Homeकल्चर +पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून...

पटकथेसाठीचे वनलाईनर गुंफून लिहिलेले ‘फिल्मी कथा’चे प्रकाशन

सुमारे ३० ते ३५ वनलाईनर एकत्र गुंफून अभिनेते आणि सिद्धहस्त लेखक प्रकाश राणे यांनी लिहिलेला “फिल्मी कथा” हा कथासंग्रह डिंपल प्रकाशनच्या वतीने अंधेरी येथे प्रकाशित करण्यात आला. या पुस्तकाचे प्रकाशन सुसंवादिनी मंगला खाडिलकर, निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी, अभिनेत्री गायिका रसिका धामणकर (अबोली मालिकेमधील रमा) कवयित्री साहित्यिका लता गुठे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमास डिंपल पब्लिकेशनचे अशोक मुळ्ये उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात अशोक मुळ्ये यांनी पुस्तकाविषयी व प्रकाशन संस्थेविषयी रोचक माहिती उपस्थितांना दिली. रसिका धामणकर यांनी आपल्या छोटेखानी भाषणात, प्रकाश गजानन राणे यांच्या लेखनशैलीवर प्रकाश टाकला. कांचन अधिकारी यांनी आपल्या भाषणात, राणे यांच्या स्वभावाचे पैलू उलगडून दाखविले. प्रकाश राणे, भारतीय जनता पार्टी चित्रपट कामगार आघाडीचे मुंबई विभागाचे सहसंयोजक असून, केंद्रीय सेन्सॉर बोर्डाचे सल्लागारदेखील आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मंगला खाडिलकर यांनी आपल्या भाषणात फिल्मी कथा, या पुस्तकावर प्रकाश टाकत, त्यातील काही कथांवर विवेचन केले. राणे यांच्या लेखनशैलीवर विस्तृत टिप्पणीही त्यांनी केले. राणे यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे निवेदन प्रथितयश निर्माती व निवेदिका, अक्षदा भालेकर-विचारे यांनी केले. लीना रेडकर यांनी स्वागतपर भाषण व आभार प्रदर्शन केले.

चित्रपटासाठी ज्या कथा लिहिल्या जातात, त्या संक्षिप्त स्वरूपात असतात आणि त्यांना वन लाईनर असे म्हणतात. ही वनलाईनर चित्रपटासाठी निश्चित झाल्यानंतर, त्या वनलाईनरचा विस्तार होऊन, चित्रपटांची कथा तयार होते. थोडक्यात म्हणजे चित्रपटाचे कथा बीज आणि ठळक मुद्दे या वनलाईनरमध्ये असतात. वनलाईनर वाचून कथेचा सार व सारांश लक्षात येतो. अशा वनलाईनर चित्रपट निर्मात्यांना ऐकवायची प्रथा आहे. कुणी लेखक एका वेळेला दोन ते तीन वन लाईनर निर्मात्याला ऐकवू शकतो. अशा या कथांचे हे पुस्तक आहे. 

Continue reading

रविकिरण बालनाट्य स्पर्धेत ‘अडलंय का?’ अव्वल!

सहा दशकांहून अधिक काळ सामाजिक, शैक्षणिक, कला आणि क्रीडा क्षेत्रात अवीट ठसा उमटवत आलेल्या रविकिरण संस्थेची बहुप्रतीक्षित ३९वी बालनाट्य स्पर्धा यंदा अधिक दिमाखात, अधिक उत्साहात आणि अधिक कलात्मकतेने साजरी झाली. ११ व १२ डिसेंबर रोजी मुंबईतल्या यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा...

भारतातल्या लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत!

आर्किटेक्ट म्हणून माझ्या व्यावसायिक जीवनात असंख्य इमारतींचे स्तंभ मी भक्कमपणे उभारले. पण आज विरोधी पक्षाचा एक नेता म्हणून भारतातील राजकीय परिस्थितीकडे पाहताना  लोकशाहीचे चारही स्तंभ कमकुवत होत असल्याचे दृष्टीस पडत आहे.  देशाच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर बाब असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे...

विनय आपटे प्रतिष्ठानच्या स्पर्धेत ‘मुक्ता’ सर्वप्रथम!

विनय आपटे प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत पायपिट फिल्म्स्च्या मुक्ता, ह्या लघुपटला प्रथम परितोषिक मिळाले. 15 हजार रु. रोख आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. 25 वर्षांवरील खुल्या गटात दुसरा क्रमांक सिंड्रेला, ह्या लघुपटाला तर तिसरा क्रमांक ब्लॅक...
Skip to content