Homeमुंबई स्पेशलविलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील...

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. सदर प्रकल्पाबाबत अधिक माहिती करून घ्यायची असल्यास, मुंबई विमानतळ T1 मेट्रो स्थानकासमोरील या प्रकल्पास येत्या रविवारी, 19 एप्रिल रोजी सायंकाळी 5.30 वाजता जरूर यावे, असे आवाहन आमदार पराग अळवणी व नगरसेवक मिलिंद शिंदे यांनी केले आहे.

एरवी उड्डाणपुला खालील जागांवर अतिक्रमण होत असते किंवा जुन्या गाड्यांचे डम्पिंग होत असते. त्यामुळे विलेपार्ले पूर्व येथील विमानतळाबाहेरील पश्चिम द्रूतगती मार्गावरील उड्डाणपुलाखालील जागेचा सदुपयोग व्हावा या हेतूने विलेपार्ले कल्चरल सेंटरतर्फे शहरी शेती प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या के-दक्षिण विभागाकडून मान्य करवून घेतला, अशी माहिती पराग अळवणी यांनी दिली. या प्रकल्पात प्रत्यक्ष शास्त्रीय पद्धतीने वाफे तयार करण्यात आले असून त्यावर विविध फळभाज्या लावण्यात येणार आहेत. तसेच मराठी विज्ञान परिषदेच्या प्रेरणेने शहरी शेती अभ्यासवर्ग चालवण्यात येणार असून यामध्ये अनुभवी व प्रशिक्षित मान्यवर प्रत्यक्ष शेतकामाविषयी मार्गदर्शन करणार आहेत. त्याचसोबत, वनस्पती वैविध्य दालन (plant diversity gallery) आणि वनस्पती सांभाळ केंद्र (plant care center)सुद्धा चालवण्यात येणार आहे. फुलपाखरू उद्यान, पक्षांना आकर्षित कसे करावे, माळीकाम कसे करावे इत्यादी विषयात कार्यशाळा घेण्यात येणार आहेत, असे विलेपार्ले कल्चरल सेंटरचे समन्वयक राहुल शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content