Homeटॉप स्टोरीढिसाळ नियोजनामुळे मुंबईतले...

ढिसाळ नियोजनामुळे मुंबईतले लसीकरण ३ दिवस बंद?

राज्याकडे लसीचा सुमारे साडेसात लाख मात्रांचा साठा उपलब्ध असताना व येत्या ३ दिवसांत आणखी २० लाख मात्रा मिळणार असतानाही मुंबई महापालिकेने कोविड–१९ प्रतिबंधक लसींचा साठा संपुष्टात आल्याचे कारण देत उद्यापासून म्हणजेच शुक्रवार, दिनांक ३० एप्रिल २०२१पासून रविवार, दिनांक २ मे २०२१पर्यंत, असे तीन दिवस मुंबईतील लसीकरण पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केल्याने सरकारचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असल्याचे बोलले जाते.

कधी नाशिक तर कधी पुणे, कधी मुंबई तर कधी अहमदनगर असे रोज कुठे ना कुठे कोविडचे लसीकरण बंदच असते. केंद्र सरकारने ४५ वर्षांवरील व्यक्तींसाठी लागणाऱ्या लसींचा साठा पुरवण्याची जबाबदारी घेतली आहे. केंद्रीय आरोग्य खात्याच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्राला काल २८ एप्रिलला सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १,६३,६२,४७० लसींच्या मात्रा प्राप्त झाल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या (०.२२%) मात्रांसह एकूण १,५६,१२,५१० मात्रांचा वापर करण्यात आला. राज्याकडे, उर्वरित ७,४९,९६० लसींच्या मात्रा, पात्र वयोगटातल्या लोकांना देण्यासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय येत्या तीन दिवसात कोविड प्रतिबंधक लसीच्या २०,४८,८९० मात्रा पोहोचण्याच्या मार्गावर आहेत. याचाच अर्थ येत्या तीन दिवसांत राज्यात लसींच्या साधारण २० लाख मात्रा उपलब्ध होणार असताना मुंबई महापालिकेला त्यातली एकही मात्रा मिळू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नोंदणी केलेल्यांनाच यापुढे मिळणार लस

याचबरोबर यापुढे मुंबईतल्या लसीकरण केंद्रांवरील लाभार्थ्यांच्या प्रचंड रांगा लागू नये म्हणून यापुढे फक्त नोंदणीकृत पात्र व्यक्तिंनाच लस दिली जाणार आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना पुढील आवाहनही करण्यात आले आहे.

१. कोविड प्रतिबंध लस देताना दुसरी मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य असेल.

२. लसीकरणासाठी सर्व पात्र नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केलेली असेल तरच लस देण्यात येईल.

३. ज्येष्ठ नागरिकांनी व गरजूंनी लसीकरणाची नोंदणी करण्यासाठी वेगवेगळ्या अशासकीय संस्था, व्यक्ती यांची मदत घ्यावी.

४. लसीकरणासाठी ४५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटाच्या नागरिकांनी केंद्रांवर रांगेत उभे राहून गर्दी करू नये. गर्दी केल्याने संसर्ग फैलावण्याचा धोका वाढतो, ही बाब सर्वांनी लक्षात ठेवून लसीकरण केंद्रांवर येताना आणि वावरताना एकावर एक असे दोन मास्क परिधान करावेत.

५. कोविड प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा (डोस) घेतलेल्या नागरिकांनीदेखील चिंताग्रस्त होऊ नये. प्रथम मात्रा घेतल्यानंतर शरीरात पुरेशी प्रतिपिंडे (ऍण्टीबॉडीज) निर्माण होतात. त्यामुळे काही कारणाने दुसरी मात्रा घेण्यास थोडासा विलंब झाला तरी काळजी करू नये.

Continue reading

मुंबईच्या शहरी भागात आज पाणीपुरवठा विस्कळीत

मुंबई महापालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर १५०० मिलीमीटर व्यासाचे दोन बटरफ्लाय व्हॉल्व बसविण्याचे काम हाती घेतले जात आहे. हे काम भंडारवाडा टेकडी जलाशय, फॉसबेरी टेकडी जलाशय आणि गोलंजी टेकडी जलाशय यांचा पाणीपुरवठा सुव्यवस्थित करण्यासाठी केले जाणार...

इराणकडून बाब-अल-मंदबची केली जाणार कोंडी?

अमेरिकेबरोबर कोणत्याही स्वरूपाची चर्चा करण्याची पाकिस्तानमार्फत करण्यात आलेली विनंती धुडकावून लावल्यानंतरही सध्याच्या युद्धविरामाला इराणबरोबरच्या पुढच्या चर्चेपर्यंत अनिश्चित काळासाठी वाढवण्यात येत असल्याची घोषणा आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ तसेच लष्करप्रमुख आसीफ मुनीर यांच्या आवाहनाला...

इराणने धुडकावली अमेरिकेबरोबरची चर्चा!

अमेरिका आणि इराणमध्ये झालेला दोन आठवड्यांचा युद्धविराम उद्या संपत असतानाच अमेरिकेबरोबर पाकिस्तानात होऊ घातलेल्या चर्चेला इराणने नकार दिला आहे. आम्ही सरशीत असताना आमच्या अटीशर्तींवरच अमेरिकेबरोबर चर्चा होईल, असे इराणच्या लष्करी गोटातून स्पष्ट करण्यात आले आहे. इराणच्या होर्मूझ सामुद्रधुनीवरील नियंत्रण...
Skip to content