Homeन्यूज अँड व्ह्यूजठाण्यातल्या धोबी आळीच्या...

ठाण्यातल्या धोबी आळीच्या तोंडावरील बेवारस गाडी कोणाची?

ठाणे शहराच्या (प) कोर्टनाका परिसर व टेम्भी नाका परिसराच्या आसपास धोबी आळी नावाची अगदी चिंचोळी गल्ली असल्याचे नवीन ठाणेकरांना माहीतच नसते. अगदी जुन्या म्हणजे ज्यांची वये पन्नासच्या वर आहेत त्यांना मात्र धोबी आळी आणि तेथील वेगळ्या प्रकारचा दंगा नक्की माहीतच असणार! जुन्या जमान्यातल्या ‘भाई’ लोकांना मात्र ही आळी नक्कीच ओळखीची वाटणार यात शंका नाही. भाईगिरी सोडून व्हाईट कॉलरवाले बनून काहींनी खाऊ गल्लीत टपऱ्या तर काहींना नशिबाने साथ दिली म्हणून बिल्डिंग लाईनमध्ये हात मारला आहे. (बिल्डिंग लाईनमध्ये आता हात मारणारे पूर्वीच्या भाईंकडे हरकाम्या होते हे सांगायला नकोच.) मात्र या बिल्डिंग लाईनला पैसा कोण पुरवतात हे मात्र उघड गुपित आहे.

तर अशा या चिंचोळ्या गल्लीत अगदी चिंचोळे उद्यान आहे आणि हे उद्यान ठाणे महापालिकेचे आहे. या उद्यानात जाण्यासाठी आळीच्या आकारमानाच्या दृष्टीने विचार केल्यास रस्ताही अगदीच बारकूडा आहे. उद्यानाची अवस्था अत्यन्त खराब आहे. खराब कसली दुर्दशाच आहे. अनेक ठिकाणी कचरा आहे. उद्यानात माती तर गेल्या अनेक वर्षांत टाकलेली नाही, असे एका नजरेतच समजते. मात्र, मातीचे भरमसाठ बिल दीड वर्षांनी नियमित अदा केले जाते असे समजले. संताप आणणारी गोष्ट पुढेच आहे. या उद्यानात कुणीही जाऊ नये वा ते प्रवेशद्वार कुणाला दिसू नये म्हणून एका महाभागाने टोपडं घालून एक मोटारगाडीच येथे उभी करून ठेवलेली आहे. थोडीथोडकी नाही तर तब्बल दीड-दोन वर्षे ही गाडी येथेच पार्क करून ठेवलेली आहे.. या गाडीबाबत विचारणा केली असता कुणीही बोलायला तयार नव्हते. ही बेवारस गाडी असल्यास ती सरकार दरबारी जप्त करून टाकावी व ज्या खात्याकडे गाडयांची कमी असेल त्यांना ही गाडी वापरू द्यावी, असे सुचवावेसे वाटते.

Continue reading

टेकाड्यावर झोपडपट्ट्या उभारणारे भूमाफिया मोकाटच!

"ऐशा झोपडपट्ट्या माजवाव्या गहिवर काढोनी गाजवाव्या निवडणूक येता खाजवाव्या, धूर्त हस्ते सर्व पक्षांसी वाटे हवी, कैसी वर्णील दुबळा कवी, पामर वाचा" (मंगेश पाडगावकर) कविवर्यांची ही सुमारे 30 वर्षांपूर्वीची कविता आठवण्याचं कारण ठरली मुंबईतल्या घाटकोपरच्या नारायण नगरातील दरड कोसळून झालेली भीषण दुर्घटना! कवितेत झोपड्यांऐवजी दरडी...

भाईंदरमध्ये पोलिसांच्या कार्यक्रमात ताकाचा ग्लास आणि …

वाचक हो, तुम्हाला आठवत असेलच की जुन्या हिंदी चित्रपटात अर्ध्या नोटेचं चिटोरं दाखवलं की खलनायकाच्या गुहेत विनासायास प्रवेश मिळत असे. (हल्ली काही वेबसिरीजमध्येही हा खेळ दाखवत असतात) तसेच लाचलूचपत प्रतिबंधक खात्यातर्फे धाड पडली की काहीजण नोटा खातात. काहीजण संडासाच्या...

न्यायालयात शब्दांना धार, बोरूही चालतो.. पण हातचं राखून!

ठाणे शहरात नुकतेच शहरातील 'वाहतूक लोककेंद्री कशी असावी' यावर एक चर्चासत्र होते. या सत्रात दिगज्ज वक्ते होते. सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्या. अभय ओक, ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर, अ. पा. देशपांडे व नगर रचनाकार सुलक्षणा महाजन आदी तगडे वक्ते होते....
Skip to content