Homeडेली पल्सशरद पोंक्षेंच्या विधानाने...

शरद पोंक्षेंच्या विधानाने खळबळ, भाजपाई अस्वस्थ!

प्रखर हिंदुत्ववादी विचार आणि सावरकरभक्तीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. “मी भाजपसारखे दहा पक्ष उभे करू शकतो,” असे खळबळजनक विधान पोंक्षे यांनी केल्यामुळे राजकीय आणि सांस्कृतिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पोंक्षे यांच्या या विधानाचा भाजपनेही खरपूस समाचार घेतला असून त्यांना जमिनीवर येण्याचा सल्ला दिला आहे.

नेमकं प्रकरण काय?

शरद पोंक्षे, हे नेहमीच भाजपच्या विचारसरणीच्या जवळ जाणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही मुद्द्यांवरून त्यांचे आणि भाजपच्या काही नेत्यांचे मतभेद समोर येत होते. एका जाहीर कार्यक्रमात बोलताना पोंक्षे यांचा संयम सुटलेला पाहायला मिळाला. “कोणीही आपल्याला गृहीत धरू नये. मी आजही भाजपसारखे दहा पक्ष उभे करण्याची ताकद ठेवतो,” असे विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानाने भाजपच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे.

भाजपचा पलटवार: “अहंकाराचा फुगा फुटायला वेळ लागत नाही”

पोंक्षे यांच्या या विधानावर भाजपच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “भाजप हा केवळ एका व्यक्तीचा किंवा वक्तव्याचा पक्ष नाही. हा पक्ष लाखो कार्यकर्त्यांचे रक्त आणि घाम गाळून उभा राहिला आहे. विचारधारेसाठी आयुष्य वेचलेल्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आज भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे कोणीही अहंकाराच्या भाषेत बोलू नये, कारण अहंकाराचा फुगा फुटायला वेळ लागत नाही,” अशा शब्दांत भाजपने पोंक्षेंना प्रत्युत्तर दिले आहे.

“विचारधारा मोठी की व्यक्ती?” : सोशल मीडियावर चर्चा

शरद पोंक्षे यांच्या या विधानानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडले आहेत. काहींनी पोंक्षेंच्या धडाडीचे कौतुक केले असून, “पक्ष विचारांपासून भरकटत असेल तर त्यांना आरसा दाखवणे गरजेचे आहे,” असे म्हटले आहे. तर दुसरीकडे, भाजप समर्थकांनी “एखादा अभिनेता पक्ष उभा करण्याची भाषा करत असेल तर तो त्यांचा भाबडा समज आहे,” अशी टीका केली आहे.

सांस्कृतिक वर्तुळात खळबळ

नेहमीच भाजपच्या व्यासपीठावर दिसणारे शरद पोंक्षे आता पक्षाच्या विरोधात उभे ठाकले आहेत का? असा प्रश्न विचारला जात आहे. पोंक्षे यांनी याआधीही अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय विसंगतींवर बोट ठेवले आहे, मात्र यावेळी त्यांनी थेट पक्षाच्या अस्तित्त्वावरच विधान केल्याने हा वाद आता कायदेशीर किंवा वैयक्तिक पातळीवर जाण्याची शक्यता आहे.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content