Homeन्यूज ॲट अ ग्लांसमान्सून जायचे नाव...

मान्सून जायचे नाव घेईना!, महाराष्ट्राला तडाखा!! राजस्थानातही परतीनंतर दणका!!!

यंदा मान्सून काही केल्या देशातून जायचे नाव घेताना दिसत नाही. भारतीय हवामान खात्याने (IMD) राजस्थानातून मान्सून संपूर्ण माघारी गेल्याची घोषणा केली होती. मात्र, आता परतीनंतर राजस्थानात मान्सून पुन्हा दणका देणार आहे. दरम्यान, आज महाराष्ट्रासह केरळ, ओदिशा आणि ईशान्य भारतालाही मुसळधार पावसाचा तडाखा बसण्याचा “आयएमडी”चा अंदाज आहे. 2 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचे वारे सुरू राहतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागराच्या वायव्येकडील कमी दाबाचा पट्टा आज पहाटे दक्षिण ओदिशाचा किनारा ओलांडून दक्षिण किनारपट्टीवर केंद्रित झाला आहे. ही प्रणाली ताशी 12 किमी वेगाने पश्चिमेकडे सरकत आहे, ज्यामुळे दक्षिण ओदिशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल. पुढील 24 तासांत छत्तीसगडकडे जाताना ते कमकुवत होत जाईल. या काळात देशभरातील अनेक राज्यात दुर्गापूजा, नवरात्र, गरबा-दांडिया उत्सवादरम्यान हलका-मध्यम तर काही भागात मुसळधार-अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तविली आहे. दुसरीकडे, उत्तरेतील अनेक राज्यात पावसाचा जोर ओसरल्यानंतर उकाडा वाढत असून अनेक शहरात तापमान 30 अंशापार पोहोचले आहे.

मुंबई-ठाणे, कोकणासाठी इशारा

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ठाणे, मुंबईसाठी 27 ते 29 सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसांचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. रायगडसाठी 28 सप्टेंबरला रेड अलर्ट असून 27 आणि 29 सप्टेंबरला ऑरेंज अलर्ट आहे. ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे, तर रेड अलर्टमध्ये बहुतांश ठिकाणी अतिमुसळधार आणि काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आंध्र-तेलंगणात धुंवाधार

या मान्सून हंगामात सर्वाधिक पाऊस असलेली आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील टॉप 5 शहरे-

आंध्र प्रदेश- नंदीगामा- 822 मिमी, अमरावती- 779 मिमी, विशाखापट्टणम- 747 मिमी, कलिंगपट्टणम- 740 मिमी, बापटला- 720 मिमी.

तेलंगणा- मेदक- 1,604 मिमी, आदिलाबाद- 1,436 मिमी, हकिमपेट- 973 मिमी, खम्मम-940 मिमी, बदराचलम- 915 मिमी.

कोयनेतून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणात सध्या 104.12 TMC पाणीसाठा झाला आहे. धरण 100% भरल्याने सध्या 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवण्यात येणार असून कोयना आणि कृष्णाकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. उजनी धरण स्थानिक पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने व पाण्याची आवक वाढल्याने उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदीपात्रात पूरनियंत्रणासाठी सुरू असलेला विसर्ग वाढवून आज सकाळी दहा वाजल्यापासून 90,000 क्यूसेक्सएव्हढा करण्यात आलेला आहे. या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होण्याची शक्यता आहे.

Continue reading

जनतेला तुच्छ लेखणाऱ्या एका हुकूमशहाचा भयानक अंत!

इतिहासाच्या पानांवर २७ एप्रिल १९४५ हा दिवस एका मोठ्या युगाच्या अंताची नांदी देणारा ठरला. हा तो दिवस होता जेव्हा 'फॅसिझम'चा जनक आणि इटलीचा सर्वेसर्वा बेनिटो मुसोलिनी याला इटालियन क्रांतिकारकांनी (पार्टिझन्स) स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली. हा प्रसंग...

मलेरियावर नवजात बालकांसाठी जगातले पहिले औषध दृष्टीक्षेपात

जागतिक आरोग्य संघटना (हू-डब्ल्यूएचओ) ने 'कोआर्टेम बेबी' या औषधाला 'प्री-क्वालिफिकेशन' बहाल केले आहे. २ ते ५ किलोग्रॅम वजनाच्या नवजात बालकांसाठी विकसित केलेले हे जगातील पहिले आणि एकमेव मलेरिया प्रतिबंधक औषध ठरले आहे. या निर्णयामुळे आता जगभरातील सरकारी यंत्रणांना या...

जागतिक गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजाराकडे फिरवणार पाठ?

जागतिक ब्रोकरेज फर्म एचएसबीसीने भारतीय इक्विटी मार्केटला 'न्यूट्रल'वरून 'अंडरवेट' श्रेणीत ढकलले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, जागतिक गुंतवणूकदारांनी आता भारतीय शेअर बाजारात आपली गुंतवणूक कमी करावी, असा सल्ला या संस्थेने दिला आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतील अनपेक्षित वाढ हे यामागचे...
Skip to content