HomeArchiveपुढचे ४८ तास...

पुढचे ४८ तास महत्त्वाचे!

Details

 

 
 
केएचएल न्यूज ब्युरो

 
“दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतकेच सांगितले की, “राज्याला सरकार हवे आहे आणि सरकार लवकरात लवकर स्थापन होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.” मात्र या बोलण्यात कुठेही हे सरकार महायुतीचे असेल असे उद्गार त्यांनी काढले नाहीत, ही बाब महत्त्वाची मानली जाते आहे. त्यामुळेच भाजपप्रणित नवे सरकार सध्यातरी, २०१४ प्रमाणे, शिवसेनेला वगळून भाजपासह अन्य मित्रपक्षांचे असण्याची शक्यता दिल्लीतील सूत्रांनी व्यक्त केली आहे.”
 

“दरम्यान, शिवसेनेसोबत स्थापन करायच्या संभाव्य संयुक्त राज्य सरकारसाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सोनिया गांधींची संमती घेतल्याचेही संकेत दिल्लीतून मिळत आहेत. सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर स्वतः शरदरावांनी असे सांगितले आहे की, अद्याप शिवसेनेकडून सरकार स्थापन करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आमच्यापुढे आलेला नाही. मात्र सोनिया गांधींबरोबर जी चर्चा झाली ती उद्या मुंबईत पक्षातली अन्य सहकाऱ्यांपुढे मांडणार आहे व त्यानंतर पुन्हा दिल्लीत सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी येणार आहे असे ते म्हणाले.”
 
 
“दरम्यान, अमित शाह यांनी फडणवीस यांना असे स्पष्ट आदेश दिले आहेत की शिवसेनेला मुख्यमंत्रीपद वा गृहमंत्रीपद वगळून काहीही देता येईल. मात्र तो तिढा तुम्ही तुमच्या स्तरावरच सोडवा. काही झाले तरी पुढच्या काही दिवसांतच सरकार स्थापन केले जाणे हेही अपिरहार्य मानले जात आहे. या त्यांच्या उद्गारांवरून पुन्हा एकदा विविध पक्षांची मोट बांधून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली शरद पवार घडवतील असे दिसते आहे. या नव्या पुलोदच्या प्रयोगात शिवसेनेची भूमिका मोठी असेल. त्यांच्याकडे सर्वाधिक आमदार असल्यामुळे मुख्यमंत्रीपद सेनेकडे सोपवले जाऊ शकते. मात्र सरकार स्थापनेसाठी अत्यावश्यक असणारा काँग्रेसचा पठिंबा शिवसेनेला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार असल्यामुळे त्या सरकारवर सेनेपेक्षा राष्ट्रवादीची छाप व सत्ता अधिक असू शकेल. त्या स्थितीत शिवसेनेकडे क्रमांक एकचे पद मात्र महत्त्वाची खात्यातील व एक वा दोन, उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे जाऊ शकतील असे अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहेत.”
 
 
तिकडे दिल्लीत फडणवीस यांनी नितीन गडकरींसह अन्य नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्या आटोपून मुख्यमंत्री रात्री उशिरा मुंबईत परतले. मंगळवारी ते पक्षातील त्यांच्या वरिष्ठ सहकाऱ्यांबरोबर बैठक घेत आहेत. या बैठकीत भाजपाची पुढची रणनीती ठरेल असे सांगण्यात येते. या सर्व घडामोडींवरून पुढचे दोन दिवस म्हणजे कत्तलकी रात व दिन असणार आहेत.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content