Homeबॅक पेजआता डेटा सेंटर्स...

आता डेटा सेंटर्स वाचणार ‘ओव्हरहीटिंग’पासून!

भारताच्या डिजिटल क्रांतीला आता स्वदेशी विज्ञानाची जोड मिळणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या (AI) वाढत्या वापरामुळे डेटा सेंटर्समध्ये निर्माण होणारी प्रचंड उष्णता कमी करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि जागतिक पायाभूत सुविधा कंपनी ‘व्हर्टिव्ह’ यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. २०२५पर्यंत हाय-टेक चिप्सचा वीज वापर १,२०० वॅट्सपर्यंत पोहोचण्याची शक्यता असताना, हे नवे तंत्रज्ञान डेटा सेंटर्सना ‘ओव्हरहीटिंग’पासून वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे यासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर करता येणार आहे. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच डेटा सेंटर चालवण्याचा खर्चही बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

या भागीदारीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आयआयटी मुंबईने विकसित केलेले ‘रोटेटिंग कॉन्टॅक्टिंग डिस्क’ हे पेटंट तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान एअर कंडिशनिंगसाठी लागणारी अवाढव्य वीज वाचवण्यास मदत करते. यामुळे डेटा सेंटरची कार्यक्षमता १५ ते ३० टक्क्यांनी वाढणार आहे. या प्रकल्पाची सुरुवात व्हर्टिव्हने डिझाइन केलेल्या ४० किलोवॅट क्षमतेच्या कूलिंग सिस्टीमपासून होणार आहे. या प्रणालीची पहिली चाचणी आयआयटी मुंबईच्या प्रयोगशाळेत होईल आणि त्यानंतर व्हर्टिव्हच्या पुणे येथील अत्याधुनिक प्रकल्पात तिचे अंतिम परीक्षण केले जाईल. हे तंत्रज्ञान केवळ कागदावर मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योगांत वापरले जाणार असल्याने ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या मोहिमेला मोठी ताकद मिळणार आहे.

आयआयटी मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे आणि व्हर्टिव्ह इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुभाशिष मजुमदार यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या प्रकल्पामुळे केवळ तंत्रज्ञान विकसित होणार नाही, तर भारतीय विद्यार्थ्यांना भविष्यातील ‘थर्मल इंजिनीअरिंग’चे प्रत्यक्ष अनुभव मिळणार आहेत. जेव्हा शैक्षणिक संशोधन आणि जागतिक दर्जाचा औद्योगिक अनुभव एकत्र येतो, तेव्हा भारताची डिजिटल प्रगती रोखणे अशक्य आहे, असा विश्वास दोन्ही संस्थांनी व्यक्त केला आहे.

Continue reading

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...

८ जूनपासून पाऊस कोकणातच!

देशातील मान्सूनची सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असल्याचे, खासगी हवामान एजन्सी स्कायमेटचे संचालक जी. पी. शर्मा यांनी म्हटले आहे. मुळातच यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाले असून, सुरुवातीचे काही दिवस प्रगती केल्यानंतर गेल्या एका आठवड्यापासून तो पूर्णपणे थबकला आहे. ८...

आता फक्त २०० रुपयात करा कुटुंबातच होणाऱ्या वाटणीची मोजणी!

राज्यशासनाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत जमीन मोजणीच्या शुल्क आणि प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलेल्या नव्या निर्णयानुसार, आता कुटुंबातच होणाऱ्या संमतीच्या किंवा कोर्टाच्या वाटणीची मोजणी अवघ्या २०० रुपये प्रति पोटहिस्सा या नाममात्र शुल्कात केली...
Skip to content