Homeटॉप स्टोरीदेशात समान नागरी...

देशात समान नागरी कायदा व वन नेशन, वन इलेक्शन…

भारतीय जनता पार्टीचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात पक्षाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. या जाहीरनाम्याला भाजपाने संकल्पपत्र असे नाव दिले असून त्यात सत्तेवर आल्यानंतर देशात समान नागरी कायदा लागू करण्याची तसेच देशात लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एकाचवेळी घेण्याची ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची घोषणा केली.

समान नागरी

भाजपाच्या संकल्पपत्रातले महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे-

  1. मुद्रा योजनेतील कर्जांची लिमिट 10 लाखांवरुन 20 लाख.
  2. लखपती दीदी योजनेचा विस्तार करून 3 कोटी महिलांना लखपती बनवणार.
  3. आयुष्मान भारत योजना सर्व वर्गातील 70 वर्षे वयावरील नागरिकांना लागू करणार.
  4. पीएम आवास योजनेत नवीन 3 कोटी घरे बनवणार.
  5. एकलव्य शाळांची संख्या वाढवणार.
  6. तमिळ भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा आहे. तिचा विस्तार करणार.
  7. महिलांना अनेक क्षेत्रात कौशल्यविकास प्रशिक्षण देणार.
  8. टूरिझम क्षेत्राला बळ देणार. रोजगार वाढणार. अनेक क्षेत्राना संधी.
  9. इको टूरिजममध्ये आदिवासींना संधी.
  10. सोशल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार.
  11. फिजिकल व डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवणार.
  12. इंडस्ट्री 4.0साठी अनेक उपाय.
  13. नवीन रोजगार संधी उपलब्ध करुन देणार.
  14. वंदे भारत- 3 प्रकार स्लीपर, चेअर, मेट्रो.
  15. बुलेट ट्रेन- उत्तर, दक्षिण, पूर्व भारतात करणार.
  16. देशाला प्रत्येक क्षेत्रात आत्मनिभर करणार. एनर्जी, खाद्यतेल प्राधान्य.
  17. सूर्यघर योजनेचा विकास.
  18. ग्रीन एनर्जी हब, फार्मा हब, इलेक्ट्रॉनिक हब, सरंक्षण आयुधे हब.
  19. विश्वबंधू भारत. सर्व जगातील मानवतेचं रक्षण ही भारताची जबाबदारी.
  20. वन नेशन, वन इलेक्शन.
  21. समान नागरी कायदा.
  22. भ्रष्टाचारविरोधी मोहीम चालूच राहणार.
  23. देशात ऑलिम्पिकचे आयोजन करणार.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content