Homeन्यूज ॲट अ ग्लांसउत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे...

उत्तर प्रदेशात एन्काऊंटरचे सत्र सुरूच!

उत्तर प्रदेशमध्ये संशयित आरोपीचा एन्काऊंटर (पोलीस चकमक) करण्याचे सत्र अजूनही चालूच आहे. आज बेहराईचमधल्या रामगोपाल मिश्रा यांच्या हत्त्येतल्या दोघा संशयित आरोपींबरोबर पोलिसांची चकमक झाली. त्यात सर्फराज आणि तालीब, हे दोन आरोपी जखमी झाल्याचे समजते. गेल्या ७ वर्षांत उत्तर प्रदेशात १२ हजार ९६४ म्हणजेच जवळजवळ १३ हजार पोलीस चकमकी झाल्या आहेत. त्यात २०७ नामचीन गुंड मारले गेले तर १७ पोलिसांचा बळी गेला आहे.

13 ऑक्टोबरला दुर्गामातेच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत झालेल्या हिंसाचारात रामगोपाल मिश्रा यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्त्या प्रकरणातील सर्वच्या सर्व पाच आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहेत. या प्रकरणातला एक आरोपी काल पोलिसांच्या ताब्यात आला. त्यानंतर आज पोलिसांनी उत्तर प्रदेशातून नेपाळला पळून जात असलेल्या चार आरोपींना पकडले.

या आरोपींना बसहरी नहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या कालव्याजवळ रोखण्यात आले. पोलिसांनी हटकताच आरोपींनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात दोन आरोपी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाच्या डाव्या तर दुसऱ्याच्या उजव्या पायात गोळ्या घुसल्या आहेत. या दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे बहराईचच्या पोलीस अधीक्षक वृंदा शुक्ला यांनी माध्यमांना सांगितले.

दरम्यान, आरोपी सर्फराजची बहीण रूख्सार यांनी ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला ाहे. पोलिसांनी कालच आपल्या भावाला घरातून पकडून नेले होते. त्यामुळे आज तो नेपाळला पळून जाण्याच्या प्रयत्नात कसा असू शकतो, असा सवाल माध्यमांकडे केला.

Continue reading

पंतप्रधान मोदी सेशेल्सच्या सर्वोच्च बहुमानाने सन्मानित

व्हिक्टोरिया (सेशेल्स) येथे एका विशेष सोहळ्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज सेशेल्सचे अध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या हस्ते ‘गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन’ हा पहिला सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. पंतप्रधानांच्या पर्यावरणपूरक नेतृत्त्वासाठी, विकसनशील देशांच्या हितासाठी केलेले प्रयत्न, सागरी...

उद्या घराबाहेर पडा छत्री आणि रेनकोटसह…

उद्या म्हणजेच गुरूवारीही मुंबईत दिवसभर पाऊस राहणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार उद्या मुंबईत हलका ते मध्यम पाऊस पडेल. ढगाळ वातावरण राहील. कमाल तापमान 29° ते 30°C तर किमान तापमान 27° ते 28°C असेल. वास्तविक तापमान दमटपणामुळे 38° ते 40°C...

एकांकिकांच्या सादरीकरणाने साजरी झाली विनय आपटेंची जयंती

"आजही नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांकडून ज्या टाळ्या मिळतात, त्यातील पहिल्या शंभर टाळ्या, या विनय सरांच्याच असतात," अशा अत्यंत विनम्र भावना सुप्रसिद्ध अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांनी ठाण्यात व्यक्त केल्या. सुप्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते आणि लेखक विनय आपटे यांच्या जयंतीनिमित्त 'विनय आपटे...
Skip to content