Homeबॅक पेजठाकरे मुख्यमंत्री असताना...

ठाकरे मुख्यमंत्री असताना ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रखडली?

ठाणे-भिवंडी-कल्याण या मुंबई मेट्रो मार्ग-5 प्रकल्पामध्ये स्थापत्य कामाच्या खर्चात सध्यातरी कोणतीही वाढ झाली नसली तरी 3 वर्षांची प्रकल्प दिरंगाई झालेली आहे. आरटीआयच्या माध्यमातून उघड झालेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला गेला आहे. मेट्रोचे काम ज्या कालखंडात होणे अपेक्षित होते त्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, ज्याचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत होते.

मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती अधिकारातून विविध माहिती विचारली गेली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने त्यावर सविस्तर माहिती अर्जदारास दिली. मुंबई मेट्रो मार्ग-5 ठाणे-भिवंडी-कल्याणचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला 1 सप्टेंबर 2019 रोजी देण्यात आले. हा 15 स्थानके असलेला 24.90 किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. हे काम 1 मार्च 2022 रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन डेडलाईन ही 31 मार्च 2025 अशी आहे.

ठाणे

वेळेत काम पूर्ण न करण्यासाठी ठेकेदारावर दंडात्मक कारवाईची मागणी आरटीआय कार्यकर्त्यांनी केली होती. मुंबई मेट्रो मार्ग-5 ठाणे-भिवंडी-कल्याण या प्रकल्पाचा स्थापत्य कामाचा अपेक्षित खर्च हा 898.19 कोटी इतका आहे. सध्यातरी वाढीव खर्च झालेला नाही. 3 वर्षांची दिरंगाई लक्षात घेता दंडात्मक कारवाई करताना केवळ 20.88 लाख इतका दंड आकारण्यात आला आहे.

मेट्रो 5 महत्त्वाचा मार्ग असून सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग-4 (वडाळा ते कासारवडवली) आणि प्रस्तावित मेट्रो मार्ग-12 (कल्याण ते तळोजा) आणि मध्य रेल्वे यांच्यात परस्पर एकीकरण साधण्यात येईल. व्यावसायिक व शासकीय कर्मचारी तसेच ठाणे, भिवंडी व कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी हा मेट्रो मार्ग उत्तम सुविधा प्रदान करेल. हा मेट्रो मार्ग सध्याच्या प्रवासाची वेळ 50 ते 75%पर्यंत कमी करणार आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडून ही माहिती प्राप्त केली आहे.

Continue reading

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...

भारतातल्या लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत!

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी भक्कमपणे उभारले. पण आज विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून भारतातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना  लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत असल्याचे दृष्टीस पडत आहे.  देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे...

विनय आपटे प्रतिष्ठानच्या स्पर्धेत ‘मुक्ता’ सर्वप्रथम!

विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्स्च्या मुक्ता, ह्या लघुपटला प्रथम परितोषिक मिळाले. 15 हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांवरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला, ह्या लघुपटाला तर तिसरा क्रमांक ब्लॅक...
Skip to content