Homeन्यूज ॲट अ ग्लांसन्यायालये माणसे चालवतात,...

न्यायालये माणसे चालवतात, एआय नाही!

“न्यायालयं ही माणसांद्वारे चालवली जातात, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) नाही,” अशा कडक शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकाकर्त्याची तातडीच्या सुनावणीची विनंती फेटाळून लावली.

२०२१पासून प्रलंबित असलेल्या एका ‘प्रथम अपिलावर’ प्राधान्याने सुनावणी घेण्याची मागणी न्यायालयात करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीशांच्या मानवी मर्यादा आणि प्रलंबित खटल्यांचा डोंगर लक्षात घेता, अशा प्रकारे ‘क्यू जंपिंग’ (रांग तोडून पुढे येणे) स्वीकारार्ह नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. संबंधित वकिलांनी आपल्या पक्षकाराच्या २०२१मधील अपिलावर तातडीने सुनावणी घेण्याचा आग्रह धरला होता. यावर न्यायालयाने तीव्र आक्षेप नोंदवत विचारले की, “जर आम्ही २०२१च्या प्रकरणाला प्राधान्य दिले, तर १९९० आणि २००० सालापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो पक्षकारांचे काय? त्यांच्यावर हा अन्याय नाही का?” सध्या न्यायालयात ३० वर्षांहून अधिक काळ जुनी प्रकरणे प्रलंबित असल्याचे वास्तव खंडपीठाने यावेळी मांडले.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने न्यायाधीशांच्या कामकाजाच्या स्वरूपावर मार्मिक भाष्य केले. “आम्ही यंत्रमानव किंवा एआय अल्गोरिदम नाही जे बटन दाबताच निकाल देतील. आम्ही माणसं आहोत आणि आम्हालाही शारीरिक व मानसिक मर्यादा आहेत,” असे खंडपीठाने नमूद केले. दररोज शेकडो प्रकरणांची सुनावणी करताना न्यायाधीशांवर असलेला ताण आणि प्रत्येक प्रकरणाला द्यावा लागणारा वेळ लक्षात घेता, केवळ नवीन प्रकरण आहे म्हणून त्याला झुकते माप देता येणार नाही, असे न्यायालयाने बजावले.

खंडपीठाने पुढे स्पष्ट केले की, जोपर्यंत एखाद्या प्रकरणात अत्यंत गंभीर वैद्यकीय आणीबाणी किंवा कायद्याचा मोठा पेच नसेल, तोपर्यंत जुन्या प्रकरणांना डावलून नवीन प्रकरणांना ‘आउट ऑफ टर्न’ सुनावणी दिली जाणार नाही. न्यायालयाच्या या भूमिकेमुळे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तसेच, वाढत्या प्रलंबित खटल्यांच्या समस्येकडे आणि न्यायालयीन पायाभूत सुविधांवरील ताणाकडेही या निमित्ताने लक्ष वेधले गेले आहे.

न्यायालयाने याचिकाकर्त्याला नियमानुसार सुनावणीच्या रांगेत राहण्याचे निर्देश देत, तातडीची विनंती अमान्य केली. न्यायव्यवस्थेतील मानवी संवेदना आणि निष्पक्षता टिकवून ठेवण्यासाठी सर्व पक्षकारांनी संयम बाळगणे आवश्यक असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

Continue reading

१७२ शेतकऱ्यांच्या उड्डाणाने सुरू झाले नोएडा विमानतळ!

उत्तर प्रदेशच्या विमानवाहतुकीत आज एक ऐतिहासिक टप्पा गाठला गेला. जेवर येथील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज व्यावसायिक प्रवासी विमानसेवा अधिकृतपणे सुरू झाली. या भव्य ग्रीनफिल्ड विमानतळावर आज सकाळी पहिले विमान यशस्वीरित्या उतरले. केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री के. राम मोहन नायडू...

अमेरिका आणि इराण समझोता तात्पुरता! पुन्हा संघर्ष चिघळणार?

गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणच्या संघर्षात अखेर समेट झाल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या काल झालेल्या वाढदिवशी अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार अंतिम झाल्याचे जाहीर केले. समाजमाध्यमावर पोस्ट करत ट्रम्प यांनी...

मुंबई महापौर ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्सः आचार्य विद्यानिकेतन अजिंक्य

यजमान नारायणराव आचार्य विद्यानिकेतन संघाने मुंबई महापौर चषक निमंत्रित ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत आपली विजयी परंपरा कायम राखताना विजेतेपदाचा मान पटकावला. चेंबूर येथील विद्यानिकेतनच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १५ संघातील २५०पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. २००२ ते २०२६दरम्यान झालेल्या या...
Skip to content