Homeटॉप स्टोरी... तर आम्ही...

… तर आम्ही केलेला कायदा उच्च न्यायालयात कसा टिकला?

लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स नसता तर आमच्या सरकारने पारित केलेला कायदा उच्च न्यायालयात कसा काय टिकला असता, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणावरील चर्चेत केला. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले की, सर्वोच्च न्यायालयाने आपण केलेला कायदा अवैध ठरवलेला आहे, ही आज स्थिती आहे. त्यावर क्युरेटिव्ह पिटिशन आपल्या सरकारने केलेली आहे आणि त्यात आपल्याला यश आले तर आमच्या शुभेच्छाच आहेत.

मराठा आरक्षणारून पृथ्वीराज चव्हाण आणि देवेन्द्र फडणीस यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली. केंद्र सरकारच्या १०२व्या घटनादुरुस्तीबद्दल तुम्ही जाणूनबुजून चुकीचा अन्वयार्थ सभागृहासमोर मांडत आहात कारण तुम्हाला सर्व काही माहीत असूनही राजकीय भाषण करायचे आहे, असे सांगत फडणवीस यांनी चव्हाण यांचे मुद्दे खोडून काढले.

कायदा

विधानसभेत मंगळवारी रात्री मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर ठपका ठेवत आरोप केला की, तुम्ही २०१८मध्ये मराठा आरक्षण विधेयक आणले, तेव्हाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगावे की तुम्हाला वैधानिक अधिकार होता का… केंद्र सरकारच्या १०२व्या घटनादुरुस्तीमुळे एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राने जुलै २०१८पासून काढून घेतला होता. त्यामुळे ते विधेयक आणण्याचा अधिकार तुम्हाला होता का… त्यावर फडणवीस यांनी हस्तक्षेप करून सभागृहाला सांगितले की, १०२वी घटनादुरुस्ती ही राज्यामध्ये असलेल्या मागास आयोगाला घटनात्मकता नव्हती ती देण्यासाठी केलेली होती. तसे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. यासंदर्भातील संदिग्धता दूर करण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र केंद्राने दिले आणि पुढे १०५वी घटनादुरुस्तीही केली. पण पृथ्वीराज चव्हाण यांना हे सर्व माहीत असले तरी त्यांना राजकीय भाषण करायचे असल्याने ते मुद्दाम ते तसे मांडत आहेत.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content