Homeटॉप स्टोरीमुंबईतून एकही हिऱ्याचा...

मुंबईतून एकही हिऱ्याचा उद्योग गुजरातला गेलेला नाही!

देशातला सर्वात मोठा जेम्स अँण्ड ज्वेलरी पार्क मुंबईत उभा राहतोय, असे सांगून सूरतच्या डायमंड मार्केटमुळे मुंबईतला एकही हिरेविषयक उद्योग गुजरातला गेलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी बुधवारी नागपूरमध्ये विधानसभेत स्पष्ट केले.

सूरतमध्ये हिरे उत्पादन २०१३पासून आहे आणि त्यात आता एक नवी इमारत उभारली आहे. महाराष्ट्रातील एकही हिरेविषयक उद्योग तेथे गेलेला नाही. मुंबईतून हिरे निर्यातीचे काम मोठे आहे. त्यामुळे मुंबईचे उद्योग बाहेर जात आहेत, यात काहीही तथ्य नाही. मलबार गोल्डज ही सर्वात मोठी कंपनी आपल्याकडे १७०० कोटी गुंतवणूक करत आलेली आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबईशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, अशी ग्वाही देत फडणवीस म्हणाले की, मुंबईचा हिरे व्यापारातला वाटा ७५ टक्क्यांचा आहे आणि गुजरातचा त्यामानाने खूप कमी आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

मुंबई

सरकारच्या उत्तरानंतर विरोधकांचा सभात्याग

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विदर्भाच्या प्रश्नांवर सरकारने उत्तर न देता उलटा चोर कोतवाल को डाटे, असे वर्तन केले आहे, असा आरोप करत विधानसभेतून बहिर्गमन केले. त्यांच्यासह विरोधी पक्षांमधील सर्व सदस्य सभागृहातून कामकाजावर बहिष्कार टाकून बाहेर गेले. विरोधकांचे हे नक्राश्रू असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी यानंतर केली.  

त्याआधी उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना अंतिम आठवडा प्रस्तावात विदर्भाबद्दल एक ओळ टाकली म्हणजे विदर्भाचे प्रश्न होत नाहीत, असे सांगितले होते तसेच, विरोधकांना संधी असूनही त्यांनी विदर्भाचे प्रश्न मांडले नाहीत, याकडेही लक्ष वेधले.

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content