Homeटॉप स्टोरीप्रधानमंत्री मत्स्य संपदा...

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून आतापर्यंत 45 लाखांना रोजगाराच्या संधी?

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे, राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय)चा उद्देश, वर्ष 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या अंमलबजावणी कालावधीत, सुमारे 55 लाख मच्छीमार, मत्स्योत्पादक, कामगार, मासे विक्रेते आणि मासेमारी व संलग्न क्रियाकलापातील इतर ग्रामीण/शहरी लोकसंख्येसाठी थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11.46 लाख थेट आणि 34.13 लाख अप्रत्यक्ष अशा जवळपास 45.59 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मत्स्य

मत्स्य उत्पादन, उत्पादकता, गुणवत्ताविषयक माहिती, मूल्यवर्धन, रोग व्यवस्थापन, प्रजाती वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान, मासे आणि इतर मत्स्य उत्पादने टिकवण्यासाठीचे प्रयत्न, कार्यक्षम मत्स्य  वाहतूक आणि विपणन सुविधा, अधिक चांगले देशांतर्गत आणि परदेशी धोरण याद्वारे मत्स्य उत्पादकांचे उत्पन्न वाढवणे हेदेखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे एकूण 3351 लाभार्थी प्रत्यक्षपणे कार्यरत आहेत आणि सुमारे 1,04,790 अप्रत्यक्षपणे मासेमारी आणि संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

मत्स्य

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

एलिमेंट्स आर्ट क्लासेसचे अप्रतिम प्रदर्शन

एलिमेंट्स आर्ट क्लासेस च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुण्याच्या कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण आर्ट गॅलरी येथे पंचतत्व या तीन दिवसांचे वार्षिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सहा ते १८ वर्षे वयोगटातल्या जवळजवळ ४५ विद्यार्थ्यांच्या सुमारे ९० कलाकृती या प्रदर्शनात...

अकरावी प्रवेशासाठी नंतर सादर करा गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला

राज्यातल्या इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानंतर राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट शिथिल केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर...

सौरभ विजय यांनी दिला डिजिटल नवोपक्रमावर भर

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ विजय यांनी मुंबईतील युआयडीएआय प्रादेशिक कार्यालयाला नुकतीच भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच प्रादेशिक दौरा आहे. युआयडीएआय प्रादेशिक कार्यालय,...
Skip to content