Homeकल्चर +जो त्याग करील...

जो त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील!

जो आपल्या जीवनात त्याग करील त्याला जग लक्षात ठेवील, अशा शब्दांत नाशिक येथील अध्यात्म, ज्योतिष आणि वेदशास्त्रसंपन्न अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी त्यागाचे महत्त्व अधोरेखित केले.

ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांनी सुरू केलेल्या जय महाराष्ट्र नगर, बोरीवली पूर्व येथील वसंत व्याख्यानमालेचे यंदाही फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले. यंदाच्या ३९व्या वर्षाच्या वसंत व्याख्यानमालेचे पहिले पुष्प अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी ‘मानवी जीवनातील पाच विशेष योग’ या विषयावरील व्याख्यानाने गुंफले.

प्रा. नयना रेगे यांनी अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांचा परिचय करुन दिल्यानंतर भगरे गुरुजी यांनी सुमारे दीड तास अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. आज आपल्याला आजोबा, पणजोबा, खापर पणजोबा यांची नावे माहित नसतात, ज्यांनी हाडाची काडे करुन आपल्यासाठी संपत्ती जमवून ठेवलेली असते. परंतु महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, वीर सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची नावे आपण लक्षात ठेवतो, कारण ते आपल्या त्यागातून महान झाले आहेत, असे ते म्हणाले.

ज्या बापूंनी दोन गुंठे जमीन घेतली नाही, परंतु आज प्रत्येकाच्या खिशात बापू आहेत. राष्ट्रासाठी या महान विभूतींनी आपले जीवन झिजविले. त्यागाच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या बलिदानामुळे आज त्यांना संपूर्ण विश्व लक्षात ठेवतो, असे गुरूजींनी सांगितले.

मानवी जीवनातील पाच विशेष योग या विषयावर आपले विचार मांडताना भगरे गुरुजी म्हणाले की, ८४ लक्ष योनींमधून महत्त्वाचा मनुष्य जन्म आपल्याला मिळाला आहे. सहजासहजी हा जन्म मिळत नाही. पण या मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे म्हणून मानवी जीवनातील पाच विशेष योग आपल्याला अंगिकारणे आवश्यक आहे. वास्तुयोग, कन्यादान योग, चारधाम यात्रा, गोदान आणि मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हे पाच योग महत्त्वाचे आहेत. ते व्यावहारिक जीवनात अंगिकारणे शक्य आहे आणि ते अंगिकारले तर आपल्या मानवी जीवनाचे, मनुष्य जन्माचे सार्थक होईल.

हे पाचही योग अत्यंत सोप्या शब्दांत अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी समजावून सांगितले. कोरोनाच्या आणि लॉकडाऊनच्या काळातसुद्धा चिकाटीने या वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले याबद्दल अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी विजय वैद्य यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.

Continue reading

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...

‘जीनोम सिक्वेन्सिंग’मुळेच रत्नागिरीतला हापूस पोहोचला सातासमुद्रापार!

जगप्रसिद्ध जीनोम शास्त्रज्ञ जे. क्रेग वेंटर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ जागतिक विज्ञान क्षेत्राचीच हानी झाली नाही, तर कोकणच्या आणि पर्यायाने भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेला 'डिजिटल' ताकद देणारा एक आधारवड हरपला आहे. वेंटर यांनी विकसित केलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग...

डिजिटल लॉकर सुविधा असलेली ॲक्सिस बँकेची पहिली शाखा कार्यरत

भारतातल्या खासगी क्षेत्रातल्या सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेने नवी दिल्लीतल्या कॅपिटल ग्रीन, डीएलएफ मिडटाउन प्लाझा येथे डिजिटल लॉकर सेवांवर लक्षकेंद्रित करणारी आपली पहिली शाखा नुकतीच सुरू केली. प्रगत स्वयंचलित प्रणाली (ऑटोमेशन), उत्कृष्ट सुरक्षाव्यवस्था आणि अत्याधुनिक लॉकर सेवांच्या...
Skip to content