HomeArchiveअर्थसंकल्पाचा अर्थ!

अर्थसंकल्पाचा अर्थ!

Details
अर्थसंकल्पाचा अर्थ!

    01-Jul-2019

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

WhatsApp

” 

शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वरूप लोकानुयायी असणार हे अपेक्षितच होते. प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी या आघाडीवर अजिबात अपेक्षाभंग केलेला नाही. मध्यमवर्ग, असंघटीत कामगार, शेतकरी या साऱ्यांसाठीच त्यांनी भरघोस घोषणांचा वर्षाव केला. अर्थात हा वर्षाव येणाऱ्या निवडणुकांकडे नजर ठेवूनच झाला आहे. काही राज्यांत अलिकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये याच वर्गाच्या नाराजीचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीने खाल्ला होता. यातूनच बहुदा भाजपाने आजवर दुर्लक्षित मध्यमवर्गाला चुचकारण्यासाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवली असावी.

शेतकऱ्यांमध्येही भाजपाविषयी प्रचंड असंतोष आहे. अर्थात याचा सर्वस्वी दोष भाजपाला देता येणार नाही. पण आहे तो असंतोष दूर करण्यासाठी भाजपाने अर्थसहाय्याचे प्यादे पुढे सरकवले आहे. मात्र महिन्याला पाचशे आणि दिवसाला सुमारे १७ रूपये अशा अर्थसहाय्याचा कर्जाच्या दरीत बुडालेल्या शेतकऱ्यांना कितपत उपयोग होईल याबद्दल साशंकताच आहे. शिवाय या सहा हजार रूपयांसाठी बँक खात्यांत किमान शिल्लक ठेवण्याचा भूर्दंड शेतकऱ्याला सहन करावा लागणार आहे तो वेगळाच.

 

याआधीची आश्वासने, घोषणा यांच्या पूर्ततेचे प्रगतीपुस्तक पाहिले तर या घोषणांबद्दल लोकांमध्ये जो संभ्रम दिसतो आहे तो साहजिकच म्हणावा लागेल. शिवाय महसुली उत्पन्नावर सुमारे १.१५ लाख कोटी रूपयांचा भरभक्कम बोजा टाकणाऱ्या या वित्तीय घोषणांच्या पूर्ततेची जबाबदारी निवडणुकीनंतर मेमध्ये सत्तारूढ होणाऱ्या नव्या सरकारवर असणार आहे. मतदारांना आकृष्ट करताना गोयल यांनी सटरफटर उधळपट्टी करण्याचे भान मात्र दाखवले आहे. अर्थात नव्या सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात या सर्व घोषणांचा फेरविचार होईल हे नक्की!”
 
“शैलेंद्र शिर्के, संपादक, महाराष्ट्र दिनमान
[email protected]
सार्वत्रिक निवडणुका जवळ आल्या असताना सादर झालेल्या अंतरिम अर्थसंकल्पाचे स्वरूप लोकानुयायी असणार हे अपेक्षितच होते. प्रभारी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी या आघाडीवर अजिबात अपेक्षाभंग केलेला नाही. मध्यमवर्ग, असंघटीत कामगार, शेतकरी या साऱ्यांसाठीच त्यांनी भरघोस घोषणांचा वर्षाव केला. अर्थात हा वर्षाव येणाऱ्या निवडणुकांकडे नजर ठेवूनच झाला आहे. काही राज्यांत अलिकडेच झालेल्या निवडणुकांमध्ये याच वर्गाच्या नाराजीचा मोठा फटका भारतीय जनता पार्टीने खाल्ला होता. यातूनच बहुदा भाजपाने आजवर दुर्लक्षित मध्यमवर्गाला चुचकारण्यासाठी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवली असावी.

शेतकऱ्यांमध्येही भाजपाविषयी प्रचंड असंतोष आहे. अर्थात याचा सर्वस्वी दोष भाजपाला देता येणार नाही. पण आहे तो असंतोष दूर करण्यासाठी भाजपाने अर्थसहाय्याचे प्यादे पुढे सरकवले आहे. मात्र महिन्याला पाचशे आणि दिवसाला सुमारे १७ रूपये अशा अर्थसहाय्याचा कर्जाच्या दरीत बुडालेल्या शेतकऱ्यांना कितपत उपयोग होईल याबद्दल साशंकताच आहे. शिवाय या सहा हजार रूपयांसाठी बँक खात्यांत किमान शिल्लक ठेवण्याचा भूर्दंड शेतकऱ्याला सहन करावा लागणार आहे तो वेगळाच.

 

याआधीची आश्वासने, घोषणा यांच्या पूर्ततेचे प्रगतीपुस्तक पाहिले तर या घोषणांबद्दल लोकांमध्ये जो संभ्रम दिसतो आहे तो साहजिकच म्हणावा लागेल. शिवाय महसुली उत्पन्नावर सुमारे १.१५ लाख कोटी रूपयांचा भरभक्कम बोजा टाकणाऱ्या या वित्तीय घोषणांच्या पूर्ततेची जबाबदारी निवडणुकीनंतर मेमध्ये सत्तारूढ होणाऱ्या नव्या सरकारवर असणार आहे. मतदारांना आकृष्ट करताना गोयल यांनी सटरफटर उधळपट्टी करण्याचे भान मात्र दाखवले आहे. अर्थात नव्या सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात या सर्व घोषणांचा फेरविचार होईल हे नक्की!”
 

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content