Homeडेली पल्सकाँग्रेसनेच डॉ. आंबेडकरांना...

काँग्रेसनेच डॉ. आंबेडकरांना पराभूत केले होते..

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर देशाचे संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. मात्र कुणी कितीही  प्रयत्न केले तरीही ते अशक्य असल्याचे खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच आपल्या भाषणातून स्पष्ट केले आहे. याउलट असा अपप्रचार करणाऱ्या काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केले होते याची आठवण शिवसेनेचे नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज करून दिली.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री शिंदे यांनी आज मुंबईतल्या दादरच्या चैत्यभूमीवर जाऊन महामानवाला अभिवादन केले. तसेच चैत्यभूमीच्या आवारात भरवलेल्या प्रदर्शनालाही भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.

बाबासाहेबांनी तयार केलेल्या संविधानाला अनुसरून राज्याचा कारभार सुरू आहे. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला आहे. राज्य शासनानेही इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभे करायला सुरुवात केली आहे. नागपूरमधील दीक्षाभूमीचे जतन, संवर्धन यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लंडनमधील घर खरेदी करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करून शासनाने बाबासाहेबांना खरी मानवंदना दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून घोषित केला आहे. राज्यातदेखील हा दिवस आपण साजरा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, ज्येष्ठ आरपीआय नेते अविनाश महातेकर आणि नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.

Continue reading

१८व्या ‘जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले’ मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

मुंबई सिटी डिस्ट्रिक्ट जिम्नॅस्टिक्स असोसिएशन आयोजित व मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, वडाळा प्रायोजित १८व्या "जिम्नॅस्टिक्स टॅलेन्ट डिस्प्ले" मिनी स्टेट स्पर्धा मोठ्या उत्साहात भारतीय क्रीडा मंदीर, वडाळा, मुंबई येथे नुकत्याच संपन्न झाल्या. ८, १०, १२, १४ व १६ वर्षांखालील वयोगटात...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीतल्या घवघवीत यशानंतर विविध महापालिकेत महापौराच्या निवडीकडे लक्ष देण्याचे सोडून, मित्र पक्षांशी वाटाघाटी करण्याची जबाबदारी आपल्या सहकाऱ्यांवर सोपवत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2026मध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री...

मुंबईत भाजपाला मिळाली सुमारे २२ टक्के मते

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २२७ जागांपैकी ८९ जागा जिंकत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत एकूण ११,७९,२७३ मते प्राप्त केली. एकूण मतदानाच्या तुलनेत भाजपाच्या मतांचा वाटा २१.५८ टक्के असून, विजयी...
Skip to content