HomeArchiveजोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर...

जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा – रविंद्र वायकर

Details
जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा – रविंद्र वायकर

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

केएचएल न्यूज ब्युरो
मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. अशातच मुंबईच्या शहर, पूर्व व पश्‍चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळण्यात येते. परंतु पूर्व उपनगरांतील उदयोन्मुख खेळाडूंना अद्ययावत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या भुखंडावर क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात यावे, अशी विनंती विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.

पश्‍चिम उपनगराबरोबरच पूर्व उपनगरातील अनेक क्रिकेटपटू राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु जोगेश्‍वरी परिसरात व उपनगरांमध्ये क्रिकेट या खेळाकरीता स्टेडियम उपलब्ध नसल्याने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले क्रीडानैपूण्य चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस आरे येथे असलेला रिक्त भूखंड स्टेडियमसाठी आरक्षित करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

याठिकाणी अद्यावत स्टेडियम उभे राहिल्यास क्रिकेटपटूंच्या नैपुण्यात अधिक चांगल्या पद्धतीने वाढ तर होईलच, पण यामुळे राज्याचे तसेच देशाचादेखील नावलौकीक वाढण्यास मदत होईल. देशासाठी भावी क्रिकेटपटू तयार करण्यासाठी या स्टेडियमच्या उभारणीसाठी येणारा खर्च, हा खर्च न समजता भविष्यातील तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी गुंतवणूक असणार असल्याचे मतही वायकर यांनी व्यक्त केले आहे.

उदयोन्मुख खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करुन आरेमध्ये उपरोक्त आरक्षित जागेवर वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ५० कोटींची विशेष तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.”
 
“केएचएल न्यूज ब्युरो
मुंबई ही क्रिकेटची पंढरी समजली जाते. अशातच मुंबईच्या शहर, पूर्व व पश्‍चिम उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळण्यात येते. परंतु पूर्व उपनगरांतील उदयोन्मुख खेळाडूंना अद्ययावत क्रिकेटचे स्टेडियम नसल्याने जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस असलेल्या भुखंडावर क्रिकेटचे स्टेडियम उभारण्यात यावे, अशी विनंती विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे केली आहे.

पश्‍चिम उपनगराबरोबरच पूर्व उपनगरातील अनेक क्रिकेटपटू राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या राज्याचे प्रतिनिधीत्व करत आहेत. परंतु जोगेश्‍वरी परिसरात व उपनगरांमध्ये क्रिकेट या खेळाकरीता स्टेडियम उपलब्ध नसल्याने उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपले क्रीडानैपूण्य चांगल्या पद्धतीने आत्मसात करण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रातील शहीद विजय साळस्कर उद्यानाच्या मागील बाजूस आरे येथे असलेला रिक्त भूखंड स्टेडियमसाठी आरक्षित करणे आवश्यक असल्याचे वायकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

याठिकाणी अद्यावत स्टेडियम उभे राहिल्यास क्रिकेटपटूंच्या नैपुण्यात अधिक चांगल्या पद्धतीने वाढ तर होईलच, पण यामुळे राज्याचे तसेच देशाचादेखील नावलौकीक वाढण्यास मदत होईल. देशासाठी भावी क्रिकेटपटू तयार करण्यासाठी या स्टेडियमच्या उभारणीसाठी येणारा खर्च, हा खर्च न समजता भविष्यातील तरुण पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी गुंतवणूक असणार असल्याचे मतही वायकर यांनी व्यक्त केले आहे.

उदयोन्मुख खेळाडूंच्या भवितव्याचा विचार करुन आरेमध्ये उपरोक्त आरक्षित जागेवर वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात ५० कोटींची विशेष तरतूद करण्यात यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.”

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content