HomeArchiveजाणून घ्या भारतीय...

जाणून घ्या भारतीय नौकानयनाचा इतिहास!

Details
जाणून घ्या भारतीय नौकानयनाचा इतिहास!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
प्राचीन काळापासून भारत देश नौकानयनात पारंगत आहे. या क्षेत्रातील आपली प्रगती विस्मयचकित करणारी आहे. आपला गौरवशाली इतिहास सांगतो की भारतीय नागरिकांनी नौकानयनाच्या सहाय्याने अनेक देशांशी नाते जोडले होते. भारतीय नौकानयनाची ही गौरवशाली परंपरा व पुढे परकीयांनी तिचा जाणीवपूर्वक नाश करेपर्यंतचा समग्र व रोचक इतिहास , सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व लेखक डॉ. द. रा. केतकर यांनी त्यांच्या ‘भारतीय नौकानयनाचा इतिहास’ या आगामी ग्रंथात अतिशय अभ्यासपूर्वक मांडला आहे.

देशात मोदी सरकार आल्यानंतर देशांतर्गत जलसेवेचा सहभाग वाढवून रस्त्यावरील ताण नि पेट्रोल डिझेल वरील खर्च कमी व्हावा म्हणून ‘सागरमाला योजना’ राबवली जात आहे. गंगा नदीच्या काही भागात हुबळीपर्यंत मार्ग चालू केला असून इतरही टप्प्यात आहेत. नितीन गडकरी यात लक्ष घालून होते. मुंबई गोवासह जलवाहतूक सुरू झालीय. डॉ. केतकरांच्या विवेचनानंतर याचं महत्त्व लक्षात येईल.

 

जनसेवा समिती, विलेपारले या आपल्या संस्थेमार्फत रविवार, दि. १४ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ठीक ५ वा, विलेपार्ले पूर्व येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात या संदर्भग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. “समुद्रावरील शिवाजी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजी आंग्रे यांचे विद्यमान वंशज, सरदार श्री रघुजीराजे आंग्रे आणि व्हाईस एडमिरल (निवृत्त) अभय कर्वे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुस्तक प्रकाशनानंतर या पुस्तकाचे लेखक डॉ. द. रा. केतकर, ‘भारतीय नौकानयनगाथा’ या विषयावर स्लाईड शो आणि व्याख्यान सादर करणार आहेत.

हा कालखंड सिंधुसंस्कृतीचा आहे, ज्या काळात नौकानयनाबरोबर जहाज बांधणी क्षेत्रातही आपला उत्कर्ष झाला होता. ज्या देशांशी सागरी मार्गाने आपला व्यापार हजारो वर्षे सुरू होता, त्यांच्याशी सांस्कृतिक देवाणघेवाणही आपण ठेवली होती. इ. स. पूर्व २०० ते इ. स. २०० या कालखंडात भारतीय जहाजांनी बंगालचा उपसागर पार करून जावा, सुमात्रा, बाली या प्रदेशात हिंदू राज्ये वसवली. या देशात आपली सांस्कृतिक मूल्ये रूजवण्यात आपण यशस्वी झालो. आपल्या नाविक कौशल्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर होऊ शकला. यासाठीच भारताला ‘नौकानयना’चे उत्पत्तीस्थान मानले जाते.

प्राचीन कालखंड, मराठा साम्राज्य आणि मराठा साम्राज्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचा काळ अशा तीन विभागात, भारतीय नौकानयनाच्या संपूर्ण इतिहासाची अभ्यासपूर्ण आणि ससंदर्भ मांडणी या ग्रंथात केली आहे. नौकानयनाच्या इतिहासासोबत नाणी, शिल्पे, नौकानयनातील यंत्रे, नौका बांधणी तंत्र, नकाशे यांचा या पुस्तकात वापर करून एका परिपूर्ण संदर्भ ग्रंथाची निर्मिती लेखकांनी केली आहे.

जनसेवा समिती, विलेपार्ले आयोजित, या उत्तम आणि अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात आपण सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन लेखक प्रकाशक नि समितीने केले आहे. हा कार्यक्रम निःशुल्क आहे. सुट्टीचे दिवस असल्याने बच्चे कंपनीसाठी तो ज्ञानाचा ठरेल यात शंकाच नाही. या कार्यक्रमादरम्यान डॉ. द. रा. केतकर यांच्या ‘सरखेल कान्होजी आंग्रे’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन होणार आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी सदरहू दोन्ही ग्रंथ सवलतीच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. भारतीय नौकानायनाचा इतिहास- मूळ किंमत ४००/- प्रकाशनाच्या दिवशी- ३००/-, सरखेल कान्होजी आंग्रे, तिसरी आवृत्ती- मूळ किंमत २५०/- प्रकाशनाच्या दिवशी- २००/-. पुस्तक प्रकाशक- मर्वेन टेक्नॉंलॉजीज मनोज केळकर. अधिक माहितीसाठी संपर्कः पराग लिमये (९९८७५ ६५७३८), डॉ. केतकर (९८२०१ ९५७७९, ९००४६५७६६३).”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
प्राचीन काळापासून भारत देश नौकानयनात पारंगत आहे. या क्षेत्रातील आपली प्रगती विस्मयचकित करणारी आहे. आपला गौरवशाली इतिहास सांगतो की भारतीय नागरिकांनी नौकानयनाच्या सहाय्याने अनेक देशांशी नाते जोडले होते. भारतीय नौकानयनाची ही गौरवशाली परंपरा व पुढे परकीयांनी तिचा जाणीवपूर्वक नाश करेपर्यंतचा समग्र व रोचक इतिहास , सुप्रसिद्ध इतिहास अभ्यासक व लेखक डॉ. द. रा. केतकर यांनी त्यांच्या ‘भारतीय नौकानयनाचा इतिहास’ या आगामी ग्रंथात अतिशय अभ्यासपूर्वक मांडला आहे.

