Homeपब्लिक फिगरसंरक्षण मंत्री राजनाथ...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून जर्मनीच्या दौऱ्यावर

इराण आणि अमेरिकेतला संघर्ष तीव्र होत असतानाच तसेच नाटो संघटनेतल्या युरोपीय राष्ट्रांची यावरील भूमिका महत्त्वाची ठरत असतानाच भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्यापासून 23 एप्रिलपर्यंत तीन दिवसांच्या जर्मनीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, संरक्षण मंत्री त्यांचे जर्मनीतील समकक्ष बोरिस पिस्टोरियस आणि इतर वरिष्ठ सरकारी नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. दोन्ही देशांमधील सामरिक संरक्षण भागीदारी अधिक बळकट करण्याचा यामागील उद्देश आहे.

संरक्षण क्षेत्रातील औद्योगिक सहकार्य वाढवणे, लष्करी संबंध अधिक दृढ करणे, सायबरसुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ड्रोन यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधील संधीचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. दोन्ही संरक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण औद्योगिक सहकार्य आराखडा आणि संयुक्त राष्ट्र शांतता मोहिमेतील प्रशिक्षणासाठी सहकार्यासंबंधी अंमलबजावणी करारावर या दौऱ्यात सह्या होण्याची शक्यता आहे. संरक्षण क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या सहकार्य उपक्रमांचा आढावा घेण्याची, तसेच दोन्ही देशांच्या संरक्षण उद्योगांमध्ये सहयोगाचे नवीन पर्याय शोधण्याची संधी या भेटीमुळे उपलब्ध होईल. ‘मेक-इन-इंडिया’ उपक्रमांतर्गत संयुक्त विकास आणि सहउत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने, राजनाथ सिंह जर्मनीच्या संरक्षण उद्योगातील प्रमुख प्रतिनिधींशी संवाद साधतील.

संरक्षण मंत्र्यांचा हा दौरा सात वर्षांनी होत आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2019 तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी जर्मनीला भेट दिली होती. नंतर, बोरिस पिस्टोरियस यांनी जून 2023मध्ये भारतात येऊन राजनाथ सिंह यांच्याशी सविस्तर चर्चा केली होती. भारत आणि जर्मनी यांच्यात लोकशाहीची मूल्ये, कायद्याचे राज्य आणि नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेप्रती असलेली सामायिक वचनबद्धता यांवर आधारित धोरणात्मक भागीदारी आहे. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, तसेच प्रादेशिक आणि जागतिक शांतता, स्थिरता व समृद्धीमध्ये योगदान देणे हा या भेटीचा उद्देश आहे.

Continue reading

सिटू संलग्न कामगारांनी केले आक्रोश ठिय्या आंदोलन

सिटूशी संलग्न विविध विभागातील कामगार संघटनांचे आक्रोश ठिय्या आंदोलन आझाद मैदान, मुंबई येथे कालपासून सुरू झाले आहे. काल आंदोलनाच्या पहिल्या दिवशी एकात्मिक बालविकास सेवा योजना (आयसीडीएस), राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) आणि पंतप्रधान मध्यान्न भोजन योजना (पीएम मिड-डे मील) इत्यादी...

त्रिंगलवाडी किल्ल्यावर वारसा पर्यटन व साहसी शैक्षणिक ट्रेक यशस्वी

जगप्रसिद्ध गिर्यारोहक टेन्झिंग नोर्गे शेर्पा यांच्या 112व्या जयंतीनिमित्त तसेच एव्हरेस्ट डेच्या 73व्या वर्षानिमित्त, ऐतिहासिक त्रिंगलवाडी किल्ला, प्राचीन लेणी व मंदिर येथे "वारसा पर्यटन अनुभवाधारित शिक्षण कार्यक्रम" नुकताच उत्साहात संपन्न झाला. हा उपक्रम भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत...

आपण अन्नपाण्यावाचून दोन दिवस राहून बघा…

अभय मोकाशी यांचे गुणगान, त्यांचा गौरव अनेकांनी केला. आम्हाला याचा निश्चितच अभिमान आहे. परंतु अभयने अखेरपर्यंत लढा दिला, अगदी कर्करोगाशी लढा देताना तब्बल ७० दिवस तो अन्नपाण्यावाचून राहिला. आपण पाहा प्रयत्न करुन.. दोन दिवस अन्नपाण्याशिवाय राहिलो तर काय परिस्थिती...
Skip to content