Homeटॉप स्टोरीअनेक साखर कारखान्यांचे...

अनेक साखर कारखान्यांचे गाळप यंदा लवकरच ठप्प?

यंदा अनेक साखर कारखान्यांचा गाळप हंगाम लवकर बंद होण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम साधारणतः मार्चअखेरीस बंद व्हायला सुरुवात होते. काही कारखाने मात्र ऊसाच्या उपलब्धतेनुसार उशिरापर्यंत सुरू राहतात. यंदा मात्र फेब्रुवारी मध्यातच 20-25 कारखान्यांना गाळप हंगाम बंद करावा लागण्याची चिन्हे दिसत आहेत. यावर्षी ऊस लागवड उशिरा सुरू झाल्याने साखर उत्पादनावर परिणाम होण्याच्या शक्यतेला “श्री रेणुका शुगर्स”चे चेअरमन अतुल चतुर्वेदी यांनीही दुजोरा दिला आहे.

2023-2024 गाळप हंगामामध्ये 319 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. 2024-2025 म्हणजे यंदाच्या हंगामात मात्र साखरेचे उत्पादन 270 ते 280 लाख टन राहण्याचा इस्मा

साखर

अन् नॅशनल शुगर फेडरेशनचा अंदाज आहे. दुसरीकडे, गेल्या काही काळात ऊसाच्या उपलब्धतेबरोबरच गुणवत्ताही खालावत चालली आहे. त्यामुळे सरासरी साखर उतारा 9.37%वरून 8.81%पर्यंत खालावला आहे.

यंदा गेल्या 8 वर्षांत प्रथमच देशांतर्गत मागणीपेक्षा साखर उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. त्यातच साखर कारखानदारांच्या दबावामुळे मोदी सरकारने दहा लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिली आहे. त्यामुळे बफर स्टॉक गृहीत धरला तरीही दिवाळीनंतरच्या काही महिन्यांत खुल्या बाजारात साखरेचे दर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. “श्री रेणुका”चे चतुर्वेदी यांनी मात्र साखरेची टंचाई तसेच दरवाढीची शक्यता फेटाळून लावली आहे. भारतात अगोदरच साखरेचे दर खालावलेले होते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी साखर निर्यातीचा केंद्राने घेतलेला निर्णय योग्यच असल्याचेही चतुर्वेदी यांनी सांगितले.

Continue reading

हर्षद महेता, केतन परिखनंतर आता पुन्हा नवा महेता! एलआयसीचीही साथ!!

सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया' (सेबी)ने गुजरातमधील सुवर्ण निर्यातदार कंपनी 'राजेश एक्सपोर्ट्स' आणि तिचे अध्यक्ष राजेश महेता यांच्यावर केलेल्या मोठ्या कारवाईनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. शेअर बाजारात गाजलेल्या हर्षद महेता आणि केतन परिख घोटाळ्यापेक्षाही हा अतिप्रचंड...

आता व्हा पूर्वीसारखे तरुण!

वय वाढणे आणि म्हातारपण येणे हा निसर्गाचा नियम आहे, असे आपण मानतो. पण जर कोणी तुम्हाला सांगितले की, आता तुमचे वाढणारे वय थांबवता येऊ शकते, इतकेच नाही तर म्हातारपणाकडून पुन्हा तारुण्याकडे रिव्हर्स प्रवास करणे शक्य आहे, तर तुमचा कदाचित...

बँकांचे कर्ज बुडवणाऱ्यांच्या घरावर आता थेट जप्ती!

बँकांकडून घेतलेले कर्ज वेळेवर न फेडणाऱ्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने आता अधिक कठोर पवित्रा घेतला आहे. ५ मे २०२६ रोजी आरबीआयने 'निर्दिष्ट अ-वित्तीय स्थावर जंगम मालमत्ता' म्हणजेच (एसएनएफए) संदर्भात एक नवीन मसुदा (ड्राफ्ट गाईडलाईन्स) जारी केला आहे. यानुसार,...
Skip to content