Homeकल्चर +'वंदे मातरम'वर आधारित...

‘वंदे मातरम’वर आधारित चित्रपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन

वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने “व्हीएम फ्रेम्स” या राष्ट्रीय चित्रपट निर्मिती स्पर्धेची घोषणा केली आहे. या स्पर्धेद्वारे नागरिकांना दृश्यात्मक कथाकथनाच्या माध्यमातून राष्ट्रगीताचा भाव सर्जनशीलतेने व्यक्त करावयाचा आहे.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम, या राष्ट्रीय गीताला गेल्या वर्षी 150 वर्षे पूर्ण झाली. हा महत्वाचा टप्पा वर्षभर चालणाऱ्या स्मरणोत्सवाद्वारे साजरा केला जात आहे. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेल्या ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला भारताच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक जाणीवेत एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. मातृभूमीला ‘दैवी स्त्रीशक्ती’ मानत, या गीताने दिलेला संदेश स्वातंत्र्यलढ्यादरम्यान अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आणि आजही तो राष्ट्रभावनेतून उमटत आहे.

व्हीएम फ्रेम्स

‘व्हीएम फ्रेम्स’ चित्रपट निर्माते, कलाकार आणि नागरिकांना ‘वंदे मातरम’च्या तत्त्वज्ञानाचा समकालीन स्वरूपात पुनर्विचार करायचा आहे. ही स्पर्धा तीन श्रेणींमध्ये खुली आहे:

  • रील्स
  • एआय-आधारित चित्रपट
  • लघुपट

सहभागींना देशभक्ती, सांस्कृतिक ओळख, एकता आणि प्रगत ‘नव्या भारता’च्या दृष्टीकोनावर आधारित संकल्पनांवर व्यक्त होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले आहे.

पुरस्कार आणि मान्यता

रील्स

  • प्रथम पारितोषिक: ₹ 1,50,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹ 1,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 50,000

एआय चित्रपट

  • प्रथम पारितोषिक: ₹ 5,00,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹3,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 1,50,000

लघुपट

  • प्रथम पारितोषिक: ₹ 15,00,000
  • द्वितीय पारितोषिक: ₹ 12,00,000
  • तृतीय पारितोषिक: ₹ 10,00,000

सहभागासाठी तपशील

  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख: 7 मे 2026
  • अधिक माहिती: vande mataram150.in 

Continue reading

६ महिन्यांत जाणार नवी मुंबईतली रेल्वेस्थानके रेल्वेच्या ताब्यात!

नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि प्रवाशांच्या गैरसोयीला कारणीभूत ठरणारा स्थानकांच्या देखभालीचा प्रश्न अखेर कायमचा सुटणार आहे. येत्या सहा महिन्यांत नवी मुंबईतील सर्व रेल्वेस्थानके सिडकोकडून मध्य रेल्वेकडे पूर्णपणे हस्तांतरित...

पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास स्थगिती!

कोट्यवधी हिंदूंचे आराध्यदैवत असलेल्या पंढरपूरच्या ‘स्वयंभू’ श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि पुरातत्त्व विभागाकडून २३ आणि २४ जून रोजी प्रस्तावित असलेल्या रासायनिक वज्रलेपनास पंढरपूरच्या दिवाणी न्यायालयाने (कनिष्ठ स्तर) तत्काळ स्थगिती दिली आहे. वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाने...

हा तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवरच आघात!

शिवसेनेतल्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांचे आज उफाळून आलेले कथित बंड हे केवळ खासदारांचे बंड नाही, तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाच्या विश्वासार्हतेवर झालेला दुसरा मोठा आघात आहे. २०२२मध्ये आमदारांनी दिलेला धक्का आणि आता २०२६मध्ये पुन्हा एकदा खासदारांनी फिरवलेली पाठ, या...
Skip to content