Homeबॅक पेजआता डेटा सेंटर्स...

आता डेटा सेंटर्स वाचणार ‘ओव्हरहीटिंग’पासून!

भारताच्या डिजिटल क्रांतीला आता स्वदेशी विज्ञानाची जोड मिळणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (AI) वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्समध्ये निर्माण होणारी प्रचंड उष्णता कमी करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि जागतिक पायाभूत सुविधा कंपनी ‘व्हर्टिव्ह’ यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५पर्यंत हाय-टेक चिप्सचा वीज वापर १,२०० वॅट्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असताना, हे नवे तंत्रज्ञान डेटा सेंटर्सना ‘ओव्हरहीटिंग’पासून वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करता येणार आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच डेटा सेंटर चालवण्याचा खर्चही बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

या भागीदारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आयआयटी मुंबईने विकसित केलेले ‘रोटेटिंग कॉन्टॅक्टिंग डिस्क’ हे पेटंट तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान एअर कंडिशनिंगसाठी लागणारी अवाढव्य वीज वाचवण्यास मदत करते. यामुळे डेटा सेंटरची कार्यक्षमता १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात व्हर्टिव्हने डिझाइन केलेल्या ४० किलोवॅट क्षमतेच्या कूलिंग सिस्टीमपासून होणार आहे. या प्रणालीची पहिली चाचणी आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत होईल आणि त्यानंतर व्हर्टिव्हच्या पुणे येथील अत्याधुनिक प्रकल्पात तिचे अंतिम परीक्षण केले जाईल. हे तंत्रज्ञान केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योगांत वापरले जाणार असल्याने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेला मोठी ताकद मिळणार आहे.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे आणि व्हर्टिव्ह इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुभाशिष मजुमदार यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पामुळे केवळ तंत्रज्ञान विकसित होणार नाही, तर भारतीय विद्यार्थ्यांना भविष्यातील ‘थर्मल इंजिनीअरिंग’चे प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहेत. जेव्हा शैक्षणिक संशोधन आणि जागतिक दर्जाचा औद्योगिक अनुभव एकत्र येतो, तेव्हा भारताची डिजिटल प्रगती रोखणे अशक्य आहे, असा विश्वास दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे.

Continue reading

मुख्यमंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडणारे पत्रकार अभय मोकाशींचे निधन

इंग्रजी पत्रकारितेत आपल्या शोधपत्रकारितेचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे काल, शनिवारी रात्री उशिरा मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगरातील डॉ. अनिता मयेकर यांच्या माऊली इस्पितळात निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षात पदार्पण करण्यास जेमतेम एक तास उरला असताना...

अवघ्या दोन तासांतच गुंतवणूकदारांचे ९ लाख कोटी मातीमोल!

भारतीय अर्थव्यवस्थेसाठी गुरुवारचा दिवस उजाडताच अत्यंत पडझडीचा ठरला आहे. कच्च्या तेलाच्या भडकलेल्या किमती आणि जागतिक अस्थिरतेमुळे भारतीय शेअर बाजारात सकाळी ९ वाजल्यापासूनच 'भूकंप'सदृश स्थिती पाहायला मिळाली. सुरुवातीच्या अवघ्या दोन तासांच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे सुमारे ९ लाख कोटी रुपये मातीमोल झाले....

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ‘वेपिंग’ करताना कॅमेऱ्यात कैद!

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या चालू हंगामात राजस्थान रॉयल्सने मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला असला, तरी सध्या चर्चा मात्र त्यांच्या विजयाची नाही, तर कर्णधार रियान परागच्या एका वादग्रस्त कृत्याची होत आहे. ड्रेसिंग रूममध्ये बसलेला असताना रियान पराग 'वेपिंग' (ई-सिगारेटचा...
Skip to content