Thursday, October 24, 2024
Homeटॉप स्टोरीआता भारतातून रशियाला...

आता भारतातून रशियाला समुद्रमार्गे जाणार केळी!

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) भारतातून रशियाला समुद्रमार्गे केळी निर्यात करण्याची सुविधा प्रदान केली आहे. मेसर्स गुरुकृपा कॉर्पोरेशन प्रा. लि. ही मुंबईमधील फळे आणि भाजीपाल्याची निर्यातदार कंपनी युरोपियन युनियन आणि मध्य पूर्वेकडील देशांना नियमितपणे ताजी फळे आणि भाज्यांची निर्यात करत आहे.

उप उष्ण कटिबंधीय फलोत्पादन केंद्रीय संस्थेच्या सहकार्याने राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमात, 17 फेब्रुवारीला महाराष्ट्रातून 20 मेट्रिक टन (1540 बॉक्स) केळीची खेप अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. अपेडाने वाहतूकीदरम्यान फळांची गुणवत्ता राखण्यासाठी उप उष्ण कटिबंधीय फलोत्पादन केंद्रीय संस्थेद्वारे या निर्यातीच्या खेपीसाठी नियुक्त केलेल्या समुद्री मार्गदर्शक तत्त्वांचा विकास अधोरेखित केला.

अपेडा अधिकाधिक निर्यातदारांनी नवीन उत्पादने नवीन ठिकाणी पाठवण्यासाठी नवीन पद्धती वापरण्याच्या प्रयत्नांना सुलभ बनवून तसेच संपूर्ण पाठिंबा देऊन प्रोत्साहित करत असल्याचे अपेडाच्या अध्यक्षांनी यावेळी सांगितले. महिला नवउद्योजकांना पाठिंबा देण्यावर विशेष भर देत असलेल्या अपेडाच्या आर्थिक सहाय्य योजनेवर त्यांनी प्रकाश टाकला. सागरी मार्गदर्शक तत्त्वांच्या विकासात उप उष्ण कटिबंधीय फलोत्पादन केंद्रीय संस्था करत असलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले आणि यशस्वी निर्यातीसाठी सर्वांचे अभिनंदन केले.

अलीकडेच, रशियाने भारताकडून उष्णकटिबंधीय फळांच्या खरेदीमध्ये उत्सुकता दर्शविली असून केळी हे त्यातीलच एक फळ आहे. केळी ही रशियाची एक प्रमुख कृषी आयात असून सध्या रशियात प्रामुख्याने लॅटिन अमेरिकेतील इक्वाडोर येथून केळी आयात केली जात होती. भारतीय केळीच्या प्रमुख निर्यात स्थळांमध्ये इराण, इराक, संयुक्त अरब अमिरात, ओमान, उझबेकिस्तान, सौदी अरेबिया, नेपाळ, कतार, कुवेत, बहारीन, अफगाणिस्तान आणि मालदीव या देशांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, अमेरिका, रशिया, जपान, जर्मनी, चीन, नेदरलँड्स, ब्रिटन आणि फ्रान्स हे देशदेखील भारताला निर्यातीच्या मुबलक संधी उपलब्ध करून देतात.

मेसर्स गुरुकृपा कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली माल पाठवण्यात आला. हा  महिला उद्योग अपेडामध्ये नोंदणीकृत आहे. केळी हे भारतातील एक प्रमुख बागायती उत्पादन असून आंध्र प्रदेश हे देशातील सर्वात मोठे केळी उत्पादक राज्य आहे. केळी उत्पादनात त्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश यांचा क्रमांक लागतो. 2022-23 या आर्थिक वर्षात भारताच्या केळी उत्पादनात या पाच राज्यांचा एकत्रितपणे 67 टक्के वाटा आहे.

केळीचा सर्वात मोठा जागतिक उत्पादक असूनही, भारताच्या निर्यातीमध्ये ते प्रतिबिंबित याचे होत नाही. जरी जगातील केळी उत्पादनापैकी 26.45 टक्के (35.36 दशलक्ष मेट्रिक टन) भारतात होते, तरीही जागतिक बाजारपेठेत भारताच्या निर्यातीचा वाटा केवळ 1% आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात भारताने 176 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किमतीची केळी निर्यात केली, जे 0.36 एमएमटी समतुल्य आहे. पुढील पाच वर्षांत भारतातून केळी निर्यातीचे 1 अब्ज डॉलर्सचे लक्ष्य गाठणे अपेक्षित आहे.  या यशामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि 25,000 हून अधिक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल तसेच पुरवठा साखळीशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जोडलेल्या 50,000 हून अधिक समुहांसाठी रोजगार निर्माण होईल असा अंदाज आहे.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content