Homeबॅक पेजराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ओदिशात तीन नवीन रेल्वे सुरू!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल ओदिशामधील बदमपहार रेल्वे स्थानकावरून तीन नवीन रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. बदमपहार–टाटानगर मेमू, बदमपहार–रुरकेला साप्ताहिक एक्सप्रेस, आणि बदमपहार-शालीमार साप्ताहिक एक्सप्रेस, या गाड्यांचा यात समावेश आहे.

त्यांनी यावेळी रायरंगपूर येथील नवीन टपाल विभागाचे उद्घाटन केले, तसेच त्याच्या स्मरणार्थ रायरंगपूर टपाल विभागाचे विशेष टपाल पाकीट प्रकाशित केले आणि बदमपहार रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पाची पायाभरणी केली.   

यावेळी आयोजित समारंभाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, एखाद्या प्रदेशाचा विकास हा तेथील दळणवळणाच्या सुविधांवर अवलंबून असतो. मग रेल्वे असो, अथवा टपाल सेवा, या सर्व सेवा लोकांचे जीवन सुकर करतात. त्या म्हणाल्या की, आज सुरू झालेल्या तीन गाड्या स्थानिक जनतेला झारखंड आणि पश्चिम बंगालसारख्या शेजारच्या राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी उपयोगी ठरतील. त्यांनी सांगितले की, यामुळे ओदिशामधील रुरकेला या औद्योगिक शहराला भेट देणाऱ्या लोकांची गैरसोयही होणार नाही. 

राष्ट्रपती म्हणाल्या की, सेल फोन आणि कुरिअर सेवांचा वाढता वापर असूनही, भारतीय टपाल विभागाने आपली काल-सुसंगतता गमावलेली नाही. रायरंगपूर येथील नवीन टपाल विभाग या प्रदेशासाठी महत्वाचा ठरेल. या भागातील लोकांना आता टपाल सेवा सहज उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकार आदिवासी समाजाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे, असे सांगत, 2013-14 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत चालू अर्थसंकल्पात जवळजवळ तिप्पट वाढ झाल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. त्या म्हणाल्या की, आदिवासींच्या विकासाशिवाय सर्वसमावेशक विकास अपूर्ण आहे, आणि त्यासाठी सरकार आदिवासी समाजाच्या विकासाला प्राधान्य देत आहे. आदिवासी युवकांनी सरकारी योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. स्वतःचा विकास साधायचा असेल, तर प्रयत्न आवश्यक आहेत, आणि म्हणूनच युवकांनी जीवनात पुढे जायचा सातात्त्याने प्रयत्न करायला हवा, असे राष्ट्रपतींनी सांगितले.

Continue reading

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...

प्राजक्ता वर्मा-लवंगारेंनी स्वीकारला कार्यभार

मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून आज प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांनी कार्यभार स्वीकारला. पालिका प्रशासनाच्या वतीने सहआयुक्त (सुधार) संजोग कबरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्राजक्ता वर्मा-लवंगारे यांचे शिक्षण बी. ए., एल. एल. बी., एम. ए. असे शिक्षण झाले आहे. त्यांनी लंडन...
Skip to content