HomeArchive'गार्डन रिच'कडून शंभरावी...

‘गार्डन रिच’कडून शंभरावी युद्धनौका राष्ट्राला अर्पण!

Details
‘गार्डन रिच’कडून शंभरावी युद्धनौका राष्ट्राला अर्पण!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
भारतीय नौदलाच्या ताफ्यात जमिनीवर किंवा जमिनीवरील शस्त्रसामग्री,मनुष्यबळ वाहून नेणारी उपयुक्त नौका समारंभपूर्वक दाखल झाली. व्हाईस ऍडमिरल पूर्व नौदल प्रमुख अतुलकुमार जैन यांनी तिला सहभागी करून घेतले. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे झालेल्या सोहळ्यात भारतीय गोदीतील हा बहुमानाचा क्षण होता. या प्रकारची ही सहावी बोट आहे. शंभरावी युद्ध बोट बांधण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल कोलकात्याच्या गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर या केंद्र शासनाच्या उपक्रमाचं जैन यांनी अभिनंदन केले.

सदर बोटीच्या ताफ्यात सामील होण्याचं वॉरंट बोटप्रमुख ले. कमांडर गोपीनाथ नारायणन यांनी वाचून दाखवलं. त्याचवेळी नौदल झेंडा राष्ट्रध्वजाच्या सुरावटीने दिमाखात फडकवला गेला. हिची तैनाती पोर्ट ब्लेअर येथे असेल. या बोटीच्या सामील होण्याने सागरी आणि मानवी मदत, आपत्ती निवारणाच्या कामात उपयोगी कामगिरी बजावली जाईल. शोध नि बचाव कार्य, किनारा अभियान, शोध मोहीम, तटीय गस्त, निरीक्षण कामगिरी अशासाठी हिचा वापर होईल. त्यामुळेच तिला ‘मल्टी रोल’ म्हंटलं जातं. अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात हिचा वापर केला जाईल. गार्डन रिचचे व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल व्ही. के. सक्सेना, कमोडोर आशुतोष रिधोरकर इतर अधिकारी उपस्थित होते.

भारतीय नौदलाच्या मागणी नि गरजेनुसार या L C U MARK IV बोटीची बांधणी गार्डन रिचच्या अंतर्गत तंत्रज्ञानी केली. नियोजित कार्यक्रमानुसार पुढील दोन बोटींची बांधणी – प्रगती सुरू असल्याचे या कंपनीने स्पष्ट केलंय. या बोटीमुळे सैन्यसामग्री वहन, रणगाडे, चिलखती सामान किनाऱ्यावर उतरवणं सोपं होणार आहे. इंटिग्रेटेड ब्रिज नि प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीममुळे यात अधिकची सुलभता येईल. ही बोट ६३ मीटर लांब, ११ मीटर रुंद, ८३० टनाची असून १.७ मीटर इतक्या ओहोटीपर्यंत तरंगू शकते. या बोटीवर दोन MTU डिझेल इंजिन बसवली असून त्याद्वारे बोट १५ नॉटिकल मैल गती घेऊ शकते. मेडक आयुध निर्माण कारखान्यात तयार झालेल्या दोन ३० मिमीच्या CRN 91 बंदुका सज्ज आहेत. चार अधिकारी नि ५६ नाविक असा ताफा तिच्यावर ठेवण्यात आला आहे. दीडशे जणांचं पथकही नेता येतं.

 

अशाप्रकारची LCU L-51 भारतीय नौदलात मार्च २०१७ साली दाखल झाली. भविष्यातील ५०० कंपन्यांमध्ये सामील झालेल्या GRSE ने पहिली भारतीय बनावटीची युद्धनौका १९६१ साली ‘भा नौ पो अजय’ ची (INS)बांधणी केली. गेल्या साठ वर्षांत आतापर्यंत बांधणी केलेल्या ७८० विविध बोटीं उभारल्या. त्यात १०० पैकी ६७ भारतीय नौदलासाठी तयार झाल्या तर उर्वरित भारतीय तट रक्षक दल, नि मॉरिशस देश यांना दिल्या गेल्या. या ६७ मध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पाणबुडी विरोधी ASW, उथळ पाण्यावरील बोटी, फ्रिगेट्स, मिसाईल कॉर्व्हेट, ASW कॉर्व्हेट्स, टँकर्स, पाहणी बोट, पेट्रोल वेसल्स, फास्ट अटॅक क्राफ्ट अशा निरनिराळ्या प्रकारच्या बोटींचा यात समावेश आहे.

मागील काळात पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी GRSE ने ६०५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून एकाचवेळी २० बोटी बांधण्याची क्षमता आहे. सध्या GRSE कडे २७ हजार ५०० कोटी रूपयांची ऑर्डर आहे. त्यातून मोठी महसूल वृद्धी होईल. बांधणीच्या विविध टप्प्यावर २० जहाजे असून पूर्ण झाल्यावर ती नौदल नि तटरक्षक दलाला सुपूर्द करण्यात येतील असं यावेळी सांगितले गेले. अशीच भरीव कामगिरी सर्वच क्षेत्रात घडत भारत प्रगतीच्या मार्गावर चालत राहो अशा शुभेच्छा द्यायलाच हव्यात नाही का? जय हिंद!”
 
