Homeकल्चर +जो त्याग करील...

जो त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील!

जो आपल्या जीवनात त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील, अशा शब्दांत नाशिक येथील अध्यात्म, ज्योतिष आणि वेदशास्त्रसंपन्न अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी सुरू केलेल्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेचे यंदाही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले. यंदाच्या ३९व्या वर्षाच्या वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी ‘मानवी जीवनातील पाच विशेष योग’ या विषयावरील व्याख्यानाने गुंफले.

प्रा. नयना रेगे यांनी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा परिचय करुन दिल्यानंतर भगरे गुरुजी यांनी सुमारे दीड तास अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आज आपल्याला आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांची नावे माहित नसतात, ज्यांनी हाडाची काडे करुन आपल्यासाठी संपत्ती जमवून ठेवलेली असते. परंतु महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची नावे आपण लक्षात ठेवतो, कारण ते आपल्या त्यागातून महान झाले आहेत, असे ते म्हणाले.

ज्या बापूंनी दोन गुंठे जमीन घेतली नाही, परंतु आज प्रत्येकाच्या खिशात बापू आहेत. राष्ट्रासाठी या महान विभूतींनी आपले जीवन झिजविले. त्यागाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या बलिदानामुळे आज त्यांना संपूर्ण विश्व लक्षात ठेवतो, असे गुरूजींनी सांगितले.

मानवी जीवनातील पाच विशेष योग या विषयावर आपले विचार मांडताना भगरे गुरुजी म्हणाले की, ८४ लक्ष योनींमधून महत्त्वाचा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. सहजासहजी हा जन्म मिळत नाही. पण या मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मानवी जीवनातील पाच विशेष योग आपल्याला अंगिकारणे आवश्यक आहे. वास्तुयोग, कन्यादान योग, चारधाम यात्रा, गोदान आणि मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे पाच योग महत्त्वाचे आहेत. ते व्यावहारिक जीवनात अंगिकारणे शक्य आहे आणि ते अंगिकारले तर आपल्या मानवी जीवनाचे, मनुष्य जन्माचे सार्थक होईल.

हे पाचही योग अत्यंत सोप्या शब्दांत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी समजावून सांगितले. कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळातसुद्धा चिकाटीने या वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले याबद्दल अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी विजय वैद्य यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content