HomeArchiveरसिकांनी अनुभवली संगीत...

रसिकांनी अनुभवली संगीत नाटकांची अनोखी पर्वणी!

Details
रसिकांनी अनुभवली संगीत नाटकांची अनोखी पर्वणी!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईचे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आयोजित व विमल ट्रस्ट यांच्या सहयोगाने संगीतनाट्य महोत्सव नुकताच साजरा झाला. गेली अनेक वर्षे असा महोत्सव केंद्राच्या वतीने आयोजित केला जातो. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, गोवा या ठिकाणच्या नाट्यसंस्थांचे संगीत नाटकांचे प्रयोग महोत्सवात होतात. यंदादेखील अत्यंत उत्साहात रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला.

 

मुंबईबाहेरच्या संस्थांना मुंबईत प्रयोग करण्यासाठी रंगमंच मिळावा, या उद्देशाने आणि संगीत नाटकांची समृद्ध परंपरा अखंडित चालू राहवी, अशा विचाराने हा संगीतनाट्य महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याचे केंद्राचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध नाटककार सुरेश खरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विशद केले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सांगलीच्या देवल स्मारक मंदिर या संस्थेचे संगीत मंदारमाला, हे नाटक सादर झाले. पं. विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन व संगीत मार्गदर्शन शरद बापट यांनी केले होते. मंदारमाला हे नाटक प्रचंड लोकप्रियता मिळवलेले संगीतनाटक आहे. अभिषेक काळे, श्रद्धा जोशी, देवदत्त पेशकार यांच्या गाण्याला रसिकांनी भरपूर दाद दिली. नाटकाच्या तिसऱ्या अंकाच्या दरबाराच्या प्रवेशाचे नेपथ्य उल्लेखनीय होते.

 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ या रत्नागिरीच्या नाट्यसंस्थेने संगीत मानापमान, सादर केले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाचे मूळ संगीत गोविंदराव टेंबे यांनी दिलेले होते. यातील लोकप्रिय नाट्यगीतांना प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या. वामनराव जोग यांचे दिग्दर्शन तर त्यांची लक्ष्मीधराची भूमिका, प्रवीण शिलकर यांची धैर्यधर आणि सिद्धी बोंद्रे यांची भामिनी यांचे गद्यसंवाद आणि नाट्यगीते यामुळे नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. नाटकाच्या यशात निखिल रानडे यांचा तबला आणि विलास हर्षे यांचा ऑर्गन यांचा सहभागही मोठा होता.

 

तिसऱ्या दिवशी रत्नागिरीच्या खल्वायन या संस्थेचे संगीत संशयकल्लोळ, हे नाटक आयोजित केले होते. गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले हे नाटक महोत्सवात मनोहर जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झाले. नाटकातील गाजलेल्या नाट्यगीतांबरोबरच नाटकाचे गद्यसंवाद यामुळे नाटक खूप रंगले. अश्विनशेठची भूमिका करणारे प्रवीण शिलकर आणि रेवतीची भूमिका करणाऱ्या श्वेता जोगळेकर यांचा अभिनय आणि गायकीला प्रेक्षकांची मनमोकळी दादर मिळत होती. मनोहर जोशी यांचा फाल्गुनशेठ, विजय जोशी यांचा भादव्या आणि शमिका जोशी यांची कृतिका यांच्या अभिनयाने प्रेक्षक रंगून गेले होते. नाटकातील गीतांना निखिल रानडे यांची तबला साथ तर मधुसूदन लेले यांची आर्गन साथ लाभली होती. महोत्सवातील तिन्ही नाटके आधी पाहिलेल्या प्रेक्षकांना पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. नव्याने पाहिलेल्या प्रेक्षकांना आपल्या समृद्ध संगीत रंगभूमीची ओळख झाली.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
[email protected]
मुंबईचे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आयोजित व विमल ट्रस्ट यांच्या सहयोगाने संगीतनाट्य महोत्सव नुकताच साजरा झाला. गेली अनेक वर्षे असा महोत्सव केंद्राच्या वतीने आयोजित केला जातो. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, गोवा या ठिकाणच्या नाट्यसंस्थांचे संगीत नाटकांचे प्रयोग महोत्सवात होतात. यंदादेखील अत्यंत उत्साहात रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घेतला.

