Homeमुंबई स्पेशलसफाई कामगारांच्या विस्थापन...

सफाई कामगारांच्या विस्थापन भत्त्यात ६ हजारांची वाढ

मुंबई महापालिकेच्‍या आश्रय योजना अंतर्गत घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍यातील सफाई कामगारांच्‍या वसाहतींचे पुनर्वसन करताना देण्‍यात येणाऱ्या विस्‍थापन भत्त्यात ६ हजार रूपयांची वाढ करण्‍यात आली आहे. ही वाढ १ जुलै २०२४पासून लागू होणार आहे. तांत्रिक व प्रशासकीय बाबींची पूर्तता करुन सप्‍टेंबर २०२४च्‍या मासिक वेतनात जुलै २०२४ व ऑगस्‍ट २०२४ या दोन महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे. 

सध्या पालिका सेवा सदनिकाधारक सफाई कामगाराला विस्‍थापन भत्ता १४ हजार रूपये आणि दरमहा घरभाडे भत्ता दिला जातो. या भत्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात केली होती. त्यानुसार पालिका प्रशासनाने विस्‍थापन भत्त्यात ६ हजार रूपयांची वाढ करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे विस्‍थापन भत्ता आता दरमहा २० हजार रूपये करण्यात आला आहे.

ही वाढ दिनांक १ जुलै २०२४पासून लागू होणार आहे. प्रशासकीय तसेच तांत्रिक बाबींची पूर्तता करुन सप्‍टेंबर २०२४च्‍या मासिक वेतनात जुलै व ऑगस्‍ट महिन्‍यांच्‍या फरक रकमेसह संपूर्ण वाढीव रक्‍कम वेतनाद्वारे अदा केली जाणार आहे, असे पालिका प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. 

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content