Homeहेल्थ इज वेल्थमानसिक आजारांबद्दलच्या जागृतीसाठी...

मानसिक आजारांबद्दलच्या जागृतीसाठी डॉ. बत्रांचे ‘फील गुड..’

प्रख्यात होमियोपथीतज्ज्ञ, डॉ. बत्राज हेल्थकेअर, या सर्वात मोठ्या होमियोपथी क्लिनिकच्या शृंखलेचे संस्थापक पद्मश्री डॉ. मुकेश बत्रा यांनी आपल्या ‘फील गुड, हील गुड. स्टेइंग हॅप्पी विथ होमियोपथी’, या त्यांच्या १०व्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन केले. ब्लूम्सबरीने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन

सोहळ्यात मानसिक व भावनिक आरोग्यावर अत्यंत उपयुक्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात मंदिरा बेदी, राजीव बजाज, मधू, झायेद खान आणि डॉ. आशीष कॉन्ट्रॅक्टर सहभागी झाले होते. या चर्चासत्राचे संचालन तारा देशपांडे यांनी केले.

याप्रसंगी डॉ. बत्रा म्हणाले की, भावनिक आणि मानसिक आरोग्याने त्रस्त असलेल्या लोकांवर उपचार करतानाचे गेल्या ५० वर्षांतील अनुभव मी या पुस्तकात मांडले आहेत. या पुस्तकात प्रतिबंध, व्यसन न जडणारे आणि सुरक्षित उपचारपद्धत आणि चिंतातुरता, नैराश्य, एडीएचडी, तणाव, एकटेपणा इत्यादी समस्यांची चर्चा केली आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून या फारशा चर्चा होत नसलेल्या समस्यांना हातळण्यासाठी जागरुकता निर्माण करणे, लोकांमध्ये चर्चा घडवून आणणे आणि उपचार देण्याचा मी प्रयत्न केला आहे.

सहा कोटींहून अधिक भारतीयांना गंभीर स्वरुपाच्या मानसिक आजारांनी ग्रासलेले आहे. दुर्दैवाने भारताला आत्महत्त्येची राजधानी म्हटले जाते. भारतात दर वर्षी २.६ लाखांहून अधिक आत्महत्त्येची प्रकरणे घडतात. ‘फील गुड, हील गुड. स्टेइंग हॅप्पी विथ होमियोपथी’ या पुस्तकाच्या माध्यमातून मानसिक व भावनिक आरोग्याच्या वाढत्या समस्याबद्दल जागरुकता निर्माण करण्यात आली आहे आणि उपायही देण्यात आले आहेत. या पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच ॲमेझॉनवरील आरोग्य, फिटनेस आणि न्यूट्रिशन कॅटेगरीमधील पहिल्या दहा पुस्तकांमध्ये या पुस्तकाची वर्णी लागली आहे.

Continue reading

अखिलेश यादवचे बंधू प्रतिक यांचा संशयास्पद मृत्यू!

समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांचे लहान पुत्र तसेच समाजवादी पार्टीचे सध्याचे प्रमुख अखिलेश यादव यांचे लहान सावत्र बंधू प्रतिक यादव यांचे आज पहाटे वयाच्या ३८व्या वर्षी आकस्मिक निधन झाले. भारतीय जनता पार्टीच्या नेत्या...

जान्हवी मोरे स्मृती कॅरम स्पर्धेत स्वरा कदम, ओमकार वडर विजेते

डोंबिवली (पूर्व) येथील दत्तनगर उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय कॅरमपटू जान्हवी मोरे स्मृतिप्रीत्यर्थ १६ वर्षांखालील मुलां-मुलींच्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत अनुक्रमे कोल्हापूरच्या ओमकार वडर आणि रत्नागिरीच्या स्वरा कदमने विजेतेपदाचा मान मिळवला. शास्त्री हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत ठाणे, मुंबई, मुंबई...

तृणमूलच्या विळख्यातून प. बंगाल बाहेर! आता कसोटी सुवेंधूंची!!

ममता बॅनर्जींचा पाठोपाठ दोन्ही विधानसभा निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव करून देशात जायंट किलर ठरलेले सुवेंधू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून रविवारी शपथ घेतली आणि राज्यात नव्या पर्वाला सुरूवात झाली. ममता बॅनर्जीच्या पंधरा वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत सतत हिंसाचार,...
Skip to content