Homeहेल्थ इज वेल्थकोविडनंतरही लस घ्या,...

कोविडनंतरही लस घ्या, पण ६ आठवड्यांनंतर!

कोविडला टाळण्यासाठी लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर जर कोविड संसर्गाची लागण झाली तर, ६ आठवड्यानंतर लसीची दुसरी मात्रा घ्यावी. तसेच, रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर रुग्णांनी रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर ६ आठवड्यांनी लस घ्यावी. लस घेण्यापूर्वी जर काही लक्षणे असतील तर लस घेण्याअगोदर चाचणी करुन घ्यावी, असा सल्ला डॉ. शेखर साळकर यांनी आज दिला.   

सध्याच्या कोरोना महामारीचे संकट थोपवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी अस्त्र असल्याचे डॉ. साळकर म्हणाले. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. शेखर साळकर यांनी आज पत्र सूचना कार्यालयाने पणजीतल्या धेंपे महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या “लसीकरणाची आवश्यकता का?” या विषयावरील वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. त्यात ते बोलत होते.

कोविड लसीकरणाविषयक कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. महिलांनी मासिक पाळीच्या काळात लसीकरण करून घेणे अगदी सुरक्षित आहे. मात्र, गर्भवती, स्तनदा महिला आणि अ‍ॅलर्जिक व्यक्तींनी लस घेऊ नये, असे शासकीय नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. लसीकरणानंतर सौम्य लक्षणं दिसून येणे ही नियमित बाब आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी सांगितले.

सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती तयार होत असून, त्याचे दुष्परिणाम अगदी नगण्य आहेत. तसेच लसीकरणानंतरही कोविडचा संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता कमी असते. त्यामुळे कमी कालावधीत किमान 70% लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक आहे, असे डॉ. साळकर म्हणाले.

लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत लोकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. ‘टीका उत्सवा’नंतर लसीकरण मोहिमेला गती आल्याचे त्यांनी सांगितले. युवा वर्गाला कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. अर्थचक्र सुरू राहण्यासाठी हे आवश्यकही आहे. त्यामुळे युवावर्गाने १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. साळकर यांनी केले.

लसीकरणानंतरही कोविड अनुरूप योग्य वर्तन म्हणजे मास्कचा नियमित वापर, हातांची स्वच्छता आणि एकमेकांमध्ये योग्य अंतर या बाबींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मास्क वापरल्यामुळे संसर्गाचे प्रमाण होण्याची शक्यता ९५%नी कमी होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

या वेबिनारमध्ये धेंपे महाविद्यालयाच्या उपप्राचार्या गौरी तांबा याही सहभागी झाल्या होत्या. पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक विनोद कुमार यांनी प्रास्ताविक केले.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content