Homeहेल्थ इज वेल्थकोविडनंतरही लस घ्या,...

कोविडनंतरही लस घ्या, पण ६ आठवड्यांनंतर!

कोविडला टाळण्यासाठी लसीची पहिली मात्रा घेतल्यानंतर जर कोविड संसर्गाची लागण झाली तर, ६ आठवड्यानंतर लसीची दुसरी मात्रा घ्यावी. तसेच, रुग्णालयात दाखल असलेल्या गंभीर रुग्णांनी रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर ६ आठवड्यांनी लस घ्यावी. लस घेण्यापूर्वी जर काही लक्षणे असतील तर लस घेण्याअगोदर चाचणी करुन घ्यावी, असा सल्ला डॉ. शेखर साळकर यांनी आज दिला.   

सध्याच्या कोरोना महामारीचे संकट थोपवण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी अस्त्र असल्याचे डॉ. साळकर म्हणाले. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. शेखर साळकर यांनी आज पत्र सूचना कार्यालयाने पणजीतल्या धेंपे महाविद्यालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या “लसीकरणाची आवश्यकता का?” या विषयावरील वेबिनारमध्ये मार्गदर्शन केले. त्यात ते बोलत होते.

कोविड लसीकरणाविषयक कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका. महिलांनी मासिक पाळीच्या काळात लसीकरण करून घेणे अगदी सुरक्षित आहे. मात्र, गर्भवती, स्तनदा महिला आणि अ‍ॅलर्जिक व्यक्तींनी लस घेऊ नये, असे शासकीय नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. लसीकरणानंतर सौम्य लक्षणं दिसून येणे ही नियमित बाब आहे. त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही, असे त्यांनी सांगितले.

सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती तयार होत असून, त्याचे दुष्परिणाम अगदी नगण्य आहेत. तसेच लसीकरणानंतरही कोविडचा संसर्ग झाल्यास त्याची तीव्रता कमी असते. त्यामुळे कमी कालावधीत किमान 70% लोकसंख्येचे लसीकरण होणे आवश्यक आहे, असे डॉ. साळकर म्हणाले.

लसीकरणास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत लोकांचा फारसा प्रतिसाद नव्हता. ‘टीका उत्सवा’नंतर लसीकरण मोहिमेला गती आल्याचे त्यांनी सांगितले. युवा वर्गाला कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. अर्थचक्र सुरू राहण्यासाठी हे आवश्यकही आहे. त्यामुळे युवावर्गाने १ मेपासून सुरू होणाऱ्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात आवर्जून सहभागी व्हावे, असे आवाहनही डॉ. साळकर यांनी केले.

लसीकरणानंतरही कोविड अनुरूप योग्य वर्तन म्हणजे मास्कचा नियमित वापर, हातांची स्वच्छता आणि एकमेकांमध्ये योग्य अंतर या बाबींचे पालन करणे महत्त्वाचे आहे. मास्क वापरल्यामुळे संसर्गाचे प्रमाण होण्याची शक्यता ९५%नी कमी होते, अशी माहितीही त्यांनी दिली.

या वेबिनारमध्ये धेंपे महाविद्यालयाच्या उपप्राचार्या गौरी तांबा याही सहभागी झाल्या होत्या. पत्र सूचना कार्यालयाचे उपसंचालक विनोद कुमार यांनी प्रास्ताविक केले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content