Homeपब्लिक फिगरमुंबईच्या समुद्रात लवकरच...

मुंबईच्या समुद्रात लवकरच दिसणार कॅन्डेलाची बोट!

स्वीडनमध्ये जलवाहतुकीसाठी वापरण्यात येणारी पी १२ ही बोट लवकरच मुंबईत दाखल होणार असून, त्यामुळे राज्यातील जलवाहतुकीच्या क्षेत्रात आधुनिकतेचा नवा अध्याय सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.

नितेश राणे नुकतेच स्वीडनच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी कॅन्डेला (Candela) कंपनीच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानाची तसेच सी ८ आणि पी १२, या बोटींची पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आधुनिक, स्मार्ट आणि जागतिक मुंबई’ या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, राणे यांनी स्वीडन दौऱ्यादरम्यान कॅन्डेला (Candela) या जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान कंपनीच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक बोटींची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी बाल्टिक समुद्रावर कॅन्डेला कंपनीच्या सी ८ आणि पी १२ या अत्याधुनिक बोटींची सफर केली. या बोटी पाण्यावर ग्लाईड होणाऱ्या हायड्रोफॉइल तंत्रज्ञानावर आधारित असून, वेगवान, पर्यावरणपूरक आणि ऊर्जा कार्यक्षम आहेत.

कॅन्डेला

कॅन्डेला कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुस्ताव हॅसेल्सकॉग तसेच मुख्य वाणिज्य अधिकारी नकुल विराट यांनी राणे यांना कंपनीच्या उत्पादन प्रक्रियेची आणि तांत्रिक नवकल्पनांची सविस्तर माहिती दिली. यादरम्यान महाराष्ट्रात कॅन्डेलाचे उत्पादन केंद्र स्थापन करण्याबाबत प्राथमिक चर्चाही करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना नितेश राणे यांनी सांगितले की, हा उपक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘जागतिक मुंबई’च्या स्वप्नपूर्तीतील महत्त्वाचे पाऊल ठरेल.

मुंबईत कॅन्डेलाची पर्यावरणपूरक जलवाहतूक सुरू झाल्यानंतर नागरिकांना नव्या प्रकारचा प्रवास अनुभव मिळेल आणि किनारी भागांतील जोडणी अधिक मजबूत होईल. या उपक्रमामुळे महाराष्ट्रात जलवाहतुकीसह किनारी विकास आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल, तसेच रोजगारनिर्मितीच्या नवीन संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही राणे यांनी व्यक्त केली.

Continue reading

मी हरलेच नाही, मग राजीनामा का देऊ? ममतांचा सवाल!

मी हरलेच नाही तर मग राजीनामा कशासाठी देणार, असा सवाल करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिला. मी हरलेच नाही. मला हरवले गेले आहे. त्यामुळे लोकभवन म्हणजेच राजभवनावर जाऊन मी राजीनामा देणार...

दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करणारी महिला झाली आमदार!

जिद्द, चिकाटी आणि लोकशाहीवरचा विश्वास असेल, तर एखादी सामान्य व्यक्ती किती मोठी झेप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे कलिता माजी. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात अनेक दिग्गजांचा पराभव झाला असला, तरी औसग्राम विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेल्या...

इराणने युद्धविराम तोडला!

गेल्या काही दिवसांपासून इराण आणि अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला युद्धविराम आज अखेर इराणने तोडला. इराणने आज होर्मूझच्या सामुद्रधुनीत नाकेबंदीला असलेल्या अमेरिकेच्या युद्धनौकेवरच हल्ला केल्याचे वृत्त आहे. अमेरिकेची ही युद्धनौका इराणच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला असता इराणने या...
Skip to content