Monday, May 12, 2025
Homeमुंबई स्पेशलसफाई कामगारांच्या विस्थापन...

सफाई कामगारांच्या विस्थापन भत्त्यात ६ हजारांची वाढ

मुंबई महापालिकेच्‍या आश्रय योजना अंतर्गत घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यातील सफाई कामगारांच्‍या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्‍यात येणाऱ्या विस्‍थापन भत्त्यात ६ हजार रूपयांची वाढ करण्‍यात आली आहे. ही वाढ १ जुलै २०२४पासून लागू होणार आहे. तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन सप्‍टेंबर २०२४च्‍या मासिक वेतनात जुलै २०२४ व ऑगस्‍ट २०२४ या दोन महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे. 

सध्या पालिका सेवा सदनिकाधारक सफाई कामगाराला विस्‍थापन भत्ता १४ हजार रूपये आणि दरमहा घरभाडे भत्ता दिला जातो. या भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने विस्‍थापन भत्त्यात ६ हजार रूपयांची वाढ करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे विस्‍थापन भत्ता आता दरमहा २० हजार रूपये करण्यात आला आहे.

ही वाढ दिनांक १ जुलै २०२४पासून लागू होणार आहे. प्रशासकीय तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करुन सप्‍टेंबर २०२४च्‍या मासिक वेतनात जुलै व ऑगस्‍ट महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे, असे पालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. 

Continue reading

मंगळवारी ठाण्याच्या डॉ. घाणेकर नाट्यगृहात ‘प्री-वेडिंग’!

लव मॅरेज की अरेंज मॅरेज? लग्न करून पाहवं की लग्न करूच नये? पती-पत्नी यांचं नातं कल्पनेत आणि प्रत्यक्षात कसं असतं? अलीकडचे लग्नाच्या वयाचे तरुण-तरुणी या गुंत्यामध्ये अडकलेले असतात. नेमकं काय करावं? त्यांचा गोंधळ उडतो. निर्णय होत नाही. वय वाढत जातं.. आणि मग ठरतं.. 'प्री-वेडिंग'! .....

अडसूळ ट्रस्ट राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत एमडीसी अजिंक्य

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त लाईफ इन्शुरन्स कार्पोरेशन ऑफ इंडिया पुरस्कृत विनाशुल्क शालेय खेळाडूंच्या राज्यस्तरीय सुपर लीग कॅरम स्पर्धेत राज्य ख्यातीचे कॅरमपटू रत्नागिरीची स्वरा मोहिरे, सार्थक केरकर, अमेय जंगम, वेदिका पोमेंडकर यांच्या एमडीसी ज्वेलर्स संघाने अजिंक्यपद पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात...

भारताविरोधात पाकिस्तान युद्ध पुकारणार?

पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना उखडून टाकण्यासाठी भारताने सुरू केलेले ऑपरेशन सिंदूर अजूनही चालूच असून पाकिस्तानचा एकूण पवित्रा पाहता लवकरच पाक भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एखाद्या राष्ट्राविरोधात युद्ध पुकारण्याचे पाप आपल्या माथी येऊ नये, मात्र युद्ध पुकारण्यासाठी पाकला भाग...
error: Content is protected !!
Skip to content