 

मुंबईबाहेरच्या संस्थांना मुंबईत प्रयोग करण्यासाठी रंगमंच मिळावा, या उद्देशाने आणि संगीत नाटकांची समृद्ध परंपरा अखंडित चालू राहवी, अशा विचाराने हा संगीतनाट्य महोत्सव आयोजित करण्यात येत असल्याचे केंद्राचे कार्याध्यक्ष व प्रसिद्ध नाटककार सुरेश खरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात विशद केले.

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सांगलीच्या देवल स्मारक मंदिर या संस्थेचे संगीत मंदारमाला, हे नाटक सादर झाले. पं. विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन व संगीत मार्गदर्शन शरद बापट यांनी केले होते. मंदारमाला हे नाटक प्रचंड लोकप्रियता मिळवलेले संगीतनाटक आहे. अभिषेक काळे, श्रद्धा जोशी, देवदत्त पेशकार यांच्या गाण्याला रसिकांनी भरपूर दाद दिली. नाटकाच्या तिसऱ्या अंकाच्या दरबाराच्या प्रवेशाचे नेपथ्य उल्लेखनीय होते.

 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ या रत्नागिरीच्या नाट्यसंस्थेने संगीत मानापमान, सादर केले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित या नाटकाचे मूळ संगीत गोविंदराव टेंबे यांनी दिलेले होते. यातील लोकप्रिय नाट्यगीतांना प्रेक्षकांच्या टाळ्या मिळाल्या. वामनराव जोग यांचे दिग्दर्शन तर त्यांची लक्ष्मीधराची भूमिका, प्रवीण शिलकर यांची धैर्यधर आणि सिद्धी बोंद्रे यांची भामिनी यांचे गद्यसंवाद आणि नाट्यगीते यामुळे नाटक उत्तरोत्तर रंगत गेले. नाटकाच्या यशात निखिल रानडे यांचा तबला आणि विलास हर्षे यांचा ऑर्गन यांचा सहभागही मोठा होता.

 

तिसऱ्या दिवशी रत्नागिरीच्या खल्वायन या संस्थेचे संगीत संशयकल्लोळ, हे नाटक आयोजित केले होते. गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले हे नाटक महोत्सवात मनोहर जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली सादर झाले. नाटकातील गाजलेल्या नाट्यगीतांबरोबरच नाटकाचे गद्यसंवाद यामुळे नाटक खूप रंगले. अश्विनशेठची भूमिका करणारे प्रवीण शिलकर आणि रेवतीची भूमिका करणाऱ्या श्वेता जोगळेकर यांचा अभिनय आणि गायकीला प्रेक्षकांची मनमोकळी दादर मिळत होती. मनोहर जोशी यांचा फाल्गुनशेठ, विजय जोशी यांचा भादव्या आणि शमिका जोशी यांची कृतिका यांच्या अभिनयाने प्रेक्षक रंगून गेले होते. नाटकातील गीतांना निखिल रानडे यांची तबला साथ तर मधुसूदन लेले यांची आर्गन साथ लाभली होती. महोत्सवातील तिन्ही नाटके आधी पाहिलेल्या प्रेक्षकांना पुनःप्रत्ययाचा आनंद देऊन गेली. नव्याने पाहिलेल्या प्रेक्षकांना आपल्या समृद्ध संगीत रंगभूमीची ओळख झाली.”
 
 
 

Continue reading

शिवसेना खटलाः विधिमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्षाचेच वर्चस्व!

शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या वादावर उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटाच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात बुधवारी, ५ ऑगस्ट रोजी महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाचे ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी तब्बल तीन तास जोरदार युक्तीवाद करत, विधानसभा...

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...
Skip to content