“विनय गजानन खरे, ज्येष्ठ पत्रकार
[email protected]
भारतीय नौदलाच्या ताफ्यात जमिनीवर किंवा जमिनीवरील शस्त्रसामग्री,मनुष्यबळ वाहून नेणारी उपयुक्त नौका समारंभपूर्वक दाखल झाली. व्हाईस ऍडमिरल पूर्व नौदल प्रमुख अतुलकुमार जैन यांनी तिला सहभागी करून घेतले. आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे झालेल्या सोहळ्यात भारतीय गोदीतील हा बहुमानाचा क्षण होता. या प्रकारची ही सहावी बोट आहे. शंभरावी युद्ध बोट बांधण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल कोलकात्याच्या गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनिअर या केंद्र शासनाच्या उपक्रमाचं जैन यांनी अभिनंदन केले.

सदर बोटीच्या ताफ्यात सामील होण्याचं वॉरंट बोटप्रमुख ले. कमांडर गोपीनाथ नारायणन यांनी वाचून दाखवलं. त्याचवेळी नौदल झेंडा राष्ट्रध्वजाच्या सुरावटीने दिमाखात फडकवला गेला. हिची तैनाती पोर्ट ब्लेअर येथे असेल. या बोटीच्या सामील होण्याने सागरी आणि मानवी मदत, आपत्ती निवारणाच्या कामात उपयोगी कामगिरी बजावली जाईल. शोध नि बचाव कार्य, किनारा अभियान, शोध मोहीम, तटीय गस्त, निरीक्षण कामगिरी अशासाठी हिचा वापर होईल. त्यामुळेच तिला ‘मल्टी रोल’ म्हंटलं जातं. अंदमान निकोबार बेटांच्या परिसरात हिचा वापर केला जाईल. गार्डन रिचचे व्यवस्थापकीय संचालक निवृत्त रिअर ऍडमिरल व्ही. के. सक्सेना, कमोडोर आशुतोष रिधोरकर इतर अधिकारी उपस्थित होते.

भारतीय नौदलाच्या मागणी नि गरजेनुसार या L C U MARK IV बोटीची बांधणी गार्डन रिचच्या अंतर्गत तंत्रज्ञानी केली. नियोजित कार्यक्रमानुसार पुढील दोन बोटींची बांधणी – प्रगती सुरू असल्याचे या कंपनीने स्पष्ट केलंय. या बोटीमुळे सैन्यसामग्री वहन, रणगाडे, चिलखती सामान किनाऱ्यावर उतरवणं सोपं होणार आहे. इंटिग्रेटेड ब्रिज नि प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टीममुळे यात अधिकची सुलभता येईल. ही बोट ६३ मीटर लांब, ११ मीटर रुंद, ८३० टनाची असून १.७ मीटर इतक्या ओहोटीपर्यंत तरंगू शकते. या बोटीवर दोन MTU डिझेल इंजिन बसवली असून त्याद्वारे बोट १५ नॉटिकल मैल गती घेऊ शकते. मेडक आयुध निर्माण कारखान्यात तयार झालेल्या दोन ३० मिमीच्या CRN 91 बंदुका सज्ज आहेत. चार अधिकारी नि ५६ नाविक असा ताफा तिच्यावर ठेवण्यात आला आहे. दीडशे जणांचं पथकही नेता येतं.

 

अशाप्रकारची LCU L-51 भारतीय नौदलात मार्च २०१७ साली दाखल झाली. भविष्यातील ५०० कंपन्यांमध्ये सामील झालेल्या GRSE ने पहिली भारतीय बनावटीची युद्धनौका १९६१ साली ‘भा नौ पो अजय’ ची (INS)बांधणी केली. गेल्या साठ वर्षांत आतापर्यंत बांधणी केलेल्या ७८० विविध बोटीं उभारल्या. त्यात १०० पैकी ६७ भारतीय नौदलासाठी तयार झाल्या तर उर्वरित भारतीय तट रक्षक दल, नि मॉरिशस देश यांना दिल्या गेल्या. या ६७ मध्येही वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत पाणबुडी विरोधी ASW, उथळ पाण्यावरील बोटी, फ्रिगेट्स, मिसाईल कॉर्व्हेट, ASW कॉर्व्हेट्स, टँकर्स, पाहणी बोट, पेट्रोल वेसल्स, फास्ट अटॅक क्राफ्ट अशा निरनिराळ्या प्रकारच्या बोटींचा यात समावेश आहे.

मागील काळात पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्यासाठी GRSE ने ६०५ कोटी रूपयांची गुंतवणूक केली असून एकाचवेळी २० बोटी बांधण्याची क्षमता आहे. सध्या GRSE कडे २७ हजार ५०० कोटी रूपयांची ऑर्डर आहे. त्यातून मोठी महसूल वृद्धी होईल. बांधणीच्या विविध टप्प्यावर २० जहाजे असून पूर्ण झाल्यावर ती नौदल नि तटरक्षक दलाला सुपूर्द करण्यात येतील असं यावेळी सांगितले गेले. अशीच भरीव कामगिरी सर्वच क्षेत्रात घडत भारत प्रगतीच्या मार्गावर चालत राहो अशा शुभेच्छा द्यायलाच हव्यात नाही का? जय हिंद!”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content