Homeटॉप स्टोरी... तर आम्ही...

… तर आम्ही केलेला कायदा उच्च न्यायालयात कसा टिकला?

लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स नसता तर आमच्या सरकारने पारित केलेला कायदा उच्च न्यायालयात कसा काय टिकला असता, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठा आरक्षणावरील चर्चेत केला. त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले की, सर्वोच्च न्यायालयाने आपण केलेला कायदा अवैध ठरवलेला आहे, ही आज स्थिती आहे. त्यावर क्युरेटिव्ह पिटिशन आपल्या सरकारने केलेली आहे आणि त्यात आपल्याला यश आले तर आमच्या शुभेच्छाच आहेत.

मराठा आरक्षणारून पृथ्वीराज चव्हाण आणि देवेन्द्र फडणीस यांच्यात विधानसभेत खडाजंगी झाली. केंद्र सरकारच्या १०२व्या घटनादुरुस्तीबद्दल तुम्ही जाणूनबुजून चुकीचा अन्वयार्थ सभागृहासमोर मांडत आहात कारण तुम्हाला सर्व काही माहीत असूनही राजकीय भाषण करायचे आहे, असे सांगत फडणवीस यांनी चव्हाण यांचे मुद्दे खोडून काढले.

कायदा

विधानसभेत मंगळवारी रात्री मराठा आरक्षणाच्या विषयावर बोलताना चव्हाण यांनी फडणवीस सरकारवर ठपका ठेवत आरोप केला की, तुम्ही २०१८मध्ये मराठा आरक्षण विधेयक आणले, तेव्हाचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगावे की तुम्हाला वैधानिक अधिकार होता का… केंद्र सरकारच्या १०२व्या घटनादुरुस्तीमुळे एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राने जुलै २०१८पासून काढून घेतला होता. त्यामुळे ते विधेयक आणण्याचा अधिकार तुम्हाला होता का… त्यावर फडणवीस यांनी हस्तक्षेप करून सभागृहाला सांगितले की, १०२वी घटनादुरुस्ती ही राज्यामध्ये असलेल्या मागास आयोगाला घटनात्मकता नव्हती ती देण्यासाठी केलेली होती. तसे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले आहे. यासंदर्भातील संदिग्धता दूर करण्यासाठी हे प्रतिज्ञापत्र केंद्राने दिले आणि पुढे १०५वी घटनादुरुस्तीही केली. पण पृथ्वीराज चव्हाण यांना हे सर्व माहीत असले तरी त्यांना राजकीय भाषण करायचे असल्याने ते मुद्दाम ते तसे मांडत आहेत.

Continue reading

बहुभाषिक ॲक्शन चित्रपट ‘राजा शिवाजी’ महाराष्ट्रदिनी होणार प्रदर्शित!

जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनीने आज एक अत्यंत महत्वाकांक्षी घोषणा केली आहे. रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत, भव्य ऐतिहासिक ॲक्शन ड्रामा 'राजा शिवाजी' हा चित्रपट येत्या महाराष्ट्रदिनी, १ मे २०२६ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट मराठी,...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला "फिल्मी कथा" हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील...

‘कप बशी’त दिसणार पूजा सावंत आणि ऋषी मनोहर!

नवनवे प्रयोग, नव्या कल्पना मराठी चित्रपटसृष्टीत होत असतात. आता आगामी "कप बशी" या चित्रपटातून पूजा सावंत आणि ऋषी मनोहर ही नवी जोडी प्रेक्षकांसमोर येणार आहे. अत्यंत मजेशीर, मनोरंजक अशी कहाणी या चित्रपटातून उलगडणार असून सध्या मुंबईत या चित्रपटाचे चित्रिकरण...
Skip to content