Homeब्लॅक अँड व्हाईटमंगला अडसूळ स्मृती...

मंगला अडसूळ स्मृती बुद्धीबळः देवांश, नीलसह सरदाना विजयी

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिनानिमित्त झालेल्या मंगला अडसूळ स्मृती चषक ८/१०/१२ वर्षांखालील शालेय बुध्दिबळ स्पर्धेत मुलांमध्ये देवांश घाडीगावकर, नील भट, रेयांश जैन यांनी अपराजित राहून सर्वाधिक ५ साखळी गुणासह निर्विवाद विजेतेपद पटकाविले. सरदाना मिरी, शानया दोशी, आस्या चव्हाण यांनी मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविला.

को-ऑपरेटीव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई, आरएमएमएस व मुंबई बुद्धीबळ संघटना सहकार्यित स्पर्धेप्रसंगी माजी केंद्रीय राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांचा आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी व बुद्धीबळपटूंच्यावतीने विशेष गौरव कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.

मंगला अडसूळ स्मृती ८ वर्षांखालील बुद्धीबळ स्पर्धेत मुलांमध्ये देवांश घाडीगावकरने (५ गुण) प्रथम, वेद मीलनने (४.५ गुण) द्वितीय, विराज बदानीने (४ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये सरदाना मिरीने (३ गुण) प्रथम, समीरा थोरातने (३ गुण) द्वितीय, जिवी गालाने (२.५ गुण) तृतीय पुरस्कार मिळविला. १० वर्षांखालील मुलांमध्ये नील भटने (५ गुण) प्रथम, रेयांश  त्रिवेदीने (४ गुण) द्वितीय, आशय महाजनने (३.५ गुण) तृतीय आणि मुलींमध्ये शानया दोशीने (३ गुण) प्रथम, शरण्या महेश्वरीने (३ गुण) द्वितीय, वेदा फुरीयाने (२ गुण) तृतीय क्रमांक मिळविला. १२ वर्षांखालील गटात मुलांमध्ये रेयांश जैनने (५ गुण) प्रथम, वेदांत मगरेने (३.५ गुण) द्वितीय, दीप फुणगेने (३.५ गुण ) तृतीय आणि मुलींमध्ये आस्या चव्हाणने (३.५ गुण) प्रथम पुरस्कार जिंकला.

Continue reading

फेसबुक, इन्स्टाग्रामला ५,४०० कोटींचा दंड

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा लहान मुलांवर आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा गंभीर परिणाम लक्षात घेता, अमेरिकन न्यायालयाने 'मेटा' (फेसबुक आणि इन्स्टाग्रामची मूळ कंपनी) ला मोठा दणका दिला आहे. मुलांच्या सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी, त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोहोचवल्याप्रकरणी आणि गोपनीयतेच्या उल्लंघनाबाबत...

सोशल मीडियावरचे १८ वर्षांखालील युझर्स ‘बालक’!

लहान मुले आणि तरुणांवर सोशल मीडिया तसेच ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या दुष्परिणामांना आळा घालण्यासाठी संसदेत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. भाजपचे खासदार बैजयंत पांडा यांनी संसदेत ‘शिल्ड’ नावाचे एक खासगी विधेयक मांडण्याची नोटीस दिली आहे. या प्रस्तावित विधेयकानुसार, १३...

देशातल्या नागरी सहकारी बँकांचे मुख्यालय दिल्लीहून मुंबईत!

देशातील नागरी सहकारी बँकिंग क्षेत्राला अधिक बळकट करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनयूसीएफडीसी) या सर्वोच्च संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीहून मुंबईत हलवण्यात आले आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी या...
Skip to content