Homeपब्लिक फिगरलोकसभा अध्यक्ष ओम...

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला लंडनमध्ये!

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला बिर्ला यांनी काल लंडनमध्ये ब्रिटनच्या संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. भारत संविधान स्वीकारल्याची 75 वर्षे साजरी करत आहे. भारतीय राज्यघटनेने देशात परिवर्तनात्मक सामाजिक-आर्थिक बदल घडवून आणले आहेत. भारताच्या स्वातंत्र्याचे शताब्दी वर्ष साजरे होईपर्यंत म्हणजे 2047पर्यंत भारत एक विकसित देश बनलेला असेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आजवर मुक्त, निष्पक्ष, पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे निवडणुका घेण्याची भारतीय निवडणूक आयोगाची उत्कृष्ट परंपरा राहिली असून भारत ही जवळपास एक अब्ज मतदार असलेली चैतन्यपूर्ण लोकशाही आहे. भारतातील निवडणूक प्रक्रियेत महिलांचा उत्साहवर्धक सहभाग असतो. अशा  सहभागातून आपल्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वसमावेशकता दिसून येते. भारतातील लोकशाही तळागाळापासून संसदेपर्यंत खोलवर रुजलेली आहे. देश धोरणात्मक हस्तक्षेपांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था, राजकारण आणि समाजातील लिंगाधारित तफावत भरून काढत आहे, असे ते म्हणाले. संसदीय लोकशाही म्हणून भारताची कामगिरी अधोरेखित करताना बिर्ला यांनी आवर्जून नमूद केले की विविधता असूनही, संसदीय संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून समाजाच्या विविध घटकांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यात भारत यशस्वी झाला आहे.

भारत आणि ब्रिटनमधील संसदीय सहकार्य मजबूत करण्याचे आवाहन करत बिर्ला यांनी दोन्ही देशांदरम्यान संसदीय ज्ञान, सर्वोत्तम पद्धती आणि अनुभवांची अधिकाधिक देवाणघेवाण करण्यावर भर दिला. दोन्ही देशांच्या युवा आणि महिला संसद सदस्यांनी वारंवार संवाद साधायला हवा, असे ते म्हणाले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष आणि अंतराळ या क्षेत्रांमध्ये भारत आणि ब्रिटनमधील द्विपक्षीय संबंध दृढ झाले आहेत. याचा दोन्ही देशांतील लोकांना फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. भारत आणि ब्रिटनमधील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचा संदर्भ देत बिर्ला यांनी नमूद केले की दोन्ही देश अन्न आणि आरोग्य सुरक्षेच्या मानवतावादी समस्या सोडवण्यासाठी आणि हवामान बदलासारख्या वाढत्या आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी एकत्र काम करत आहेत.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content