Homeन्यूज अँड व्ह्यूजवाड्यातला रस्ता २०...

वाड्यातला रस्ता २० वर्षे अर्धवट!

पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील रस्त्यांची ही स्थिती आहे. वाड्यातील एसटी थांब्याच्या आसपास सर्वत्र असेच रस्ते आहेत. मधला रस्ता सिमेंट काँक्रिटचा व बाजूच्या दोन्ही बाजूस कच्चा रस्ता. वास्तविक ज्या कंत्राटदाराने काँक्रिटचा रस्ता बांधला त्यानेच बाजूचा भागही व्यवस्थित डांबरी रस्ता करायचे बंधनकारक असते. खरेतर तालुका पंचायत समितीने त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. परंतु संपूर्ण वाडा तालुक्यात असेच अर्धवट रस्ते बांधलेले दिसतात.

एका औषध दुकानदाराने सांगितले की, गेली सुमारे २० वर्षे रस्ते असेच अर्धवट अवस्थेत आहेत. वाडा ग्रामपंचायत समितीच्या आजूबाजूचा रस्ताही असाच आहे. इतकेच नव्हे तर बाजूला एक बांधकामाचे साहित्य विक्रीचे दुकान असून त्या दुकानात विक्रीला आणलेली माती वा वाळूही हा दुकानदार बाजूच्या रस्त्यावरच ठेवतो, अशी नागरिकांची तक्रार आहे. तसेच शासकीय विश्रामगृहाच्या आजूबाजूलाही बरेच टेम्पो उभे करून ठेवलेले असतात. एसटी आगाराच्या समोरच सरकारी रुग्णालय आहे. आसपास बाजारपेठही आहे. सकाळ-संध्याकाळ येथे वाहतूकही मोठ्या प्रमाणावर असते. अनेकवेळा या चौकात वाहतूककोंडी होते. मी जवळजवळ दोन दिवस या परिसरात होतो. पण साधा पोलीस हवालदारही येथे दिसला नाही. लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या परिसरातील उमेदवारांनी रस्त्याच्या परिस्थिती तसेच वाहतूककोंडीबाबत ठोस निर्णय घ्यावेत ही अपेक्षा!

(लेखक विजयकुमार काळे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

Continue reading

माध्यमांना ठाकरेंच्या शिवसेनेचे का बरे वावडे?

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आज दाकल झाले. या प्रक्रियेत गेल्या चार दिवसांपासून विविध मराठी वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत एक सवाल विचारला गेला- उबाठाचे प्रवक्ते पत्रकारांना वा वृत्तवाहिन्यांना उपलब्ध का नसतात? त्याबाबत निरीक्षणातून हाती आलेली...

‘केइएम’मध्ये मदत कक्षालाच हवी मदत! तपासायला डॉक्टर मिळाला तर उत्तमच!!

मुंबई महापालिकेच्या प्रमुख समजल्या जाणाऱ्या केइएम रुग्णालयात डॉक्टरांसहित कर्मचारी-कामगारांमध्ये सुमारे २० टक्के इतकी मोठी कपात करण्यात आली असून मोडकळीस आलेले स्ट्रेचर्स वगैरे सामान गोदमात ढकलून देण्यासाठीही कामगार नसल्याची संतापजनक माहिती हाती आली आहे. अपघात विभागातील डॉक्टरांची संख्या तर एक-दोन...

मुंबई बॉम्बस्फोटांचे मास्टरमाईंड अंमली पदार्थांच्या फॅक्टरीमागे?

मुंबईच्या आग्रीपाडा पोलीसठाण्याच्या समोरच्या बाजूसच असलेल्या घास गल्लीतील अमली पदार्थांचा कारखाना नार्कोटिक्स विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर गेले सुमारे पाच-सहा दिवस दक्षिणमध्य मुंबईतील अनेक भागांना भेटी दिल्यानंतर एक गोष्ट हळूहळू स्पष्ट होत आहे की, या अमली पदार्थांच्या व्यापार व कारखान्यांमागे मुंबईत...
Skip to content