Homeएनसर्कलपाणबुडी आयएनएस अरिघाट...

पाणबुडी आयएनएस अरिघाट नौदलासाठी सज्ज

हिंद महासागर क्षेत्रात भारताची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार कंबर कसली आहे. चीनच्या वेगवान हालचालीवर लक्ष ठेवत त्याला अचूक उत्तर देण्यासाठी भारताने वेगवान पद्धतीने प्रगतीचा जणू काही आलेखच तयार केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. याचाच भाग म्हणून हिंद महासागरात अणू क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली पाणबुडी आयएनएस अरिघाट, भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे.

विशाखापट्टणम येथील जहाजबांधणी केंद्रात प्रगत तंत्रज्ञान जहाज (ATV) प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आले आहे. भारताची पहिली बॅलेस्टिक मिसाईल पाणबुडी INS अरिहंत 2009मध्ये लाँच करण्यात आली. याशिवाय पारंपारिक शस्त्रांसह दोन अणुऊर्जेवर हल्ला करणाऱ्या पाणबुड्या तयार करण्याचा प्रकल्पही अंतिम मंजुरीच्या जवळ आहे.


नौदलाला दुसरी 6,000 टन अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी INS अरिघाट मिळाल्यानंतर, भारत आता हिंद महासागर क्षेत्रात चीनकडून सामरिक प्रतिकारासाठी वाढत्या आव्हानांना तोंड देऊ शकेल. भारतीय नौदलाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिघाट तीन वर्षांच्या सागरी चाचण्यांनंतर या वर्षाच्या अखेरीस समुद्रात दाखल होईल.

भारतात बांधलेली ही दुसरी अरिहंत श्रेणीची पाणबुडी आहे. विस्तारित कालावधीत सुधारणा करून काही तांत्रिक समस्यांचे निराकरण केले गेले, ज्यामुळे पाणबुडी व्यापक चाचण्यांनंतर औपचारिक कार्यान्वित होण्यासाठी पूर्णपणे तयार राहिली. भारताची पहिली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिहंत 9 वर्षांच्या व्यापक चाचण्यांनंतर ऑगस्ट 2016मध्ये दाखल करण्यात आली.

दोन वर्षांच्या चाचणीनंतर 2018मध्ये ती पूर्णपणे कार्यान्वित झाले. जवळपास पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर २०१७मध्ये आयएनएस अरिघाट लाँच करण्यात आले. ही पाणबुडी मूळत: आयएनएस अरिधमान या नावाने ओळखली जात होती. परंतु लॉन्च झाल्यावर त्याचे नाव आयएनएस अरिघाट असे ठेवले गेले.

Continue reading

राष्ट्रीय महामार्गांवरून आता ओव्हरलोड वाहनेही धावणार सुसाट!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील अतिभारित (ओव्हरलोडेड) वाहनांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणारी कायदेशीर सुधारणा अधिसूचित केली ाहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरून अतिरिक्त शुल्क देऊन नियमापेक्षा जास्त माल घेऊन जाण्यास मालवाहतूकदारांना सहज शक्य होणार आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्गांवर आता...

‘अच्चप्पास् अल्बम’ येत्या 24 एप्रिलला होणार प्रदर्शित

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ म्हणजेच एनएफडीसी आपला मल्याळम चित्रपट ‘अच्चप्पास् अल्बम’ (आजीचा अल्बम) येत्या 24 एप्रिलला देशभर प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे. या चित्रपटात कौटुंबिक कल्पनारम्य कथा, विनोद आणि भावनांच्या कल्लोळाचा एक अनोखा मेळ...

‘एआय’च्या नादात ‘कोअर’ विषयांकडे नका करू दुर्लक्ष!

सध्या सगळीकडे 'एआय'(आर्टिफिशियल इंटेलिजन्स) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि 'डेटा सायन्स'ची हवा आहे. पण, तुम्ही जर याच वर्षी इंजिनीअरिंगला ॲडमिशन घेण्याचा विचार करत असाल, तर हा रिपोर्ट तुमच्यासाठी 'गेम चेंजर' ठरू शकतो. प्रसिद्ध करिअर सल्लागार जयप्रकाश गांधी यांनी विद्यार्थ्यांना एक...
Skip to content