Homeचिट चॅटबेस्टने स्वतःच्या मालकीच्या...

बेस्टने स्वतःच्या मालकीच्या बसेस घ्याव्यात!

मुंबई महापालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्ट प्रशासनाने कंत्राटी बसेस घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीच्या बसेस घ्याव्यात, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन केली.

बेस्टची बससेवा अधिक लोकाभिमुख कशी करता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी कामगार सेनेच्या प्रतिनिधी मंडळाने आमदार ठाकरे यांची खास भेट मातोश्री मुक्कामी घेतली होती. कंत्राटी बसेसमुळे कंत्राटदारांचा फायदा होतो. बेस्ट मात्र तोट्यात जात आहे, ही बाब निदर्शनास आणून अध्यक्ष सामंत यांनी बेस्ट उपक्रमाने सुमारे 3050 बसेस तातडीने खरेदी करण्याची गरज असल्याचे सांगितले. अर्थात ही खरेदी टप्याटप्याने केली जावी तसेच यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने भरीव मदत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बेस्ट

केंद्र सरकारच्या शहर वाहतुकीसाठीच्या विविध योजनांचा मुंबई शहरालाही लाभ मिळाला पाहिजे. याबरोबरच कायम कर्मचाऱ्यांची भरती, रखडलेली पदोन्नतीची कामे, वेतन कराराची थकबाकी तसेच ग्रॅज्युइटीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासन व राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही प्रतिनिधी मंडळाने केली. यात संघटनेचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, उमेश सारंग, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

बेस्ट वाचली पाहिजे आणि ही सेवा अधिक उत्तम करता यावी म्हणून जे जे करावे लागेल ते मी जरूर करेन, असे आश्वासन आमदार आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content