लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी येत्या 20 मे रोजी मतदान होणार असून त्याकरीता 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 695 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले आहेत. याच टप्प्यात मुंबईतल्या सहा, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पालघर या मतदारसंघांत मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 49 मतदारसंघांसाठी 1586 उमेदवारीअर्ज दाखल झाले होते. उमेदवारीअर्ज भरण्याची अखेरची तारीख 3 मे 2024 होती. आलेल्या सर्व अर्जांच्या छाननीनंतर 749 अर्ज वैध ठरले आहेत. महाराष्ट्रात 13 लोकसभा मतदारसंघांमधून सर्वाधिक 512 उमेदवारी अर्ज आले. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील 14 मतदारसंघांमधून 466 अर्ज दाखल झाले. झारखंडमधील 4-छत्र लोकसभा मतदारसंघात सर्वात जास्त 69 अर्ज; तर त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील 35-लखनौ मतदारसंघात 67 उमेदवारी अर्ज दाखल झाले. पाचव्या टप्प्यात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची प्रति मतदारसंघ सरासरी संख्या 14 आहे.
पाचव्या टप्प्यातील राज्य/केंद्रशासित प्रदेशनिहाय आकडेवारी
राज्य/केंद्रशासित प्रदेश | मतदारसंघांची संख्या | एकूण उमेदवारी अर्ज | छाननीनंतर वैध उमेदवारांची संख्या | अर्ज मागे घेतल्यानंतर अंतिमतः निवडणूक लढवणार असलेल्या उमेदवारांची संख्या |
बिहार | 5 | 164 | 82 | 80 |
जम्मू आणि कश्मिर | 1 | 38 | 23 | 22 |
झारखंड | 3 | 148 | 57 | 54 |
लदाख | 1 | 8 | 5 | 3 |
महाराष्ट्र | 13 | 512 | 301 | 264 |
ओदिशा | 5 | 87 | 41 | 40 |
उत्तर प्रदेश | 14 | 466 | 147 | 144 |
पश्चिम बंगाल | 7 | 163 | 93 | 88 |
Total | 49 | 1586 | 749 | 695 |