HomeArchive'मनसे'चा सवाल, हे...

‘मनसे’चा सवाल, हे सरकारसुद्धा राजकीय बळी घेणार?

Details

 
केएचएल न्युज ब्युरो
hegdekiran17@gmail.com
 
“राज्यात कधी नव्हे तर कोरोनाच्या साथीचा प्रकोप झाला आहे. यातच सरकारने पुण्याच्या ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली केली. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पसंतीला न उतरणाऱ्या अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्याचे सत्र चालू आहे. विद्यमान ठाकरे सरकारही त्याला अपवाद नाही असे दिसताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हे सरकारही राजकीय बळी घेणार का, असा सवाल केला आहे.”
 
त्यांनी पाठवलेले पत्र थोडक्यात याप्रमाणे..
 
‘ससून’ रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची राज्य सरकारने बुधवारी सायंकाळी तडकाफडकी बदली केली व त्यांच्याकडे पहिल्यापासून असलेला वैद्यकीय शिक्षण खात्याचा सहसंचालकपदाचा कार्यभार पूर्ण वेळ सोपविण्यात आला आहे. ‘ससून’ रूग्णालयात ‘कोरोना’च्या रूग्णांचा मृत्यूदर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही बदली करण्यात आली आहे असे जरी सरकारकडून भासवण्यात येत असले तरी सरकारमधील इतर राजकीय पक्षाची मर्जी सांभाळण्यासाठी चंदनवाले याचा बळी घेण्यात आला आहे हे आम्हाला माहित आहे. गेले ४ दिवस शहरातील काँग्रेसचा त्या भागातील एक नगरसेवक त्यासंदर्भात बोलत होते. ससून रूग्णालयात स्थानिक राजकारण्यांच्या हस्तक्षेपास ससून रूग्णालयात केलेली बंदी हे प्रमुख छुपे कारण या बदलीमागे आहे. आणि अशा पद्धतीने होणाऱ्या बदल्या या त्या-त्या क्षेत्रात सेवा देणाऱ्या सेवकाच्या व अधिकाऱ्याच्या मनात भीती निर्माण करतात. इतकेच नाही तर या सर्वांचा परिणाम त्यांच्या कामावरदेखील होतो.
 
डॉ. चंदनवाले यांची जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांत राज्य सरकारने त्यांची पुन्हा पुण्यात बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात बदली केली आणि आता पुन्हा त्याची बदली करण्यात अत्त्यंत वाईट पद्धतीने करण्यात आली हे गंभीर आहे.
 
“कोरोनाच्या संसर्ग काळात महाराष्ट्रातील सर्वात जास्त रूग्ण पुण्यातदेखील सापडले. पुण्यात ‘कोरोना’चा संसर्ग सुरू झाला आणि ‘कोरोना’च्या संसर्गाने सर्वाधिक मृत्यू ससून रूग्णालयामध्ये होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून ससून रूग्णालयावर टीकेची झोड उठविली जात होती. मात्र, वास्तव कोणी लक्षात घेत नव्हते. जे रूग्ण उपचारास प्रतिसाद देणे कमी करू लागतात असे रूग्ण ससूनमध्ये पाठवण्यात येतात. त्यामुळे रूग्णालयात येणारा रूग्ण हा अंतिम टप्प्यात येत असल्याने चोवीस तासही ससूनमध्ये रूग्णावर उपचाराची संधी डॉक्टरांना मिळत नाही हे वास्तव आहे. पण याच गोष्टीचा आधार घेत काही हिशोब चुकते करण्यात आले व राजकीय हितसंबधांना प्राधान्य देत सरकारने डॉ. चंदनवाले यांचा बळी घेतला आहे.”
 
“विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ‘ससून’मध्ये होणाऱ्या उपचाराबाबत ‘प्रोटोकॉल’साठी समिती स्थापन केली व त्या समितीचे काम नुकतेच सुरू झाले असताना डॉ. चंदनवाले यांची बदली झाली हे प्रशासकीयदृष्ट्याही अत्यंत गंभीर आहे. तरी आपण डॉ. अजय चंदनवाले यांची बदली रद्द करण्यासंदर्भात निर्णय घ्यावा ही नम्र विनंती.”
 

