला रसिकांनी भरपूर दाद दिली. नाटकाच्या तिसऱ्या अंकाच्या दरबाराच्या प्रवेशाचे नेपथ्य उल्लेखनीय होते.

 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ या रत्नागिरीच्या नाट्यसंस्थेने संगीत मानापमान, सादर केले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाचे मूळ संगीत गोविंदराव टेंबे यांनी दिलेले होते. यातील लोकप्रिय नाट्यगीतांना प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या. वामनराव जोग यांचे दिग्दर्शन तर त्यांची लक्ष्मीधराची भूमिका, प्रवीण शिलकर यांची धैर्यधर आणि सिद्धी बोंद्रे यांची भामिनी यांचे गद्यसंवाद आणि नाट्यगीते यामुळे नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. नाटकाच्या यशात निखिल रानडे यांचा तबला आणि विलास हर्षे यांचा ऑर्गन यांचा सहभागही मोठा होता.

 

तिसऱ्या दिवशी रत्नागिरीच्या खल्वायन या संस्थेचे संगीत संशयकल्लोळ, हे नाटक आयोजित केले होते. गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले हे नाटक महोत्सवात मनोहर जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झाले. नाटकातील गाजलेल्या नाट्यगीतांबरोबरच नाटकाचे गद्यसंवाद यामुळे नाटक खूप रंगले. अश्विनशेठची भूमिका करणारे प्रवीण शिलकर आणि रेवतीची भूमिका करणाऱ्या श्वेता जोगळेकर यांचा अभिनय आणि गायकीला प्रेक्षकांची मनमोकळी दादर मिळत होती. मनोहर जोशी यांचा फाल्गुनशेठ, विजय जोशी यांचा भादव्या आणि शमिका जोशी यांची कृतिका यांच्या अभिनयाने प्रेक्षक रंगून गेले होते. नाटकातील गीतांना निखिल रानडे यांची तबला साथ तर मधुसूदन लेले यांची आर्गन साथ लाभली होती. महोत्सवातील तिन्ही नाटके आधी पाहिलेल्या प्रेक्षकांना पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. नव्याने पाहिलेल्या प्रेक्षकांना आपल्या समृद्ध संगीत रंगभूमीची ओळख झाली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईचे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आयोजित व विमल ट्रस्ट यांच्या सहयोगाने संगीतनाट्य महोत्सव नुकताच साजरा झाला. गेली अनेक वर्षे असा महोत्सव केंद्राच्या वतीने आयोजित केला जातो. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, गोवा या ठिकाणच्या नाट्यसंस्थांचे संगीत नाटकांचे प्रयोग महोत्सवात होतात. यंदादेखील अत्यंत उत्साहात रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला.

 

मुंबईबाहेरच्या संस्थांना मुंबईत प्रयोग करण्यासाठी रंगमंच मिळावा, या उद्देशाने आणि संगीत नाटकांची समृद्ध परंपरा अखंडित चालू राहवी, अशा विचाराने हा संगीतनाट्य महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याचे केंद्राचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध नाटककार सुरेश खरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विशद केले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सांगलीच्या देवल स्मारक मंदिर या संस्थेचे संगीत मंदारमाला, हे नाटक सादर झाले. पं. विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन व संगीत मार्गदर्शन शरद बापट यांनी केले होते. मंदारमाला हे नाटक प्रचंड लोकप्रियता मिळवलेले संगीतनाटक आहे. अभिषेक काळे, श्रद्धा जोशी, देवदत्त पेशकार यांच्या गाण्याला रसिकांनी भरपूर दाद दिली. नाटकाच्या तिसऱ्या अंकाच्या दरबाराच्या प्रवेशाचे नेपथ्य उल्लेखनीय होते.

 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ या रत्नागिरीच्या नाट्यसंस्थेने संगीत मानापमान, सादर केले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाचे मूळ संगीत गोविंदराव टेंबे यांनी दिलेले होते. यातील लोकप्रिय नाट्यगीतांना प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या. वामनराव जोग यांचे दिग्दर्शन तर त्यांची लक्ष्मीधराची भूमिका, प्रवीण शिलकर यांची धैर्यधर आणि सिद्धी बोंद्रे यांची भामिनी यांचे गद्यसंवाद आणि नाट्यगीते यामुळे नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. नाटकाच्या यशात निखिल रानडे यांचा तबला आणि विलास हर्षे यांचा ऑर्गन यांचा सहभागही मोठा होता.

 

तिसऱ्या दिवशी रत्नागिरीच्या खल्वायन या संस्थेचे संगीत संशयकल्लोळ, हे नाटक आयोजित केले होते. गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले हे नाटक महोत्सवात मनोहर जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झाले. नाटकातील गाजलेल्या नाट्यगीतांबरोबरच नाटकाचे गद्यसंवाद यामुळे नाटक खूप रंगले. अश्विनशेठची भूमिका करणारे प्रवीण शिलकर आणि रेवतीची भूमिका करणाऱ्या श्वेता जोगळेकर यांचा अभिनय आणि गायकीला प्रेक्षकांची मनमोकळी दादर मिळत होती. मनोहर जोशी यांचा फाल्गुनशेठ, विजय जोशी यांचा भादव्या आणि शमिका जोशी यांची कृतिका यांच्या अभिनयाने प्रेक्षक रंगून गेले होते. नाटकातील गीतांना निखिल रानडे यांची तबला साथ तर मधुसूदन लेले यांची आर्गन साथ लाभली होती. महोत्सवातील तिन्ही नाटके आधी पाहिलेल्या प्रेक्षकांना पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. नव्याने पाहिलेल्या प्रेक्षकांना आपल्या समृद्ध संगीत रंगभूमीची ओळख झाली.”
 
 
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content