Homeपब्लिक फिगरलोकसभा अध्यक्ष ओम...

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला लंडनमध्ये!

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला बिर्ला यांनी काल लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भारत संविधान स्वीकारल्याची 75 वर्षे साजरी करत आहे. भारतीय राज्यघटनेने देशात परिवर्तनात्मक सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे होईपर्यंत म्हणजे 2047पर्यंत भारत एक विकसित देश बनलेला असेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आजवर मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे निवडणुका घेण्याची भारतीय निवडणूक आयोगाची उत्कृष्ट परंपरा राहिली असून भारत ही जवळपास एक अब्ज मतदार असलेली चैतन्यपूर्ण लोकशाही आहे. भारतातील निवडणूक प्रक्रियेत महिलांचा उत्साहवर्धक सहभाग असतो. अशा  सहभागातून आपल्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वसमावेशकता दिसून येते. भारतातील लोकशाही तळागाळापासून संसदेपर्यंत खोलवर रुजलेली आहे. देश धोरणात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था, राजकारण आणि समाजातील लिंगाधारित तफावत भरून काढत आहे, असे ते म्हणाले. संसदीय लोकशाही म्हणून भारताची कामगिरी अधोरेखित करताना बिर्ला यांनी आवर्जून नमूद केले की विविधता असूनही, संसदीय संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात भारत यशस्वी झाला आहे.

भारत आणि ब्रिटनमधील संसदीय सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन करत बिर्ला यांनी दोन्ही देशांदरम्यान संसदीय ज्ञान, सर्वोत्तम पद्धती आणि अनुभवांची अधिकाधिक देवाणघेवाण करण्यावर भर दिला. दोन्ही देशांच्या युवा आणि महिला संसद सदस्यांनी वारंवार संवाद साधायला हवा, असे ते म्हणाले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंध दृढ झाले आहेत. याचा दोन्ही देशांतील लोकांना फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि ब्रिटनमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचा संदर्भ देत बिर्ला यांनी नमूद केले की दोन्ही देश अन्न आणि आरोग्य सुरक्षेच्या मानवतावादी समस्या सोडवण्यासाठी आणि हवामान बदलासारख्या वाढत्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content