Homeचिट चॅटचेंबूर जिमखाना बुद्धिबळः...

चेंबूर जिमखाना बुद्धिबळः अनिरुद्ध पोटावाड यंदाही विजेता

मुंबईतल्या चेंबूर जिमखान्याने क्रिस्टल कम्युनिटी हॉल, जेड १ आणि जेड २ हॉलमध्ये आयोजित केलेल्या दुसऱ्या ऑल इंडिया फिडे रॅपिड रेटिंग खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत यंदादेखील गतविजेत्या अनिरुद्ध पोटावाडने चमकदार कामगिरी करताना विजेतेपद कायम राखले.

अनिरुद्धने या स्पर्धेत ९ पैकी ८.५ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. पारस भोईर आणि अर्णव कोळी यांचा अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक लागला. आयएम समीर खाटमाळे यांनी ९ पैकी ८ गुणांची कमाई केली. आयएम सौम्या स्वामीनाथनने या स्पर्धेत ९ पैकी ७ गुणांची कमाई केली.

स्पर्धेचे संयोजक आणि सीजी बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब यांनी खेळाडूंचा मिळालेला मोठा प्रतिसाद पाहून आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी चेंबूर जिमखान्याला स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व संबंधित बुद्धिबळ संघटनांचे आभार मानले. मध्य उपनगरातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेत संपूर्ण भारतातून ६०९ खेळाडूंचा सहभाग लाभला होता. या स्पर्धेत एकूण २ लाख रुपयांची पारितोषिके होती. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.

Continue reading

१४ व १५ मे रोजी मुंबईत रंगणार अ. भा. महापौर केसरी कुस्ती स्पर्धा

बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई शहर तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ३२वी अखिल भारतीय मुंबई महापौर केसरी कुस्ती स्पर्धा २०२५-२६चे आयोजन करण्यात आले असून, देशभरातील नामांकित मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही प्रतिष्ठेची स्पर्धा १४ व १५ मे २०२६...

देश चालवणे ही मोदींच्या आवाक्याबाहेरची गोष्ट!

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील आवाहनांवर कडाडून टीका केली आहे. 'देश चालवणे मोदींच्या आवाक्यातली गोष्ट नाही' अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. पंतप्रधानांनी नागरिकांना सोने न खरेदी करण्याचे आणि परदेश दौरा टाळण्याचे जे आवाहन केले...

पेट्रोल-डिझेलची दरवाढ अटळ?

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि मध्य-पूर्वेतील तणावामुळे भारतातील सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांच्या तोट्यात मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल यांसारख्या कंपन्यांना सध्या दरमहा सुमारे ३०,००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे....
Skip to content