Homeहेल्थ इज वेल्थ17 सप्टेंबरपासून 17...

17 सप्टेंबरपासून 17 कोटींहून जास्त लोकांची 7 आजारांची तपासणी!

आयुष्मान भव कार्ड, आभा कार्डांची निर्मिती, आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण योजना आणि असंसर्गजन्य रोग, क्षय, सिकल सेल आदी विविध रोगांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी देशाच्या विविध भागांत 17 सप्टेंबर 2023 पासून आरोग्य मेळावे भरवण्यात आले. या काळात 17 कोटींपेक्षा जास्त (17,26,66,845) लोकांनी क्षय रोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, मोतीबिंदू, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व गर्भाशयमुखाच्या कर्करोग आदी सात प्रकारच्या आजारांच्या चाचण्या करून घेतल्या आहेत. 16 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात 86,19,636 लोकांनी या सात रोगांच्या चाचण्यांचा लाभ घेतला आहे.

देशातील तळागाळातील लोकसंख्येपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी 13 सप्टेंबर 2023 रोजी गुजरातमधल्या गांधीनगर इथून दूरदृश्य माध्यमातून ‘आयुष्मान भव’ पोर्टलचे उद्घाटन केले व अभियानाला सुरुवात केली. अभियानाला सुरुवात झाल्यापासून आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये भरवलेल्या 12.6 आरोग्य मेळाव्यांना 16 डिसेंबर 2023 पर्यंत10 कोटींपेक्षा जास्त लोकांनी उपस्थिती लावल्याची नोंद झाली आहे.

सामाजिक आरोग्य केंद्रांमध्ये 34,107 आरोग्य मेळावे भरवण्यात आले असून त्यामध्ये एकूण 1,37,84,954 लोकांनी नोंदणी केली.

देशातील तळागाळातील प्रत्येकापर्यंत आरोग्य सेवा घेऊन जाण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वचनबद्धतेतून ‘आयुष्मान भव’ उपक्रम साकारला आहे. त्याद्वारे देशातील प्रत्येक गाव, शहरापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

तपासणी

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content