Homeटॉप स्टोरीमुंबईतली पासपोर्ट कार्यालये...

मुंबईतली पासपोर्ट कार्यालये आजपासून बंद!

महाराष्ट्राच्या “ब्रेक द चेन” उपक्रमाचा भाग म्हणून कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईच्या क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाने आज, दि. 23.04.2021पासून सर्व पासपोर्ट कार्यालय केंद्रे (पीएसकेएस) आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे (पीओपीकेएस)चे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा निर्णय महाराष्ट्र सरकारने कोरोना संक्रमण रोखण्याच्या संदर्भात जारी केलेला आदेशानुसार आहे. या आदेशानुसार तारीख 22.04.2021 च्या रात्री 8 पासून ते 01.05.2021 च्या सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात सामान्य कामांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबई अंतर्गत असलेल्या सर्व पीएसके (PSK) आणि पीओपीएसके (POPSK)मधील सेवा आणि क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबई येथील चौकशी काउंटर 30.04.2021पर्यंत बंद राहतील.

सर्व अर्जदार, ज्यांनी आधीच त्यांच्या भेटीची वेळ निश्चित केली आहे, त्यांना सेवा प्रदाता कंपनी टीसीएसद्वारे एसएमएसद्वारे सूचित केले जात आहे. तथापि, सर्व अर्जदारांना कळवण्यात येते की, दिनांक 23.04.2021 ते 01.05.2021पर्यंत या कार्यालयाच्या कोणत्याही पासपोर्ट सेवा केंद्रात अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तेव्हा त्यांनी कोणत्याही पीएसके/पीओपीएसकेला भेट देऊ नये.

अर्जदार क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय, मुंबई या कार्यालयात दूरध्वनीद्वारे (022-26520016/17) संपर्क करू शकतात किंवा कोणत्याही माहितीसाठी इमेल (rpo.mumbai@mea.gov.in)द्वारे संपर्क साधू शकतात.  तसेच वेबसाइट www.passportindia.gov.in / ट्विटर हैंडल (@rpomumbai) किंवा क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या फ़ेसबुक पेजच्या माध्यमातून पासपोर्ट कार्यालयाशी संपर्क साधता येईल.

Continue reading

नवज्योत सिंग सिद्धूची भाजपमध्ये घरवापसी?

पंजाबच्या राजकारणात मोठ्या फेरबदलाची चिन्हे असून माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा एकदा भाजपमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २०२७च्या पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने खास 'मास्टरप्लॅन' तयार केला असून, आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनंतर...

अजिंक्यतारा मल्लखांब स्पर्धेत सुविद्या, समता, मुंबादेवी संघ चमकले!

मुंबईत मल्लखांब लव संघ, सुविद्या प्रसारक संघ आणि आर्किटेक्चर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बोरीवली (पश्चिम) येथे "५वी अजिंक्यतारा मल्लखांब चषक स्पर्धा" उत्साही वातावरणात नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा मल्लखांब खेळातील अनभिषिक्त सम्राट दत्ताराम दुदम यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात येते....

आता ‘बापूजी’ही सोडणार ‘तारक मेहता..’?

छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय आणि गेल्या १६ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (टीएमकेओसी) पुन्हा एकदा वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. मालिकेतील सर्वात महत्त्वाचे पात्र 'बापूजी' म्हणजेच चंपकलाल जयंतीलाल गडा यांची भूमिका साकारणारे अभिनेते...
Skip to content