देशात मोदी सरकार आल्यानंतर देशांतर्गत जलसेवेचा सहभाग वाढवून रस्त्यावरील ताण नि पेट्रोल डिझेल वरील खर्च कमी व्हावा म्हणून ‘सागरमाला योजना’ राबवली जात आहे. गंगा नदीच्या काही भागात हुबळीपर्यंत मार्ग चालू केला असून इतरही टप्प्यात आहेत. नितीन गडकरी यात लक्ष घालून होते. मुंबई गोवासह जलवाहतूक सुरू झालीय. डॉ. केतकरांच्या विवेचनानंतर याचं महत्त्व लक्षात येईल.

 

जनसेवा समिती, विलेपारले या आपल्या संस्थेमार्फत रविवार, दि. १४ एप्रिल २०१९ रोजी सायंकाळी ठीक ५ वा, विलेपार्ले पूर्व येथील साठ्ये महाविद्यालयाच्या सभागृहात या संदर्भग्रंथाचा प्रकाशन सोहळा आयोजित केला आहे. “समुद्रावरील शिवाजी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजी आंग्रे यांचे विद्यमान वंशज, सरदार श्री रघुजीराजे आंग्रे आणि व्हाईस एडमिरल (निवृत्त) अभय कर्वे याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुस्तक प्रकाशनानंतर या पुस्तकाचे लेखक डॉ. द. रा. केतकर, ‘भारतीय नौकानयनगाथा’ या विषयावर स्लाईड शो आणि व्याख्यान सादर करणार आहेत.

हा कालखंड सिंधुसंस्कृतीचा आहे, ज्या काळात नौकानयनाबरोबर जहाज बांधणी क्षेत्रातही आपला उत्कर्ष झाला होता. ज्या देशांशी सागरी मार्गाने आपला व्यापार हजारो वर्षे सुरू होता, त्यांच्याशी सांस्कृतिक देवाणघेवाणही आपण ठेवली होती. इ. स. पूर्व २०० ते इ. स. २०० या कालखंडात भारतीय जहाजांनी बंगालचा उपसागर पार करून जावा, सुमात्रा, बाली या प्रदेशात हिंदू राज्ये वसवली. या देशात आपली सांस्कृतिक मूल्ये रूजवण्यात आपण यशस्वी झालो. आपल्या नाविक कौशल्यामुळे भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर होऊ शकला. यासाठीच भारताला ‘नौकानयना’चे उत्पत्तीस्थान मानले जाते.

प्राचीन कालखंड, मराठा साम्राज्य आणि मराठा साम्राज्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचा काळ अशा तीन विभागात, भारतीय नौकानयनाच्या संपूर्ण इतिहासाची अभ्यासपूर्ण आणि ससंदर्भ मांडणी या ग्रंथात केली आहे. नौकानयनाच्या इतिहासासोबत नाणी, शिल्पे, नौकानयनातील यंत्रे, नौका बांधणी तंत्र, नकाशे यांचा या पुस्तकात वापर करून एका परिपूर्ण संदर्भ ग्रंथाची निर्मिती लेखकांनी केली आहे.

जनसेवा समिती, विलेपार्ले आयोजित, या उत्तम आणि अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात आपण सर्वांनी मोठया संख्येने उपस्थित राहवे असे आवाहन लेखक प्रकाशक नि समितीने केले आहे. हा कार्यक्रम निःशुल्क आहे. सुट्टीचे दिवस असल्याने बच्चे कंपनीसाठी तो ज्ञानाचा ठरेल यात शंकाच नाही. या कार्यक्रमादरम्यान डॉ. द. रा. केतकर यांच्या ‘सरखेल कान्होजी आंग्रे’ या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचेही प्रकाशन होणार आहे. प्रकाशन सोहळ्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी सदरहू दोन्ही ग्रंथ सवलतीच्या किमतीत विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. भारतीय नौकानायनाचा इतिहास- मूळ किंमत ४००/- प्रकाशनाच्या दिवशी- ३००/-, सरखेल कान्होजी आंग्रे, तिसरी आवृत्ती- मूळ किंमत २५०/- प्रकाशनाच्या दिवशी- २००/-. पुस्तक प्रकाशक- मर्वेन टेक्नॉंलॉजीज मनोज केळकर. अधिक माहितीसाठी संपर्कः पराग लिमये (९९८७५ ६५७३८), डॉ. केतकर (९८२०१ ९५७७९, ९००४६५७६६३).”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content