Homeपब्लिक फिगरलसीकरणातला गोंधळ आदित्य...

लसीकरणातला गोंधळ आदित्य ठाकरेंच्या आशिर्वादाने?

मुंबई महापालिकेकडून चालू असलेल्या लसीकरणात प्रचंड गोंधळ चालू असून राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या आशीर्वादाने हे गैरप्रकार चालू आहेत, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे आमदार अतुल भातखळकर यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला.

१८ ते ४५ वयोगटातील लसीकरण बंद झाले असताना कोरोना योद्धे म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रातील बड्या मंडळींचे, अभिनेत्यांचे व अभिनेत्यांशी संबंधित व्यक्तींचे बिनबोभाट लसीकरण चालू आहे. लसीकरणातील गैरप्रकार न थांबल्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे तक्रार करू, असा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईकरांना तातडीने भरपाई द्या

नुकत्याच झालेल्या वादळामुळे मुंबईतील नुकसानीचे तातडीने पंचनामे करून महापालिका व राज्य सरकारने संबंधितांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणीही त्यांनी केली.

मुंबईत वादळाने अनेक ठिकाणी झोपड्यांचे पत्रे उडून गेले आहेत. वादळाने, पावसाने नुकसान झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे व नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी. या पावसाने मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी ७ ते ८ तास लागले. यावरून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांकडून होणारे नालेसफाईचे दावे खोटे आहेत हे सिद्ध झाले, असेही ते म्हणाले.

छोट्या, मोठ्या रस्त्यांवर झाडे मोठ्या प्रमाणावर पडली. वर्दळीच्या मोठ्या रस्त्यांवरील झाडे महापालिकेकडून हटविली गेली. मात्र छोट्या रस्त्यांवर पडलेली, सोसायट्यांच्या भिंतींवर पडलेली झाडे अजून हटविली गेली नाहीत. झाडे पडून २ मृत्यू झाले आहेत. याला महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार आहे, असा आरोपही भातखळकर यांनी केला.

महापालिकेच्या झाडे कापणीच्या कंत्राटाची मुदत मार्चमध्येच संपली आहे. हे कंत्राट महापालिकेत ज्यांनी अडवून ठेवले त्यांची चौकशी करा व त्यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणीही त्यांनी केली.  

Continue reading

नवी मुंबईतले ‘एपीएमसी’ पोहोचले राष्ट्रीय स्तरावर!

राज्याच्या कृषी आणि पणन क्षेत्रात एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रशासकीय बदल झाला असून, नवी मुंबईतील वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)ला आता अधिकृतरीत्या 'राष्ट्रीय महत्त्वाचा बाजार' (एमएनआय - मार्केट ऑफ नॅशनल इंपॉर्टन्स) म्हणून घोषित करण्यात आले आहे....

उद्या दाखल होणार केरळमध्ये मान्सून!

भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी)ने मंगळवारी दिलेल्या ताज्या माहितीनुसार, यंदा नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) केरळमध्ये दाखल होण्यास काहीसा विलंब झाला आहे. आता मान्सून गुरुवारी, ४ जूनच्या आसपास केरळ किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यापूर्वी हवामान विभागाने २६ मे रोजी मान्सून दाखल...

‘अंगूरी भाभी’ने लावलेले लैंगिक छळाचे आरोप खोटे!

प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिका 'भाभीजी घर पर हैं'मधील 'अंगूरी भाभी' या लोकप्रिय भूमिकेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने एका जुन्या आणि वादग्रस्त प्रकरणावर नुकताच एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. २०१६मध्ये या मालिकेतून अचानक बाहेर पडल्यानंतर, शिल्पाने मालिकेचे...
Skip to content