Homeडेली पल्सशरद पवारांमुळे वर्ध्यातून...

शरद पवारांमुळे वर्ध्यातून पंजाही गायब!

वर्धा जिल्हा काँग्रेसमुक्त झाला. मात्र या भागातून पंजाही गायब होण्याचे श्रेय शरद पवारांना आहे. या मतदारसंघासाठी काँग्रेसला लोकसभेसाठी उमेदवारही सापडला नाही. परिणामी राष्ट्रवादीचा उमेदवार आयात करण्याची वेळ काँग्रेसवर आली, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केले.

वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपा शिवसेना, राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार, खा. रामदास तडस यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या विजय संकल्प सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खा. डॉ. अनिल बोंडे, ज्येष्ठ नेते रामदास आंबटकर, प्रदेश सहमुख्य प्रवक्ते आशीष देशमुख तसेच शिवसेना, राष्ट्रवादी, रिपब्लिकन पक्षाचे नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या खा. तडस यांचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तडस पुन्हा विरोधकांना धोबीपछाड देणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरदचंद्र पवार गट) शरद पवार यांचे कुस्तीतील पॅनल ताब्यात घेणारे तडस यांना यंदा 60 टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, महात्मा गांधी यांची भूमी असलेल्या वर्धा मतदारसंघाचे नेतृत्त्व करणारे रामदास तडस हे संयमी खासदार म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या दोन कालावधीदरम्यान लोकसभेत 1035 प्रश्न उपस्थित केले तर 113 चर्चांमध्ये सहभाग घेतला. अशा कार्यक्षम उमेदवारालाच वर्ध्याचे मतदार पुन्हा निवडून देतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांना धर्मग्रंथापेक्षाही संविधान महत्त्वाचे!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देशाचे संविधान सुरक्षित असून अस्तित्त्वाच्या भीतीमुळे संविधान बदलण्याविषयीचा अपप्रचार विरोधकांकडून केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांना धर्मग्रंथापेक्षाही संविधान महत्त्वाचे आहे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपा- महायुतीचे उमेदवार अनुप धोत्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना झालेल्या विजय संकल्प सभेत म्हणाले.

अटलबिहारी वाजपेयी, जॉर्ज फर्नांडिससारख्या २ लाखांहून अधिक नेत्यांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणीबाणी लादून तुरुंगात टाकण्याचे महापाप काँग्रेसने केले. त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संविधानाचा गैरवापर केला होता, याचे फडणवीस यांनी स्मरण करून दिले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर, आ. हरीश पिंपळे, आ. श्वेता महाले आदी उपस्थित होते.

Continue reading

दिनकर पाटील, शकुंतला खटावकर यांना ‘जीवन गौरव’ तर, मंगेश वरवडेकर यांना ज्येष्ठ क्रीडा पत्रकार पुरस्कार

कबड्डीच्या मैदानावर आपल्या कार्यकर्तृत्त्वाने खेळाला समृद्ध करणाऱ्या दिनकर पाटील (सांगली) आणि शकुंतला खटावकर (पुणे) यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचा प्रतिष्ठेचा ‘कबड्डी महर्षी शंकरराव (बुवा) साळवी कबड्डी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. त्याचबरोबर मैदानावरील घडामोडींचे निर्भीड वृत्तांकन करताना खेळाडूंच्या न्यायासाठी...

आता कुर्ला-साकी नाका भागात रस्त्यावर दिसणार ‘मॅनहोल रेलगार्ड’!

मुंबईत मॅनहोल्सवर काम करताना सार्वजनिक सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी तसेच देखभाल-दुरुस्तीची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 'मॅनहोल रेलगार्ड' ही चौकोनी आकारातील प्रतिकृती एका संस्थेकडून विकसित करण्यात आली आहे. या प्रतिकृतीची प्रत्यक्ष पाहणी आज मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका...

रविवारी आनंद घ्या रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, १२ जुलैला सायंकाळी पाच वाजता पं. के. जी. गिंडे यांच्या स्मरणार्थ रमाकांत गायकवाड यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना इशान घोष...
Skip to content