Homeचिट चॅटईश्वरसेवा समजून काम...

ईश्वरसेवा समजून काम करूया – अविनाश दौंड

महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना जगाला हेवा वाटेल असा पुरोगामी महाराष्ट्र घडविणारे थोर समाजसुधारक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०५ हुतात्मे आणि जगभरातील लक्षावधी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी शाहिद झालेले कामगार कार्यकर्ते, कामगार नेते यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन करून बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी कोरोनाच्या या काळात साधनसामुग्रीचा तुटवडा असला तरी रुग्णसेवा हिच ईश्वरसेवा समजून सर्वोत्तम सेवा द्यावी, असे आवाहन सरकारी कर्मचाऱ्यांना केले आहे.

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत देशस्थिती अतिशय भयावह झाली असून देशात आरोग्य आणिबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यात रोज ६५ ते ७० हजार नवीन रुग्ण आढळत असून दुर्दैवाने रोज ५०० नागरिक बळी पडत आहेत. मुंबईत तर उद्रेक झाला असून रुग्णालयात बेड, ऑॅक्सिजन, इंजेक्शन, लस यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. गेल्या १६ महिन्यांत कोरोनाशी लढताना हजारो शासकीय कर्मचारी, प्रामुख्याने आरोग्य सेवक, पोलीस, वाहक, चालक यांना जीव गमवावा लागला आहे. त्यांच्या वारसांना तातडीने ५० लक्ष विमा रक्कम आणि अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.

कर्मचाऱ्यांच्या अनेक महत्त्वाच्या मागण्या शासन दरबारी बराच काळ प्रलंबित आहेत आणि पुढील काळात त्यासाठी संघर्षसुद्धा करावा लागणार आहे. महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनानिमित्त ज्येष्ठ नेते र. ग. कर्णिक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आजच्या कठीण काळात कर्मचाऱ्यांनी शासनाला तन, मन आणि धनाने सहकार्य केले पाहिजे. यापुढे समाज माध्यमांवर व्यक्त होताना आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. संपूर्ण जिल्ह्यात एकमेकांशी कायम संपर्कात राहून अभावग्रस्तांना सर्वतोपरी मदत करावी. याकामी राहत्या ठिकाणीसुद्धा पुढाकार घ्यावा. तसेच अनेक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोना होऊन ते बरे झाले आहेत. अशांनी लस घेण्यापूर्वी प्लाझ्मा द्यावा देण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही दौंड यांनी केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content