HomeArchiveमुंबईत नौदलाच्या बोटींना...

मुंबईत नौदलाच्या बोटींना `कारगिल’ भेट?

Details
मुंबईत नौदलाच्या बोटींना `कारगिल’ भेट?

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
कारगिल विजयदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना नि शालेय विद्यार्थ्यांना भारतीय नौदलाच्या आघाडीच्या विनाशिका आयएनएस चेन्नई आणि आयएनएस मुंबई यांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. २६-२७ जुलै रोजी नेव्हल डॉकयार्ड येथे ही भेट मिळेल. मागील वेळी, ऐनवेळी सुरक्षेच्या नावाखाली ही भेट रद्द झाली होती हे लक्षात घेऊन संबंधितांनी भेटीचं नियोजन करावे. या दोन दिवसांत पहिला दिवस शालेय विद्यार्थ्यांना दिला असून त्यात इयत्ता पाचवी आणि त्यावरील विद्यार्थ्यांना या बोटी पाहता येतील तर दुसरा दिवस सर्वसामान्य जनतेला दिला आहे.

 
यासाठी कोणतेही सरकारी ओळखपत्र, आधारकार्ड फोटोसह ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची बॅग, मोबाईल, कॅमेरा जवळ बाळगण्याची परवानगी नाही. प्रवेश मुंबईच्या नेहमीच्या बलार्ड पिअर, टायगर गेट येथून दिला जाईल. सकाळी ९ ते ५ या काळात दोन बोटी पाहता येतील. बरोबर वीस वर्षांपूर्वी पाकिस्तानने तीन मेला द्रास, कारगिल भागात आक्रमण करून युद्ध छेडलं. मेंढपालांनी या डोंगरी भागात पाकडे बसल्याचे सांगितल्यावर युद्धाला सुरूवात झाली. त्यांना हुसकावण्यासाठी त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी २६ जुलैला ते संपुष्टात आले. १८ हजार फूट डोक्यावर असलेल्या शत्रूला पराभवाची धूळ चारताना ५२७ वीरांना आपण गमावलं तर १३०० जणांना जखमी अवस्थेत जगावं लागलं. काही अपंगही झाले तर ३५७ पाकडे ठार तर ६६५ जखमी झाले. भारतीय अहवालात १२०० मारले गेले. ते पाकिस्तान नाकारत आला आहे शेवटच्या टप्प्यात भारतीय वायूदलाच्या हल्ल्याने पाकचे कंबरडे मोडले नि विजय मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात भयानक युद्ध असे त्याचे वर्णन करतात, त्या शहीद वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
कारगिल विजयदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना नि शालेय विद्यार्थ्यांना भारतीय नौदलाच्या आघाडीच्या विनाशिका आयएनएस चेन्नई आणि आयएनएस मुंबई यांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. २६-२७ जुलै रोजी नेव्हल डॉकयार्ड येथे ही भेट मिळेल. मागील वेळी, ऐनवेळी सुरक्षेच्या नावाखाली ही भेट रद्द झाली होती हे लक्षात घेऊन संबंधितांनी भेटीचं नियोजन करावे. या दोन दिवसांत पहिला दिवस शालेय विद्यार्थ्यांना दिला असून त्यात इयत्ता पाचवी आणि त्यावरील विद्यार्थ्यांना या बोटी पाहता येतील तर दुसरा दिवस सर्वसामान्य जनतेला दिला आहे.

 
यासाठी कोणतेही सरकारी ओळखपत्र, आधारकार्ड फोटोसह ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, कोणत्याही प्रकारची बॅग, मोबाईल, कॅमेरा जवळ बाळगण्याची परवानगी नाही. प्रवेश मुंबईच्या नेहमीच्या बलार्ड पिअर, टायगर गेट येथून दिला जाईल. सकाळी ९ ते ५ या काळात दोन बोटी पाहता येतील. बरोबर वीस वर्षांपूर्वी पाकिस्तानने तीन मेला द्रास, कारगिल भागात आक्रमण करून युद्ध छेडलं. मेंढपालांनी या डोंगरी भागात पाकडे बसल्याचे सांगितल्यावर युद्धाला सुरूवात झाली. त्यांना हुसकावण्यासाठी त्यानंतर जवळपास तीन महिन्यांनी २६ जुलैला ते संपुष्टात आले. १८ हजार फूट डोक्यावर असलेल्या शत्रूला पराभवाची धूळ चारताना ५२७ वीरांना आपण गमावलं तर १३०० जणांना जखमी अवस्थेत जगावं लागलं. काही अपंगही झाले तर ३५७ पाकडे ठार तर ६६५ जखमी झाले. भारतीय अहवालात १२०० मारले गेले. ते पाकिस्तान नाकारत आला आहे शेवटच्या टप्प्यात भारतीय वायूदलाच्या हल्ल्याने पाकचे कंबरडे मोडले नि विजय मिळाला. दुसऱ्या महायुद्धानंतरचे सर्वात भयानक युद्ध असे त्याचे वर्णन करतात, त्या शहीद वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content