Homeएनसर्कलपाणबुडी आयएनएस अरिघाट...

पाणबुडी आयएनएस अरिघाट नौदलासाठी सज्ज

हिंद महासागर क्षेत्रात भारताची ताकद वाढविण्यासाठी केंद्र सरकारने जोरदार कंबर कसली आहे. चीनच्या वेगवान हालचालीवर लक्ष ठेवत त्याला अचूक उत्तर देण्यासाठी भारताने वेगवान पद्धतीने प्रगतीचा जणू काही आलेखच तयार केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. याचाच भाग म्हणून हिंद महासागरात अणू क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली पाणबुडी आयएनएस अरिघाट, भारतीय नौदलात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे.

विशाखापट्टणम येथील जहाजबांधणी केंद्रात प्रगत तंत्रज्ञान जहाज (ATV) प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आले आहे. भारताची पहिली बॅलेस्टिक मिसाईल पाणबुडी INS अरिहंत 2009मध्ये लाँच करण्यात आली. याशिवाय पारंपारिक शस्त्रांसह दोन अणुऊर्जेवर हल्ला करणाऱ्या पाणबुड्या तयार करण्याचा प्रकल्पही अंतिम मंजुरीच्या जवळ आहे.


नौदलाला दुसरी 6,000 टन अणुऊर्जेवर चालणारी पाणबुडी INS अरिघाट मिळाल्यानंतर, भारत आता हिंद महासागर क्षेत्रात चीनकडून सामरिक प्रतिकारासाठी वाढत्या आव्हानांना तोंड देऊ शकेल. भारतीय नौदलाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिघाट तीन वर्षांच्या सागरी चाचण्यांनंतर या वर्षाच्या अखेरीस समुद्रात दाखल होईल.

भारतात बांधलेली ही दुसरी अरिहंत श्रेणीची पाणबुडी आहे. विस्तारित कालावधीत सुधारणा करून काही तांत्रिक समस्यांचे निराकरण केले गेले, ज्यामुळे पाणबुडी व्यापक चाचण्यांनंतर औपचारिक कार्यान्वित होण्यासाठी पूर्णपणे तयार राहिली. भारताची पहिली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी INS अरिहंत 9 वर्षांच्या व्यापक चाचण्यांनंतर ऑगस्ट 2016मध्ये दाखल करण्यात आली.

दोन वर्षांच्या चाचणीनंतर 2018मध्ये ती पूर्णपणे कार्यान्वित झाले. जवळपास पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर २०१७मध्ये आयएनएस अरिघाट लाँच करण्यात आले. ही पाणबुडी मूळत: आयएनएस अरिधमान या नावाने ओळखली जात होती. परंतु लॉन्च झाल्यावर त्याचे नाव आयएनएस अरिघाट असे ठेवले गेले.

Continue reading

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...
Skip to content