Homeन्यूज ॲट अ ग्लांसवायनाड परिसरातल्या भूकंपाच्या...

वायनाड परिसरातल्या भूकंपाच्या बातम्या भीतीपोटी..

केरळमध्ये वायनाड आणि त्याच्या जवळच्या भागात कालच्या 9 ऑगस्टला नैसर्गिक भूकंपाची कोणतीही नोंद नसल्याचं राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राने स्पष्ट केल्यामुळे वायनाड आणि आसपासच्या भागात भूकंपाचे धक्के जाणवल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे आणि भीतीपोटी निर्माण झाल्याचे पुढे आले आहे. केरळ राज्यात स्थापन केलेल्या भूकंप शास्त्र स्थानकांनी अशा प्रकारची कोणतीही नोंद केली नसल्याचं या केंद्राने म्हटलं आहे.

घर्षण उर्जेमुळे भूगर्भात ध्वनी कंपने निर्माण होऊन परिणामी झालेल्या भूस्खलनामुळे अस्थिर झालेले  डोंगरांवरील दगड स्थिरता मिळवण्याच्या प्रयत्नात एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर कोसळल्यामुळे ही कंपने जाणवली असावीत. ही ऊर्जा कित्येक पट वाढून भूस्तराखाली असलेल्या भेगांमधून तसंच भूपृष्ठावर असलेल्या दुभंगांशी संबंधित विभाजनातून शेकडो किलोमीटरपर्यंत जाणवू शकते. भूस्खलनप्रवण प्रदेशात ही ऊर्जा गडगडाटी आवाजासह भूप्रदेशात कंपनं निर्माण करून नैसर्गिक घटनेसमान भासू शकते, असे या क्षेत्रातल्या जाणकारांचे म्हणणे आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारितल्या राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्राशी संबंधित राष्ट्रीय भूकंप शास्त्र नेटवर्क या संस्थेने शुक्रवारी कोणत्याही प्रकारच्या भूकंपाची नोंद केली नसल्यामुळे भूपृष्ठाखाली कंपने जाणवणे आणि जमिनीतून येणारे गडगडाटी आवाज यापासून कोणत्याही प्रकारची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे आवाहन सरकारने केले आहे. 

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content