Continue reading

पवई व विहार तलाव, पासपोली परिसरातले वन्यजीव धोक्यात!

मुंबईतील पवई तलाव, पासपोली आणि विहार तलाव परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामामुळे आणि या अत्यंत संवेदनशील क्षेत्रांमधील मोठ्या प्रमाणावरील बांधकाम व ध्वनिप्रदूषणामुळे येथील नागरी वन्यजीव अधिवासाचे भरून न येणारे नुकसान होत आहे. हे मुंबई उच्च न्यायालयाने 2022मध्ये दिलेल्या आदेशांचे...

मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाच्या मदतीने झाले यशस्वी यकृत प्रत्यारोपण

आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे यकृत प्रत्यारोपणाचा खर्च उचलणे अशक्य झाले होते. उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची आवश्यकता असताना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्टच्या आर्थिक मदतीमुळे अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात...

आजपासून अमेरिकेत रंगणार तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल!

मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तिसरा नाफा फिल्म फेस्टिव्हल २०२६  आजपासून ९ ऑगस्टपर्यंत अमेरिकेतील कॅलिफोर्निया थिएटर, सॅन होजे येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने आयोजित या महोत्सवात तीन दिवस चित्रपट, लघुपट, जागतिक प्रीमिअर्स, दिग्गज कलाकारांचे मास्टरक्लासेस, कार्यशाळा, मीट अँड ग्रीट, चर्चासत्रे आणि पुरस्कार सोहळ्यांचा बहारदार संगम अनुभवायला मिळणार असल्याचे नाफाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप यांनीं जाहीर केले आहे. पहिला दिवस: रेड कार्पेट, फॅशन शो आणि दिमाखदार पुरस्कार सोहळा आज, शुक्रवार, ७ ऑगस्ट रोजी महोत्सवाची सुरुवात सेलिब्रिटींच्या उपस्थितीत भव्य रेड कार्पेटने होईल. सायंकाळी अतिथी नोंदणी, माध्यमांसाठी मीडिया लाऊंज, रेड कार्पेट आगमन, आकर्षक फॅशन शो आणि त्यानंतर रंगणारा Awards Night Gala हे पहिल्या दिवसाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांचा गौरव केला जाणार आहे. दुसरा दिवस: वर्ल्ड प्रीमिअर्स, सेलिब्रिटी मास्टरक्लासेस आणि कार्यशाळांचा मेळावा शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळपासून विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. उद्घाटन समारंभानंतर अनेक बहुप्रतिक्षित चित्रपटांचे जागतिक प्रीमिअर्स आयोजित करण्यात आले  आहेत. त्यामध्ये 'ना आवडती गोष्ट', 'तू, मी आणि अमायरा' आणि 'द्विधा' या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ButterScotch, Bramhakamal, Ek Suvarna Pravas, Hyphen आणि NAFA निर्मित विशेष लघुपट यांचेही प्रीमिअर होणार आहेत. या दिवशी प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी, दिग्दर्शक नागराज मंजुळे, अभिनेत्री गिरीजा ओक, श्रुती मराठे आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांचे विशेष मास्टरक्लासेस आयोजित  करण्यात आले आहेत. उदयोन्मुख कलाकार, लेखक आणि चित्रपट अभ्यासकांना या सत्रांमधून थेट दिग्गजांकडून शिकण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय अर्चना जोगळेकर, अजिंक्य देव, महेश कोठारे, तृप्ती भोईर, सई देवधर आणि गार्गी कुलकर्णी यांच्यासोबत 'Meet & Greet' कार्यक्रम होणार असून रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची संधी मिळेल. कार्यशाळांमध्ये अतुल कुलकर्णी यांचे Micro Drama, अर्चना जोगळेकर यांचे विशेष सत्र, महेश कोठारे, नागराज मंजुळे आणि अजिंक्य देव यांचा Director's Grid तसेच ABP माझाच्या कार्यकारी संपादिका सरिता कौशिक यांच्यासोबत Coffee with...
Skip to content