Homeब्लॅक अँड व्हाईटभारतीय नौदलाच्या 'त्रिपुट'चे...

भारतीय नौदलाच्या ‘त्रिपुट’चे जलावतरण

भारतीय नौदलासाठी गोवा शिपयार्ड लिमिटेड (जीएसएल) तयार करत असलेल्या दोन प्रगत युद्धनौकांपैकी त्रिपुट, या पहिल्या युद्धनौकेचे गोव्यात नुकतेच जलावतरण करण्यात आले. सागरी परंपरेनुसार, अथर्ववेदाच्या मंत्रोच्चारात गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या उपस्थितीत रीता श्रीधरन यांच्या हस्ते जहाजाचे जलावतरण झाले. भारतीय नौदलाच्या अदम्य भावनेचे तसेच दूरवर आणि खोलवर मारा करण्याच्या क्षमतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शक्तिशाली बाणावरून या जहाजाचे नाव त्रिपुट ठेवण्यात आले आहे.

25 जानेवारी 19 रोजी संरक्षण मंत्रालय आणि गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्यात त्रिपुट श्रेणीतील  दोन प्रगत युद्धनौका तयार करण्याच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. शत्रूच्या क्षेत्रातील  जहाजे, पाणबुड्या आणि विमानांविरुद्ध लढाऊ कारवाईच्या दृष्टीने या जहाजांची रचना करण्यात आली आहे.

त्रिपुट श्रेणीची जहाजे 124.8 मीटर लांब आणि 15.2 मीटर रुंद आहेत. त्याची पाण्याखालील खोली 4.5 मीटर आहे. त्याचे वजन  अंदाजे  3600 टन आहे आणि गती कमाल 28 सागरी मैल आहे. ही जहाजे स्टेल्थ वैशिष्ट्ये, प्रगत शस्त्रे आणि सेन्सर्स आणि प्लॅटफॉर्म व्यवस्थापन प्रणालींनी सुसज्ज आहेत.

जीएसएलमध्ये जहाजबांधणी झालेल्या त्रिपुट श्रेणीतील जहाजे रशियाकडून विकत घेतलेल्या तेग आणि तलवार श्रेणीच्या जहाजांप्रमाणे आहेत. भारतीय शिपयार्डद्वारे प्रथमच स्वदेशात या युद्धनौका बनवल्या जात आहेत. ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाअंतर्गत, शस्त्रास्त्रे आणि सेन्सर्ससह बहुतांश उपकरणे आणि सुटे भाग स्वदेशी आहेत. यामुळे भारतीय उत्पादन कंपनीद्वारे मोठ्या प्रमाणावर संरक्षण उत्पादन, देशात रोजगारनिर्मिती आणि क्षमतावाढ सुनिश्चित होईल.

Continue reading

विलेपार्ल्यात साकारतोय मुंबईतील पहिला शहरी शेतीप्रकल्प

मुंबईतल्या विलेपार्ले विधानसभा क्षेत्राचे भाजपा आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून मुंबईतील पहिल्या शहरी शेती प्रकल्पाचे उद्घाटन महापौर रितू तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून उपमहापौर संजय घडी आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे तसेच महापालिकेतील विविध समिती अध्यक्ष व अधिकारी यावेळी...

नारीवंदन राहिले! सीमांकन जिंकले!! मोदी आणि गांधी आता मैदानात आमनेसामने!!!

महिलांना लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ३३ टक्के आरक्षण देणारे त्याचप्रमाणे यादृष्टीने मतदारसंघाची पुनरर्चना (सीमांकन) करणारी घटनादुरूस्ती विरोधकांच्या प्रबळ एकजुटीमुळे आज संध्याकाळी फेटाळली गेली. याकरीता झालेल्या मतदानात घटनादुरूस्तीसाठी लागणारे दोनतृतियांश बहुमत मिळवण्यात सरकार अपयशी ठरले. लोकसभेत उपस्थित असलेल्या एकूण ५२८...

युद्धविरामापर्यंत होर्मूझ पूर्णपणे खुले, इराणकडून घोषणा!

जगाच्या तेलवाहतूक तसेच इतर व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावणारी होर्मूझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करण्याची घोषणा इराण सरकारने केली आहे. इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री अब्बास अरागची यांनी नुकतीच ही घोषणा केली. लेबनान आणि इस्त्रायलमध्ये झालेल्या युद्धविरामानंतर इराण सरकारने हा निर्णय घेतल्याचे...
Skip to content