Homeटॉप स्टोरीप्रधानमंत्री मत्स्य संपदा...

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून आतापर्यंत 45 लाखांना रोजगाराच्या संधी?

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाच्या मत्स्यव्यवसाय विभागाद्वारे, राबविण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना (पीएमएमएसवाय)चा उद्देश, वर्ष 2020-21 ते 2024-25 या 5 वर्षांच्या अंमलबजावणी कालावधीत, सुमारे 55 लाख मच्छीमार, मत्स्योत्पादक, कामगार, मासे विक्रेते आणि मासेमारी व संलग्न क्रियाकलापातील इतर ग्रामीण/शहरी लोकसंख्येसाठी थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करणे, हा आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 11.46 लाख थेट आणि 34.13 लाख अप्रत्यक्ष अशा जवळपास 45.59 लाख रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मत्स्य

मत्स्य उत्पादन, उत्पादकता, गुणवत्ताविषयक माहिती, मूल्यवर्धन, रोग व्यवस्थापन, प्रजाती वैविध्यपूर्ण तंत्रज्ञान, मासे आणि इतर मत्स्य उत्पादने टिकवण्यासाठीचे प्रयत्न, कार्यक्षम मत्स्य  वाहतूक आणि विपणन सुविधा, अधिक चांगले देशांतर्गत आणि परदेशी धोरण याद्वारे मत्स्य उत्पादकांचे उत्पन्न वाढवणे हेदेखील या योजनेचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचे एकूण 3351 लाभार्थी प्रत्यक्षपणे कार्यरत आहेत आणि सुमारे 1,04,790 अप्रत्यक्षपणे मासेमारी आणि संबंधित कामांमध्ये कार्यरत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.

मत्स्य

केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला यांनी काल लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Continue reading

तासाभरातच तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री! ९ आमदारही घेणार शपथ!!

तमिळनाडूच्या राजकारणात एक ऐतिहासिक क्रांती घडत आहे. अभिनेता विजय यांच्या नेतृत्त्वाखालील 'तमिझगा वेत्री कळघम' (टीव्हीके) पक्षाने सत्तेसाठी आवश्यक असलेले पाठबळ मिळवले आहे. बहुमताचा ११८ हा जादुई आकडा गाठण्यासाठी आवश्यक असलेले समर्थन मित्रपक्षांकडून मिळाल्याने, आता थोड्याच वेळेत म्हणजे सकाळी १०...

11वी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेच्या नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक घोषित

महाराष्ट्रातल्या इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेअंतर्गत शैक्षणिक वर्ष 2026-27साठी नियमित कॅप फेरी-1चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने हे जाहीर केले आहे. आज, 8 मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेशअर्जाचा भाग-1 आणि...

मतदारांना भुरळ घालण्यासाठी बाळगली 1,400 कोटींची अवैध सामग्री

भारतात 2024 साली लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांपासून, नुकत्याच झालेल्या आसाम, केरळम्, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या राज्यांच्या विधानसभा निवडणुका तसेच 5 राज्यांमधल्या 7 विधानसभेच्या पोटनिवडणुकांदरम्यान मतदारांना भुरळ घालण्यासाठी तब्बल 1,400 कोटी रुपयांहून अधिक किमतीची बेकायदेशीर सामग्री बाळगली होती....
Skip to content